Skip to main content

जे नकोय ते बाजूला कर!

A click by: Varun Bhagwat


"सुचत नाहीये."
"काय?"
"काहीच नाही."
"असं का?"
"माहीत नाही."
"मला माहितीये."
"मनकवडा आहेस का?"
"हाहा..."
"हसू नको. उत्तर दे."
"सुचत नाहीये म्हणजे छान किंवा नवं काही सुचत नाहीये. बरोबर?"
"हो."
"कारण तुझं मन बाकी विचारांनी preoccupy झालंय."
"As in?"
"आधीच ज्या गोष्टी पटल्या नाहीत, पण बदलणं तुझ्या हातात नाही त्या विचारांनी अस्वस्थ झालायस. किंवा इतरही demotivating thoughts मनात घोळतायत."
"हं. पण मग करू तरी काय?"



"सोड."
"असं कसं सोड?"
"तू ज्याचा विचार करत आहेस ते केवळ विचार करून बदलेल?"
"नाही."
"तू नुसताच गप्प बसून राहिला आहेस का?"
"नाही. मी try केला काही प्रमाणात जे पटत नाही ते बदलण्याचा. थोडा demotivate झालो तर स्वतःला push करण्याचा."
"आणि?"
"थोडं बदललं."
"Good."
"Good काय? बाकीचं..."
"सगळं कसं मनासारखं होईल?"
"कळतंय मला."
"मग वळत का नाही?"
"कारण काय करावं समजत नाही."
"सोड."
"म्हणजे?"
"Make peace with it."
"काय?
"हो. शक्य होतं ते तू केलंस. बाकी तुझ्या हाताबाहेर आहे. मग जितका चांगला बदल तुझ्या परीने करू शकलास त्याबद्दल आनंदी राहा. नाहीतर कायमच असंतुष्ट राहशील. नाही त्या विचारांनी preoccupy राहशील. नवं सुचणार नाही."



"पण मग मी पळ काढतोय असं वाटतं!"
"मुळीच नाही. पळ काढणारा माणूस हा घाबरून त्या घटनेचा विचारच करत नाही. तू अती- विचार करतोस. मध्य गाठायचा प्रयत्न कर."
"कसा?"
"हे बघ. तू पळपुटा नाहीस. तू झाल्या घटनेला, आल्या परिस्थितीला भिडणारा माणूस आहेस. एकच कर. तुझ्याकडून सारं करून झालं की मग सोडून दे. काही जण विषय सोडून देतात, काही जण पळ काढतात.  मी तुला गोष्टी सोडून द्यायला सांगतोय, पळायला नाही. दोन्ही गोष्टी भिन्न आहेत."
"कशा?"



"सोडून देणं म्हणजे मी म्हणालो तसं to make peace with it. मी पूर्ण प्रयत्न केले. त्यापुढे practically काही करणं शक्य नसेल तर विचार करायचा नाही. नाहीतर मनात गोष्टी धुमसत राहतात. ते बरं नाही. तलवार म्यान करायची नाही. पण अकारण दिशाहीन फिरवायची पण नाही. योग्य वेळ आली की पुन्हा आपलं म्हणणं मांडण्याची संधी येते. धुसफूस करून उपयोग नाही, कारण त्यातून काही साध्य नाही. म्हणणं इतकंच आहे की अकारण न होणाऱ्या गोष्टी imagine करत रक्त जाळत राहणं बरं नाही. विचारांना पटकन बांध घालणं अवघड असतं. ते धावतात अश्वासारखे. ती घोडदौड थांबवायला लगाम आपल्या हाती हवा. वेळीच declutter करता आलं पाहिजे. त्या त्या वेळेला बोलून मोकळं व्हावं. मग नंतर मी हे केलं असतं, ते केलं असतं ही भावना राहत नाही."
"तशी भावना राहिलीच तर?"



"तर मग पुन्हा बोलून पाहायचं. प्रयत्न करायचा. पण डोक्यात ठेवायचं नाही. धुमसत राहिलं की अनेकदा चुकीच्या वेळी ते बाहेर पडण्याची शक्यता असते. यात नेमकी चांगली नाती बिघडण्याची शक्यता असते."
"Mind Declutter करणं, I mean नको त्या गोष्टी मनातून काढून मन ताजं करणं गरजेचं आहे हे पटतंय मला, पण..."


"पण काय?"
"काही नाही."
"विचार येतात."
"ते येणारच."
"कोणते विचार जास्त प्रभाव करतात त्यावर सारं अवलंबून. त्यांना काही प्रमाणात काबूत ठेवणं तसं तर आपल्या हातात नाही, पण म्हटलं तर आपल्याच हातात आहे. कारण त्या विचारांना shape आपणच देऊ शकतो. Try देऊन बघ. हे करण्यात नुकसान नक्की नाहीये म्हणून म्हणतोय. नवे विचार डोक्यात शिरू द्यायचे असतील तर शिळे आणि नकारात्मक विचार, मन आणि डोकं occupy करून टाकणारे नकोसे विचार बाजूला ढकलायला हवे ना! तर तुझी सर्जनशीलता समोर येईल. तुलाही कामात मजा येईल. तू फार sensitive आहेस. Sensitive माणसं लवकर दुखावतात. लवकर स्वतःला त्रास करून घेतात. १०० चांगल्या विचारांवर १ नकोसा विचार भारी पडतो. हो की नाही?"

त्याने होकारार्थी मान डोलावली. त्याला मनोमन पटलं. किंचित हसला. काही काळ तसाच शांत बसला.

- वरुण भागवत

Comments

  1. Very very nice because this thing is happen with me due to which I am deeply relate and now I now what I want to do.

    ReplyDelete
  2. I am your big fan, since i saw you in dnayeshwar mauli.
    Your blogs are too awesome and inspiring!
    I also write articles and poems on my blog readtorefresh7.blogspot.com
    Do visit,and comment if you like.
    All my best wishes to entire team of dnayeshwar mauli.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...