Skip to main content

Posts

Showing posts with the label self help

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

मिटता काजळी, दीप उजळी!

  A click by : Varun Bhagwat  मशाल जळत होती. त्यातून निर्माण होणारी आग केसरी, गडद पिवळा रंग झळकवत होती. त्या आगीतून तयार होणारी आभा त्याच्या मुखावर पसरली. मुखावर तेज दिसू लागलं. आजूबाजूला मिट्ट काळोख. केवळ चेहऱ्यावर आगीची आभा, त्यामुळे येणारं तेज, आणि शांत उभा असलेला तो!  अंधारात असणाऱ्या कोणासाठीही एक प्रोत्साहन होतं ते चित्र! इतका मिट्ट काळोख आयुष्यात निर्माण झाला तरी इवलासा प्रकाश तमाचा अंत करू शकतो. "पिछे मेरे अंधेरा, आगे आँधी आँधी हैं, मैंने ऐसी आँधी में दिया जलाया है|" या गुलजार जींच्या ओळी तंतोतंत तिथे बसल्या. ते चित्र प्रेरणा देत होतं की कितीही नकारात्मकता असली तरी एक छोटी ज्योत सारं काही उजळून टाकते. आग ही खरंतर विध्वंस करणारी गोष्ट देखील आहे. परंतु हाच अग्नी पंच महाभूतांपैकी एक आहे. It's a source of energy. तिमिरातून तेजाकडे जाताना हा अग्नी मदत करेल. मनात हा अग्नी सतत प्रदीप्त असायला हवा. तोच ऊर्जा देतो. मशाल तर खूप जास्त प्रकाश देते. पण एक छोटी पणती सुद्धा तिचा परिसर समृद्ध करते. आपण आपल्या परीने पणती होऊ शकतो, मशाल होऊ शकतो. इतक्याशा प्रकाशाने काय होणार?...

स्वयंप्रकाशी तारा...

  A click by : Varun Bhagwat सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो? त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे. मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का? किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का? त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का? सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.) विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धा...

काय बदललं? फक्त कॅलेंडर?

A click by: Sushil Ladkat काय बदललं? फक्त कॅलेंडर! रोजचा सूर्य तसाच उगवला आहे. सुर्यास्तसुद्धा तसाच, सकाळ तशीच आहे. काय बदललं? फक्त कॅलेंडर! गरमागरम चहानेच दिवसाची सुरूवात होत होती, आजही तशीच होते आहे. काहींचा आळसाने दिवस सुरू व्हायचा, काहींचा उत्साहाने. आजही तेच घडतंय. मग काय बदललं? केवळ कॅलेंडर! वर्तमानपत्रात काल बातम्याच आल्या होत्या, आजही बातम्याच आल्या आहेत. केवळ वर्तमानपत्रावरील तारीख बदलली, वर्ष बदललं. काल ३१ तारीख होती, आज १. दर महिन्यात असतं हे, मग बदललं काय? फक्त कॅलेंडर! आजूबाजूला असणारी माणसं तीच आहेत, रोजची कामं तीच असणार आहेत. काय बदललं? फक्त कॅलेंडर! दिवस २४ तासांचाच राहिलाय, कामाची वेळही तीच राहिलीय. काय बदललं? फक्त कॅलेंडर! . . कष्ट तितकेच आहेत, त्यात काही बदल नाही. रोजची काम तीच आहेत, रुटीन तसंच आहे. बदललं काय, केवळ कॅलेंडर! . . सगळं खरंय, पण माणसाला काही ना काही बदल घडलाय किंवा घडेल (चांगला) हे वाटण्याची संधी आहे हे बदलणारं कॅलेंडर! सूर्य तोच असला तरी उत्साह नवा आहे असं सांगतं हे कॅलेंडर! कॅलेंडर फक्त बदलत नाही, जुनं जे नको आहे ते विसरुन पुढे जायला शिकवतं. जे चांगलं ...

Bounce Back करणं एक challenge च!

A click by Sushil Ladkat Come back किंवा bounce back करणं हे फार risky , अवघड पण तितकंच challenging आहे. तसं म्हणलं तर कोणती गोष्ट अवघड नाही?? एखादी गोष्ट प्रथमच करून पाहणं किंवा एखाद्या नव्या गोष्टीत पदार्पण करणं कदाचित तुलनेनं सोपं! पण हे bouncing back प्रकरण आपला जीव काढतं. नवं सुरु करणं आणि पुन्हा नव्याने सुरु करणं यात दिसायला खूप छोटा फरक दिसतो. तो फरक म्हणजे फक्त 'पुन्हा' या शब्दाचा! दिसायला छोटा पण असायला फार मोठा आहे हा फरक! नवं सुरु करणं is like नवा संसार उभारणं, ज्याला कष्ट पडतात. स्वाभाविक आहे. नवंच आहे ना ते! पण नव्याने सुरु करणं म्हणजे मोडलेला, पडलेला संसार पुन्हा उभारणं! बघणाऱ्याला वाटतं या आधी हे त्याने केलंय , नव्याने करायला तितकेसे कष्ट नाही पडणार! पण किंबहुना थोडे जास्तच कष्ट पडतात! जसा एखाद्या चांगल्या batsman चा form हरवतो आणि तो team च्या बाहेर फेकला जातो. पुन्हा team मध्ये येण्यासाठीचा त्याचा struggle बघण्यासारखा असतो.. नवख्या माणसाने शिकण्यासारखा असतो. कारण यात emotions चा कल्लोळ असतो. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःबद्दल वाढलेल्या अपेक्षा, आधीचं failu...

