Skip to main content

Posts

Showing posts with the label Mental Health

तिची आठवण!

A click by: Varun Bhagwat  सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको. पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट. पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं. हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' कर...

स्वीकार केला की सोपं होतं!

  A click by: Varun Bhagwat  तो थकून आडवा पडला होता. छताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नाही अशी एक भावना निर्माण झाली. नीट पाहिलं तर अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतातच. हे प्रत्येकाच्या बाबतीत, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात लागू होतं. साऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि असं होऊ शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. ज्यांना आपलं मानलं ते जर आपापलंच पाहू लागले तर? ही भावना खरंतर त्रासदायक आहे. पण प्रत्येक जण आपापलं पाहणारच. यात गैर काही नाही. हा स्वीकार केला की सोपं होतं. कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये. ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवा तसाच वागतो. ह्याचा एकदा स्वीकार असला की मग सोपं होतं. Routine हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं. नेहमीच दुसरं कोणी आपलं मनोरंजन करेल असं नाही. किंबहुना आपलं आपल्यालाच आपला 'दोस्त' होत self entertain करावं लागतं. हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमू शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं. आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही. उलट आपले निर्णय आपणच घ्यावे. बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपलीच असेल याचा स्...

सुट्टी

A click by- Varun Bhagwat (pic name- Ray of hope) निशिकांत सकाळीच थोडासा पडलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघाला. नीट हाय, हॅलो, बाय, असं काहीच त्याच्या पत्नीशी न करता त्याचा दिवस सुरू झाला. कामावर पोचला, मन लागेना. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं. तसं ह्याचं मन घरीच राहिलं होतं. ते सगळं बॅड मूड वालं बॅगेज घेऊन तो कामावर आला होता. काम धड होईना, तिची आठवण होऊन उपयोग पण होईना. त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ तारीख होती. घड्याळात ९.०० वाजले होते. बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं. "येऊ?" निशिकांतने दरवाजा हलकेच ढकलत विचारलं. नुसतं फाईल कडे बघत हातानेच "कम इन" असं न म्हणता बॉस छान हसला, म्हणाला, "या, आत या. बसा." निशिकांत खुर्ची मागे सारत सरांसमोर बसला. "ऑल वेल?" बॉसचा प्रश्न. "हां." निशिकांतचं उत्तर. "वाटत नाही....

आठवणी- हवेहवेसे त्रास

  A click by: Varun Bhagwat "आठवणी." "त्यांचं काय?" "या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये." "का लावून घेऊ नये?" "त्रास देतात या आठवणी." "अगं, याच आठवणी जगवतात. याच आठवणी जगण्यात मजा आणतात. याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात. आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात." "हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते." "हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपा...

एकटं वाटलं आणि...

  कामाचं ठिकाण. कामात थोडया वेळाचा ब्रेक होता. मी खुर्चीवर बसलो होतो. ३ जण शेजारी होते. अचानक एकाच वेळी निरनिराळ्या कारणांनी ते तिघे उठून तीन दिशांना गेले. मी तिथे एकटाच. एकदम एकटा पडलो असं वाटलं. एकटा पडलो होतो, एकटं वाटत होतं की एकटं वाटत होतं म्हणून एकटा पडलो होतो? काही कळत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक जण काहीतरी करण्यात व्यस्त. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं. की मीच कोणाशी बोलत नव्हतो? की मी कोणाशी बोलत नव्हतो म्हणून माझ्याशी कोणी बोलत नव्हतं? की कोणी माझ्याशी बोलत नव्हतं म्हणून मी कोणाशी बोलत नव्हतो? मग नीट पाहिलं. प्रत्येक जण तिथे एकटा होता. म्हणजे माणसं खूप होती पण सगळे एकत्र नव्हते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात होता. स्वतःतच व्यस्त होता. काही जण तिथे खरोखरीच स्वतःच्या कामात व्यस्त होते. मात्र अनेक जण नुसतेच एकटे होते, जे खरंतर संवाद साधू शकत होते. अगदी सहज एकमेकांशी बोलू शकत होते. पण तसं घडत नव्हतं. ते पण माझ्यासारखंच स्वतःला एकटं समजत होते? . गंमत आहे सगळीच. मी बोलायला पुढाकार घेत नाही किंवा समोरचा घेत नाही यावरून कितीतरी संवाद होता होता राहून गेले असतील? कितीतरी ...

करीत राहायचं!

  A Click by: Varun Bhagwat राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते. राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते. सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?" राघव इलुसं हसला. सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?" राघव त्याच्य...

आपलं विश्व!

मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही. ते रमणं महत्त्वाचं, ते रममाण होणं महत्त्वाचं! भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं! एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही. सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल...

शांत, निवांत, मनातलं!

  A click by Varun Bhagwat एका शांत, निवांत स्थळी मी जाऊन बसलो. एकदम जाणवलं की ही शांतता किती गरजेची होती आणि कितीतरी दिवसापासून हवीशी होती. मिळालं नाही की त्या गोष्टीचं महत्त्व जास्त समजतं हा मनुष्यस्वभाव वेळोवेळी दिसतो. आपण शांतता शोधतो, ती शोधेपर्यंत किती कल्लोळातून जावं लागतं. किती कोलाहल, दंगा, गडबड, गोंधळ चालू असतो आणि या दिव्यातून पार झालं की मग लाभते शांतता. या सगळ्यातून न जाताच शांतता मिळेलही पण मग आत्ता जितकं जाणवतंय तितकं त्या शांततेचं महत्त्व जाणवणार नाही, समजणार नाही. माणूस एक अजब प्रकार आहे. फार शांतता झाली तरी सुन्न पडतो. काय करावं समजत नाही. सारखा समतोल हवा असतो. आयुष्यात इतका जर समतोल असता तर आयुष्याची रेषा (ECG) सरळच राहिली असती. पण असं चालणार नाही. ती रेष सरळ झाली की विषयच संपला. चढ आहे म्हणून उताराचं महत्त्व आहे आणि उतार आहे म्हणून चढाला किंमत आहे आणि तो चढ चढून वर जायला पण फार किंमत मोजावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे. या शांततेच्या महत्त्वाचा शोध घेताना कितीतरी गोष्टी शोधल्या जातात. आपला आपल्याला श्वासोच्छ्वास ऐकू आला की कळतं आपण आहोत. हा श्वास आपलं जिवंत असणं अध...

