Skip to main content

Posts

Showing posts with the label gratitude

तू चल... मी आहेच!

  मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!" मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार! मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी  हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो. मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये? एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधार...

मिटता काजळी, दीप उजळी!

  A click by : Varun Bhagwat  मशाल जळत होती. त्यातून निर्माण होणारी आग केसरी, गडद पिवळा रंग झळकवत होती. त्या आगीतून तयार होणारी आभा त्याच्या मुखावर पसरली. मुखावर तेज दिसू लागलं. आजूबाजूला मिट्ट काळोख. केवळ चेहऱ्यावर आगीची आभा, त्यामुळे येणारं तेज, आणि शांत उभा असलेला तो!  अंधारात असणाऱ्या कोणासाठीही एक प्रोत्साहन होतं ते चित्र! इतका मिट्ट काळोख आयुष्यात निर्माण झाला तरी इवलासा प्रकाश तमाचा अंत करू शकतो. "पिछे मेरे अंधेरा, आगे आँधी आँधी हैं, मैंने ऐसी आँधी में दिया जलाया है|" या गुलजार जींच्या ओळी तंतोतंत तिथे बसल्या. ते चित्र प्रेरणा देत होतं की कितीही नकारात्मकता असली तरी एक छोटी ज्योत सारं काही उजळून टाकते. आग ही खरंतर विध्वंस करणारी गोष्ट देखील आहे. परंतु हाच अग्नी पंच महाभूतांपैकी एक आहे. It's a source of energy. तिमिरातून तेजाकडे जाताना हा अग्नी मदत करेल. मनात हा अग्नी सतत प्रदीप्त असायला हवा. तोच ऊर्जा देतो. मशाल तर खूप जास्त प्रकाश देते. पण एक छोटी पणती सुद्धा तिचा परिसर समृद्ध करते. आपण आपल्या परीने पणती होऊ शकतो, मशाल होऊ शकतो. इतक्याशा प्रकाशाने काय होणार?...

आई फक्त प्रेम जाणते!

A click by: Sushil Ladkat Guest Lecturer म्हणून आज शाळेमध्ये ‘अक्षर’ नावाचा लेखक आला होता. तो वर्गात गोष्ट सांगत होता, “श्याम अगदी लहान होता. आईने श्यामला अंघोळ घातली. अंघोळ घातल्यानंतर आई त्याचे अंग पुसत होती. श्याम आईला म्हणाला , " आई , माझे पायाचे तळवे ओले आहेत. ते पुसून दे नाहीतर त्याला माती लागेल आणि ते घाण होतील.” आई त्या वेळी काहीच बोलली नाही. तिने त्याचे तळवे पुसून दिले , पण त्यानंतर जे वाक्य ती म्हणाली   ते माझ्या काय , ज्यांनी ज्यांनी श्यामची आई हे पुस्तक वाचलं आहे किंवा श्यामची आई हा चित्रपट बघितला आहे त्यांच्या डोक्यातून , खरंतर मनातून, हो मनातून कधीच जाणार नाही. कारण वाक्यच काहीसं तसं होतं.   तळवे पुसून झाल्यावर आई श्यामला म्हणाली , " पायाला घाण लागू नये म्हणून काळजी घेतोस तसाच ' मनाला ' घाण लागू नये म्हणून पण काळजी घे हो." किती सहज म्हणून गेलेलं पण केवढं महत्त्वाचं वाक्य आहे.   ' श्यामची आई ' अर्थात साने गुरुजींची आई ही कित्येक आयांचं प्रतिनिधित्व करते असं म्हणायला हरकत नाही. आई साध्या गोष्टी सांगता सांगता किती सहज केवढं मोठं तत्त्...