रागाच्या भरात…

  मनोज आज त्याच्या psychologist कडे गेला. एकूणच routine बोलणं झाल्यानंतर dr. साटम यांनी एकच प्रश्न विचारला- “राग पटकन येतो ना तुम्हाला Mr. मनोज?” आपल्या रागाचा आपल्याला फार अभिमान आहे अशा थाटात मनोज उत्तरला, “अर्थात.” खरंतर राग येणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. पण मनोज मात्र आपल्या रागाचं समर्थन करत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे dr. साटम यांना जाणवलं. ते शांत होते. मनोज बोलत होता, “मी रागावतो , मान्य आहे. पण आता समोरचा चुकतो किंवा कधी नाही घडत गोष्टी मनाप्रमाणे. मग येतो राग.” “यावर काही उपाय असावा किंवा करावा असं नाही वाटत का मग तुम्हाला?” dr. साटम यांनी प्रश्न केला.    “रागावर उपाय असतो?” मनोजचा प्रतिप्रश्न. “ठरवला आणि योजला तर असतो.” साटम उत्तरले. “सांगून बघा मला. Try करण्याचा try करेन.” स्वत:च्याच उत्तरावर मनोज खुश झाला.  डॉक्टरांनी काहीच react केलं नाही. त्यांनी मनोजच्या हातात फक्त एक चिट्ठी दिली. मनोज चिट्ठी घेऊन निघून गेला. त्याने ती चिट्ठी तिथे तरी उघडून बघितली नाही. घरी आला. नेमके त्याच दिवशी त्याचे त्याच्या पत्नीसोबत अगदी क्षुल्लक कारणावरून मतभ...

लिही ना...

  A click by: Varun Bhagwat   - आज पूर्ण पान कोरं सोडलंस ? - सुचलं नाही. - सुचलं नाही की तसा प्रयत्न केला नाहीस. - केला ना! - मग का लिहिलं नाहीस ? - अरे.. मी केला प्रयत्न.. - मला सांगण्यासाठी म्हणशील केला प्रयत्न.. - अरे तू होतास तिथे. किती वेळ तुझ्याकडे पाहत होतो. तुला पटत नाही का ? - जोपर्यंत मी शाईने नाही भिजत तोपर्यंत मला नाही पटत. - पण मी. - हे बघ. मला कळतंय. - काय कळतंय ? - तुला quality भारीच हवी आहे तुझ्या लिखाणाची. - अर्थात. - आणि म्हणूनच तू माझ्यावर अर्थात या कागदावर एक शब्द सुद्धा न उमटवता निघून जातोयस. - कदाचित. - कदाचित नाही.. हेच खरं आहे. - बरं मान्य. - तू लिहिलेलं चांगलं आहे की नाही हे लिहील्याशिवाय कसं कळेल..? - म्हणजे ? - अरे तुला वाटतंय की तुला quality stuff सुचत नाहीये. - हां. - पण जोपर्यंत तू माझ्यावर प्रयोग करत नाहीस तोपर्यंत तुलाही कळणार नाही. कधी कधी लिहायला घेतलं की सुचत जातं. कधी कधी अगदी वाईट लिहिलं जाईल. पण वाईट लिहिण्याला घाबरु नकोस. लिहिता हो. लिहिलेलं वाईट आहे असं अनेकदा आपल्याला वाटतं किंवा कधीकधी स्वतःचं लिखाण स्वतःला...

वेड्या मना...

  A click by Varun Bhagwat मन गांजलेलं असतं. मन थकलं- भागलेलं असतं. मन कंटाळलेलं असतं. मन रुसलेलं असतं. मन चिडलेलं असतं. मन त्रासलेलं असतं. हे मन असतं. आज असं तर उद्या तसं असतं. किती समजावलं तरी त्याला हव्या त्याच गाडीने ते प्रवास करत असतं. पूर्वसूचना देऊनही त्याला हव्या त्याच वेगाने ते धावत असतं. मन अवखळ असतं. मन चपळ असतं. मन खोलात जाऊन विचार करत असतं. मन खलबतं मांडत राहत असतं. मन स्वतःलाच छळत राहत असतं. मन विचार करत असतं पण अतीशय अविचाराने वागत असतं. मन कधी पाठिंबा देत असतं तर कधी विरोध करत असतं. मन स्वतःच स्वतःशी विरोधाभासी वागत असतं. मन वेडं असतं. मन शहाणं असतं. मन करत असतं. शरीर भरत असतं. कधी शरीर काही करून बसत असतं. मग मन ते भरत बसत असतं. मनाला विचारावं तर ते मनासारखं वागणार असं म्हणत असतं. मन सतावत असतं. मन मनवत असतं. मन गच्च असतं. मन मोकळं असतं. मन मनात अराजक माजवत असतं. मनच मनाची समजूत घालत असतं. मन हरत असतं. मन जिंकत असतं. मन झुरत असतं. मन प्रेमात पडत असतं. मन खात असतं. मन कुठेही, कधीही जात असतं. मन मानेल ते सांगत असतं. मन मानेल तसं करायला लावत असतं. मन रुसत असतं. मन फसत ...