A click by: Omkar Unde किस्सा असा झाला की कोण्या एका ‘योग’दिनी बाहेर पाऊस पडत होता. मी पावसापाण्यात पण धावत पळत एका इप्सित स्थळी पोचलो. आत पोचलो तर छान वातावरण निर्मिती झाली होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस असल्याने सगळी तयारी झाली होती. मोठमोठी मंडळी मांड्या ठोकून खालीच बसली होती. मी ही सहभागी झालो. म्हणलं चला.. योगा करू! आधी lecture सुरू झालं.. सुरुवात थेट भजी च्या उदाहरणाने झाली. आधीच पाऊस , त्यात भजी.. ह्म्म ... पण झालं वेगळंच.. ते म्हणाले की या वातावरणात भजी खावी वाटते.. मी मनात म्हणलं खरंय .. तर ते म्हणाले .. अजिबात खायची नाही.. ताबा असला पाहिजे जिभेवर.. मी म्हणलं तो ताबा बोलताना ठीक आहे पण भजी म्हणजे.. पण त्यांच्या या वाक्याने भजीची आशाच संपली. मग ते म्हणाले माणसाचं आयुष्य ५०% सुख आज ५०% दुःख असं असतं. मी म्हणलं बरं .. भजी खायला मिळत नाही म्हणजे एकूणच ५०% दुःखाचा काळ चालू आहे. मग ' सुख ' मिळविण्यासाठी आमच्या केंद्राला भेट द्या असं ते म्हणाले.. तिथे ताण घालवला जाईल. अहो.. योगाच्या ऐवजी lecture सुरू झाल्याने निम्मे लोक अपेक्षाभंगाने वैतागले होते आणि तणा...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...