Skip to main content

Posts

Showing posts with the label people

क्षितीज

तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग. खरंच ह्या सागराला अंत आहे का? अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो? असे प्रश्न त्याला पडले. ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं." "म्हणजे?" त्याने प्रश्न केला. ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न." तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो." ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर." तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?" "जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं. "पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला. ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं." "पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला. ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अ...

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

मान्य आहे!

  "कोरा कागद घेऊन बसलो आणि ठरवलं की आता काहीतरी लिहावं." "मग?" "सुचत नाहीये." "असं का?" "माहीत नाही. खरंतर सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. पेन, पेपर, टेबल, शांत जागा." "इतकं पुरतं की अजून काही लागतं?" "लागतं." "काय?" "लिहिण्याची भूक आणि कागदावर काहीतरी छान उमटवण्याची मनापासून इच्छा!" "मग ती नाहीये का तुझी?" "ती पण आहे?" "मग आज कागदावर काही उमटत नाही असं सुरुवातीलाच का म्हणालास?" "कारण खरंच उमटत नाहीये." "म्हणजे भूक आणि इच्छा कमी पडली का?" "काहीतरी पडतं कमी. पण ते कमी पडतं हे पण मान्य करता यायला हवं" "म्हणजे?" "म्हणजे भूक आणि इच्छा याही पलीकडे मला आज लिहिता येत नाहीये, सुचत नाहीये हे मी सांगतोय." "तुला येत नाहीये हे कशाला सांगतोय?" "म्हणजे?" "तू ते लपवू शकतो. लिहायला वेळ नाही असं सांगू शकतोस येत नाही, सुचत नाही हे सांगायचं कशाला?" "वेळ आहे, जागा आहे. पण आत्ता सुचत नाह...

तिची आठवण!

A click by: Varun Bhagwat  सोडून गेली याहूनही अधिक अजूनही आठवणीतून गेली नाही याचं जास्त वाईट वाटत होतं त्याला... मग विचार आला की तिची आठवण कशी निघून जाईल? माणसं जातात, त्यांच्या आठवणी राहतात. आठवण राहते याचं वाईटच अधिक वाटत राहतं. कारण चांगल्या आठवणी आठवल्या की आता 'ते क्षण' नाहीत म्हणून वाईट वाटतं. वाईट आठवणी आठवल्या की त्या आठवताना अंगावर काटा येतो नि तो म्हणाला की या वाईट आठवणीच नको. पण त्याला काहीच बदलता येत नव्हतं. परिस्थितीचा स्वीकार हा एकमेव उपाय होता. हा उपाय दिसतो सोपा, पण अमलात आणणं फारच मुश्किल. स्वीकार करायला मनाचं खूप मोठं स्थैर्य लागतं. हे स्थैर्य प्राप्त करायला मनावर नियंत्रण लागतं. मनावर नियंत्रण आणणं हे ज्याचं त्याचं कसब.. अशक्य नाही पण फार अवघड गोष्ट. पण त्याने ठरवलं. मनाचा हिय्या करून पुढचं आयुष्य उत्तम पद्धतीत जगण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय घेणं सुद्धा सोपं नाही. असा निर्णय घेताना स्वतःला शाबासकी द्यायला विसरायचं नाही. कारण मनातून खचल्यावर, कोणी जवळचं सोडून गेल्यावर माणसं आतून पूर्ण तुटतात. सावरणं अवघड असतं. हे जमलं म्हणजे 'पुन:श्च हरी ओम' कर...

