Skip to main content

Posts

Showing posts with the label love

स्वतंत्र होडी!

ते दोघे तलावाकाठी शांत बसले होते. तिने विचारलं, "भाजी कोणती करू?" तो म्हणाला, "इतक्या रम्य ठिकाणी येऊन भाजीचा प्रश्न?" ती त्याला हलकेच फटका देत म्हणाली, "गप रे. असतात असे प्रश्न." "तुला हवी ती किंवा कंटाळा आला असेल तर जेवायला बाहेर जाऊ." स्वतःच्या मनाने काही सहजपणे करण्याची सवय घालवून बसलेली ती त्याच्याकडे पाहत बसली. कागदाची होडी करण्यासाठी पर्स मधला कागद घेत ती म्हणाली, "होडी कशी करू?" "तुला हवी तशी." तो सहज म्हणाला. "एवढं स्वातंत्र्य?" तिने प्रश्न केला. तो आश्चर्याने म्हणाला, "हो. का? काय झालं? भाजी आणि होडी करण्यात काय विचारायचं?" ती खाली पाहत म्हणाली, "सवय नाही." तो तिच्याकडे लक्ष देऊन म्हणाला, "कसली?" "आधीच्या relation मध्ये कसलंच स्वातंत्र्य नव्हतं. श्वास पण त्याच्याच मर्जीने घ्यायचा राहिला होता फक्त. Confidence च गेला. म्हणून अत्यंत silly गोष्टीसाठी पण permission घेऊ लागले. ती  गोष्ट त्याचा ego सुखावू लागली. त्यातून नशिबाने बाहेर पडले. पण तो असा म्हणजे सगळे असे असतील असा समज ...

क्षितीज

तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग. खरंच ह्या सागराला अंत आहे का? अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो? असे प्रश्न त्याला पडले. ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं." "म्हणजे?" त्याने प्रश्न केला. ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न." तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो." ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर." तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?" "जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं. "पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला. ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं." "पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला. ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अ...

Romantic Headphones

  Wired headphones म्हटलं की त्याचा गुंता आलाच. हाच गुंता सोडवायचा प्रयत्न करत राहुल घरच्या bed वर निवांत पडला. तेवढ्यात तिथे राहुलचा मित्र संकेत आला. त्याने राहुलचा, गुंता न निघालेला headphone बाजूला ठेवला. खिशातून स्वत:चे airdopes काढले. एक त्याला दिला. दुसरा त्याने स्वतःच्या कानात घातला. Airdopes हे Bluetooth ने connect होत असल्याने थोड्या अंतरावर खुर्चीत जाऊन तो बसला. दोघे गाणी ऐकू लागले. राहुल एकदम जुन्या आठवणींत रमला.  बाजूला ठेवलेले गुंत्यात असणारे headphones त्याला दिसले. त्याने ते अलगद स्वतःकडे घेतले. गुंता सोडवत जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागला. . . Train चा आवाज आधी मोठा होता. जशी train रुळावर रुळली तसा आवाज कानांना normal & used to झाला. राहुल आणि तानियाने एकच wired headphone share केला. Local train मध्ये दोघे एकमेकांसमोर बसले. लोणावळा ते पुणे असा परतीचा प्रवास, बाहेर पावसाचं वातावरण, धुकं जमलेलं, दोघे बऱ्यापैकी चिंब भिजलेले. अर्थात अशा trips ठरवूनच चिंब भिजण्यासाठी केल्या जातात. तशीच ही trip. सोबत group होता. पण आता सगळ्यांची trip enjoy करून झाली होती नि प्...

असं का?

  तुझ्या डोळ्यात खोलवर पाहिलं की कुठलीतरी खोलवर वेदना का दिसते गं? तू कशी आहेस विचारल्यावर हसतेस नि म्हणतेस बरी आहे. त्या हसण्यात तू बरी नाहीयेस, हे का कळतं गं मला? तुझ्या विचारात तू हरवतेस नि मग तुझ्या नजरेत पोकळी का असते? आपण एकमेकांच्या मिठीत नेहमी विसावत नाही, तरी आपली मिठी तुला का हवीहवीशी वाटते? आणि मग आपण मिठीत काही क्षण जास्तच का बरं विसावतो? मिठीचे ते जास्तीचे क्षणच समाधान का देतात? आपण मिठीतून नेहमी अलगद का बाहेर येतो? उबदार मिठी सुटली तरीही तो उबदार स्पर्श हवाहवासा का वाटतो? मिठी सुटताच सहज हातात हात का गुंफला जातो? एकमेकांची सोबत त्या हाताच्या स्पर्शाइतकी उबदार का वाटते गं? आपण एकमेकांच्या कुशीत किंचित जास्त वेळ का रमून जातो गं? आपलं नातं जन्मोजन्मीचं आहे असं का बरं वाटतं? आपण एकमेकांसवे नसतो तेव्हा आठवणींत एकमेकांसवे का बरं असतो? मग भेटल्यावर आपण एकमेकांची किती आठवण काढली होती हे का सांगतो? लिहिता लिहिता तो थांबला. त्याने तिला विचारलं, "असं का गं?" ती पुस्तक वाचत होती. पुस्तकातून डोकं बाहेर काढत म्हणाली, "काय माहित?" नि ती पुन्हा पुस्तक ...

शब्द (कोणता नि कसा?)

शब्द बोलला. बोलून गेला. मग जाणवलं, चुकला.  का बोलला? उगाच बोलला.  खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते.  शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते.  कधी कधी ठरवून वार होतो, कधी चुकून वार होतो. कधी कठोर शब्द वापरावे लागतात. कधी नकळत वापरले जातात.  याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात. शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं. हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो.  शब्द नकळत घाव घालतात. हेच शब्द घाव भरून काढतात.  शब्द ओले, शब्द कोरडे. शब्द शहाणे, शब्द वेडे. शब्द जोडले तर वाक्य. वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद. संवाद एकतर बरा किंवा वाईट. संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो. शब्दाची ताकद मोठी असते. ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते.  शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात. अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमि...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...

तू चल... मी आहेच!

  मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!" मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार! मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी  हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो. मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये? एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधार...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

तिची आठवण!

A click by: Varun Bhagwat  सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको. पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट. पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं. हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' कर...

अर्धविराम ;

  A click by : Varun Bhagwat किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं. आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत  नव्हती आपली एकमेकांना? खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं. अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो. पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची! एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली. तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास. माझ्या हास्यात हसू शोधलंस. तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले. माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस. सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो. किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं. तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं.  आपल्या एकत्र असण्यात जान होती. निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती. पण हे सारं फार लवकर संपलं. खूप काही करायचं राहून गेलं. खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्ह...