मन- मस्त!

A click by Varun Bhagwat एक सुंदर वाक्य वाचनात आलं आणि लक्षात आलं की किती खरं आहे ते. लिहिलं होतं की काही तास एखाद्या गोष्टीवर खूप विचार करण्यापेक्षा काही मिनिटं त्याच्यावर काम करणं अथवा काही मिनिटात ते करून टाकणं हे जास्त श्रेयस्कर आहे. असं केल्याने आपलं मन थाऱ्यावर राहतं. नवा विचार करण्यासाठी डोकं जागेवर राहतं. कारण एखाद्या कामाचा जेव्हा नुसता विचारच केला जातो (कृतीविना), तेव्हा काहीही घडत नाही. वाया जातो तो वेळ, वाया जाते ती ऊर्जा ती सुद्धा निष्कारण! किती विचार करायचा आणि कुठे थांबवायचा हे आपलं मन ठरवतं. आता मन म्हणजे आपणच, मव आपणच ते वेळेत ठरवायचं आणि विचार करून कृती करून टाकायची. यामुळे त्याच गोष्टी आवण घोळत बसत नाही, पटकन पुढे जातो अर्थात पुढची वाटचाल सुरू करतो.  होतं असं की याने आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहायला मदत होते. गमतीचा भाग असा, खरं तर हा भाग गमतीचा नाही पण एकूणच आपल्याकडे मानसिक आरोग्याला फार कमी लेखलं जातं, कमी महत्त्व दिलं जातं.  शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यालाही महत्व आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यावर बोलणारे अनेक लोक आहेत पण तरीसुद्धा त्याकड...

शांतपणा...

  A Click by: Sushil Ladkat माणसाला दिवसभर थकल्यानंतर गरज   असते शांततेची. अनेकदा ही हवी असणारी शांतता त्याच्या नशिबी असतेच असं नाही. कधी कधी थोडीशी संधी मिळते पण नेमकं काही ना काहीतरी घडतं आणि शांतता भंग पावते. मात्र ही हवी असणारी शांतता नक्की शोधावी. प्रत्येकाने शोधावी. अनेकांना त्याची गरज जाणवत नाही पण ती गरजेची असते हे ती अनुभवल्यावर कळतं. या शांततेतून मिळतं तरी काय? मिळतो तो स्वतःसाठी गरजेचा असणारा पण आजकालच्या धकाधकीत माणूस स्वतःलाच न देऊ शकणारा वेळ.   रोजची चाललेली धावपळ कशासाठी हे पुनःश्च एकदा चाचपून पाहण्याची संधी ही शांतता देते. शांतता आपल्याला आपल्या passion कडे नेते. रोजमर्रा च्या आपल्या आयुष्यात आपण अनेकदा आपली passion च विसरून जातो. या शांततेत एक chance असतो त्या passion ला शोधण्याचा. ज्यांनी शोधली आहे त्यांना ती जगण्याचा. बाकी सगळं राहू दे बाजूला. ही शांतता किमान आपल्या थकल्या जीवाला थोडी शांती देऊन नव्या दिवसासाठी ताजतवानं तरी करते.   हिला कमी लेखता कामा नये. ही आपल्याला थोडसं busy जगातून unbusy व्हायला शिकवते. Unbusy व्हायचं म्हणजे नक्की काय कराय...

मैत्री-ण

A click by: Varun Bhagwat ती आणि विराज बोलत होते. तिचं कवी-मन म्हणत होतं , " दोस्त , सखा , मित्र , यार... रक्ताच्या नात्याहूनही जवळचा वाटतो ना फार!!" विराज विचारात पडला आणि म्हणाला , " हो ना... मैत्रीचा जन्म कधी होतो हे लक्षात येतंच असं नाही." "Yes, पण जन्माला आलेली मैत्री मरेपर्यंत साथ निभावते." ती पटकन म्हणाली. " आपल्याकडे जुनं हिंदी गाणं सुद्धा हेच सांगतं- "ये दोस्ती , हम नहीं तोडेंगे। तोडेंगे दम , मगर तेरा साथ ना छोडेंगे।" " सखा हे नाव किती छान वाटतं ना रे ?" " मित्राशी आपलं सख्य असतं म्हणून तर आपण त्याला सखा म्हणतो आणि कायम साथ निभावतो म्हणून तो आपला साथी असतो..." " नुसता मित्र मिळणं सोपं आहे ; पण खरा मित्र मिळणं अवघड!" ती विचारपूर्वक बोलत होती. " पण एकदा का खरा मित्र मिळाला की आयुष्य नक्कीच सोपं होऊन जातं." विराज म्हणून गेला. " आयुष्य नाही सोपं होत , आयुष्य अवघडच असतं ; पण ते सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी ताकद देतो तो मित्र!" " हो हे मात्र खरंय! मैत्री कोणामध्ये होऊ...