सुट्टी

A click by- Varun Bhagwat (pic name- Ray of hope) निशिकांत सकाळीच थोडासा पडलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघाला. नीट हाय, हॅलो, बाय, असं काहीच त्याच्या पत्नीशी न करता त्याचा दिवस सुरू झाला. कामावर पोचला, मन लागेना. शरीराने माणूस इप्सित स्थळी पोहोचला तरी मन सैरावैरा फिरत राहतं. तसं ह्याचं मन घरीच राहिलं होतं. ते सगळं बॅड मूड वालं बॅगेज घेऊन तो कामावर आला होता. काम धड होईना, तिची आठवण होऊन उपयोग पण होईना. त्याने डेस्क वर पाहिलं. कॅलेंडर आणि घड्याळ त्याच्याकडे पाहत होतं. आज महिन्याची १५ तारीख होती. घड्याळात ९.०० वाजले होते. बॉसला अंदाज आला. अंदाज म्हणजे काय की नेहमीसारखं काही आज दिसत नाही हे केबिन मध्ये बसून ट्रान्सपरंट काचेतून बॉस ऑबजर्व करत होता. कामाचं निमित्त साधत बॉसने निशिकांतला केबिन मध्ये बोलावलं. "येऊ?" निशिकांतने दरवाजा हलकेच ढकलत विचारलं. नुसतं फाईल कडे बघत हातानेच "कम इन" असं न म्हणता बॉस छान हसला, म्हणाला, "या, आत या. बसा." निशिकांत खुर्ची मागे सारत सरांसमोर बसला. "ऑल वेल?" बॉसचा प्रश्न. "हां." निशिकांतचं उत्तर. "वाटत नाही....

आठवणी- हवेहवेसे त्रास

  A click by: Varun Bhagwat "आठवणी." "त्यांचं काय?" "या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये." "का लावून घेऊ नये?" "त्रास देतात या आठवणी." "अगं, याच आठवणी जगवतात. याच आठवणी जगण्यात मजा आणतात. याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात. आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात." "हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते." "हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपा...

आठवणींची पेटी!

  A click by : Sushil Ladkat अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा.  आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत. छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच.  कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान." असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर. अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flas...

ए पोरा...

  A click by: Sushil Ladkat केतन सवयीप्रमाणे व्यायामाला एका club मध्ये जायचा. Routine ठरलं होतं. जिथे तो व्यायामाला जायचा तो एक sports club च होता. त्यामुळे club च्या member व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश नसे. आज अचानकच केतनला आतमध्ये असणाऱ्या security guard ने अडवलं. केतन member होता, पण तरी त्याला अडवलं होतं. केतनला या गोष्टीची चीड आली. नुसतं अडवण्याची नव्हे तर अडवण्याच्या पद्धतीची. Guard ने चुटकी आणि टाळी वाजवत हाताचा इशारा केला आणि म्हणाला, "कुठं चालला रे?" केतन तरीही चालत राहिला. Guard चिडला. तो वयस्कर होता तरीही केतन दुर्लक्ष करतोय हे पाहून अजून मोठ्या आवाजात मोठ्या कष्टाने थोडं जवळ येऊन म्हणाला, "विचारलेलं कळत नाही का?" केतन थांबला. झटकन म्हणून गेला, "का थांबू? इथे रोज येतो मी." "पण मी इथं नवीन आहे." "मी जुना आहे." "तुझ्या गळ्यात club चं card नाही." केतन अरेरावी करत म्हणाला, "तुम्ही आज आलाय." यावर guard चा आवाज अजून चढला आणि म्हणाला, "ए पोरा, मी काम करतोय. तू नाही मला शिकवायचं." "Card माझ्य...

साथी रे!

  A click by : Varun Bhagwat तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना." तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे." "काय?" "तुझी आठवण!" "अं..." "तुला नाही का गं येत माझी आठवण?" "येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!" "हो गं. पण आपली भेट?" "लवकरच." "नुसती आशा की खात्री?" "खात्री!" "एवढी खात्री कुठून येते?" "आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच." "पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास." "अरे काय कायमचा विरह थोडी आहे?" "हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो." "असू दे थोडा विरह." "प्रेम अजून वाढतं म्हणशील." "हो." "ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!" ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अज...

माणूस प्रेमाचा भुकेला असतो! - भाग २

  A click by Varun  प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही. प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात? 'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते. हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात! पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं. यामुळे, माणसाचं माणूसपण हरवू शकतं. निरागस मन बंडखोर बनू शकतं. प्रेमाची व्याख्या काही नाही. प्रेम विकत मिळत नाही. पण, प्रेम वाटता येतं, प्रेम वाढवता येतं. प्रेम सहज असतं. प्रेम गरजेचं अ...