Skip to main content

आपलं विश्व!


मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही.

ते रमणं महत्त्वाचं,

ते रममाण होणं महत्त्वाचं!

भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं!


एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही.


सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल जिथे स्थल, काल, काम काज सगळंच वेगळं असतं. हे जुळवून घेणं सोपं नसतं. सोपं असेल तर मजा काय म्हणा. हे असं सुद्धा स्वतःच स्वतःला समजावत राहावं. मग आव्हानं पेलायला भीती वाटत नाही. आपण जेव्हा त्या 'आपल्या विश्वात' रमतो, तेव्हा मग routine थोडं सुसह्य वाटू लागतं.


बदल आपल्याल नवे अनुभव देतात. अनुभव माणसाला शहाणं करतो. अनुभवाने समृद्ध होत जाणाऱ्या माणसाचा जगाच्या पाठीवर कुठेही निभाव लागतो आणि प्रयत्नाने प्रभावही पडतोच!


सध्या बदल अफाट आहे. स्थळ- काळ- काम- काज- खाणं- राहणं- माणसं- आव्हानं आणि असं बरंच काही... सगळं सगळं अगदी वेगळं, काही प्रमाणात नवीन. हे बदल काय आहेत याच्या detailing पेक्षा सुदधा निरनिराळ्या प्रकारचे बदल अनेकांच्या आयुष्यात अनेकदा अनेक प्रकारे कधी ना कधी होतात. यांना सामोरं जाण्याचं बळ आपलं आपणच आणायचं असतं. सामोरं जाता जाता त्या 'आपल्या विश्वात' मध्येच एखादी फेरी मारून येणं महत्त्वाचं. या आपल्या विश्वात चक्कर मारून येणं म्हणजे स्वतःला नव्याने प्रेरित करणं आणि बदलाशी जुळवून घेणं.


या बदलांमध्ये माझ्या या diary कडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही, दिला गेला नाही. पण जमेल तसा तो वेळ देत त्या विश्वात रममाण होणं महत्त्वाचं. प्रत्येकाचं हे 'आपलं विश्व' निराळं असणार, असेल. कोणतंही असेल, पण ते स्वतःसाठी विशेष असावं इतकंच!


- वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...