लंबोदर

A click by - Varun Bhagwat आई वडिलांनी काय विचार करून नाव ठेवलेलं असतं कोणास ठाऊक? पण ते नाव सार्थकी लागावं असं त्यांना वाटत असतं. गणेश चतुर्थीला लंबोदरचा जन्म झाला त्यामुळे हे नाव ठेवलं आणि पटठ्याने त्याच्या गणेशभक्ती मुळे नि लंब उदरामुळे (पोटामुळे) ते नाव सार्थही केलं. लंबोदर च्या घरी गणपती छोटीशीच भेट द्यायचा. मोजून दीड दिवस मुक्काम! लोकांचे गणपती settle होइपर्यंत यांच्या जाण्याची वेळ यायची. दीड दिवसात खूप लगबग असायची. लंबोदर च्या आईच्या उत्साहाला तर काय उधाण यायचं! प्रसाद म्हणजे विचारायला नको. हाताला इतकी मस्त चव की लहानपणी लंबोदर ला वाटायचं गणपती दीड दिवसाची प्रथा मोडून खास आईच्या मोदकासाठी मुक्काम वाढवेल की काय! कारण मोदक म्हणजे लंबोदर चा जीव की प्राण. पण वर्षातून एकदाच मोदक व्हायचे आणि या गणपती सोबत लंबोदर ला मोदकांना सुद्धा पुढच्या वर्षी लवकर या म्हणावं लागायचं. या दीड दिवसात लंबोदर आपल्या आईला मनापासून मदत करायचा. सगळ्या छोट्या छोट्या कामात याचा हातभार लागायचा आणि याचा खारीचा वाटा सिंहाच्या पिल्लाइतका नक्की मोठा व्हायचा. याला "बहीण" नाही त्यामुळे पाहुण्या रावळ्यांना ...

बाप लेकाचं नातं

वेद आणि सिद या २ मित्रांचा संवाद चालू होता. “आज father’s day आहे म्हणे.” “हां... ते days चे प्रकार वर्षभर चालूच असतात.” “ते खरंय.” “कशाला लागतात रे हे days?” “कदाचित व्यक्त व्हायला.” “बाकी जाऊ दे, पण तू वडिलांवर कितीही व्यक्त हो, त्यांना त्यांच्या लेकापेक्षा लेकीच प्रिय.” “हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीये.” “अरे, पण जास्त करून असंच असतं की नाही? “हो, पण त्यात बापाची चूक नाही. तो मुलीबाबत जास्त हळवा असतो इतकंच.” “इतका हळवा की मला अगदी हिडीस-फिडीस करावं का?” “सिद, chill. काय भांडला आहेस का वडिलांसोबत?” “तसं नाही यार वेद, मुलाचं वडिलांसोबत नातं सोपं नसतं नाही?” “नाही. नसतं. हे मला मान्य आहे. “मी तर म्हणेन ते थोडं अर्धवट असतं.” “अर्धवट?” “हां... बाकी काही असो... पण त्या निमित्ताने म्हण किंवा काय, मी वडिलांवर थोडसं लिहिलंय वेद..” “तू लिहिलंयस?” “हो.” “मगाशी तर म्हणत होतास मला days चं काही कौतुक नाही आणि तू तर लिहिलंयस...” “आता बोलू की नको?” “आता काय बोलतोस?” “अरे म्हणजे ऐकवू की नको?” “काय ऐकवतोस?” “माझी थट्टा करणार असशील तर नंतर बोलू.” ...

या जगात चांगली माणसं आहेत का?

A click by: Sushil Ladkat २ मित्र- गोविंद आणि रमाकांत घराबाहेरच्या रस्त्यावर चालत गप्पा मारत होते. “गोविंद, माझ्या मते या जगात चांगली माणसं वगैरे काही उरली नाहीयेत.” “मला वाटतं की आपण चांगलं काम केलं तर आपल्या बाबतीत चांगलंच घडतं.” “असं काही नाही.” “अरेच्च्या... अरे रमाकांत, आपण एखाद्याच्या बाबतीत चांगले वागलो तर कधी ना कधी त्याची परतफेड चांगल्या मार्गानेच होते.” “माझा ना या तत्वज्ञानावर विश्वासच नाही.” “पण तुला असं अचानक काय झालं?” “अचानक वगैरे नाही. परवाचा incident आठवला. दारावर आलेल्या त्या फुगेवाल्याला कशाला मदत केली? उगीच दया येत असते तुला...” “हे बघ त्याचा मुलगा पण छोट्या मोठ्या गोष्टी विकत होता- तो गोड खाऊ खाण्याच्या वयात त्याला तो विकावा लागत होता. ते मला पाहवलं नाही. मी त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी ते पैसे दिलेत.” “त्याने त्याच रात्री त्या पैशाची दारू प्यायली असेल.” “तुला काय माहित रे?” “तुला तरी काय माहित की त्याने त्या पैशाचा वापर मुलाच्या शिक्षणासाठी केला असेल?” “तो म्हटला होता की मी माझ्या मुलाला uniform घेतला की दाखवायला पहिला तुमच्याकडे घेऊन ये...