Skip to main content

स्वयंप्रकाशी तारा...

 

A click by : Varun Bhagwat


सूर्यनारायण सारं विश्व प्रकाशमान करत असताना मी काय करत असतो?

त्या भास्कराकडून प्रकाश घेणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. अर्थात ती सुद्धा जमावी लागते. अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात, दिसत असतात. आपल्याला काहीतरी देत असतात, म्हणजेच देण्याचा यत्न करत असतात. घेणं सर्वथा आपल्यावर आहे.

मग विचार आला की खरंच मी त्या गोष्टी घेतो का?

किमान त्या घेण्याची तयारी दर्शवतो का?

त्याच्याही आधी त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं तरी का?



सकाळ झाली. रोजच होते म्हणा. परंतु ज्या सकाळी मी माझ्या आळसाला लाथाडून जागृतावस्थेत येतो, तेव्हा जाणवतं की सकाळही सुंदरही असू शकते. ती सुंदर सकाळ अनुभवल्यावर मग मला कळतं की आपल्या झोपेहून अधिक सुखावह काहीतरी असतं. काय? तर हा सुंदर प्रकाश. (तसा हा प्रकाश डोक्यात पडायला वेळ लागतो, पण तो पडतो हे महत्त्वाचं.)



विश्व प्रकाशाने उजळत जातं. तो प्रकाश आपल्याला नवा उत्साह देतो. उगवणाऱ्या आदित्याला मी वंदन करत दिवसाची सुरूवात करतो. हा उत्साह मला स्वस्थ बसू देत नाही. मी नव्या दिवसाचा वेग पकडत व्यायामाचं निमित्त करत धावत सुटतो. धावून थोडं थकतो. पण हा दिनकर, त्याचा प्रकाश मला खुणावत असतो.



नकळत हा दिनमणी (सूर्य) विचारत असतो, "इतक्यात थकलास? पूर्ण दिवस तुझ्या हाती आहे. खूप काही अनुभवायचं आहे, उत्तम जगायचं आहे. चल, चल, माझ्यासवे चल. धावला नाहीस, तरी किमान चालत राहा. हा प्रकाश घेत राहा."



मी क्षणभर विसावलो. धावून चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते. पण हलकेच येणारी वाऱ्याची झुळूक सुखावत होती.  कोवळं ऊन हवंहवंसं वाटत होतं. प्रकाश पसरत होता, चेहऱ्यावर. नकळत डोळे हळूच मिटले गेले.


चक्षू अलगद मिटताच मनाच्या आतपर्यंत प्रकाश पसरू लागला. माझे गुरूजी एकदा शिकवत होते की दिव्याची ज्योत जशी सृष्टीला प्रकाश देते तशी अंतर्मनाची ज्योत तेवत ठेवता यायला हवी. तो प्रकाश आपल्यालाही दिसावा नि शक्य तेवढा तो इतरांच्या सुद्धा उपयोगी यावा. ते सोपं नाही. पण अशक्य सुद्धा नाही.



आभाळभर पसरलेला भास्कर स्वयंप्रकाशी तर आहेच आणि अवघ्या विश्वाला उजळून टाकण्याची क्षमता त्याच्यात आहे. दिवसाची मर्यादा त्यालाही आहे. रात्री सूर्यप्रकाश मिळत नाही. पण मर्यादा आहेत म्हणून तो आदित्यनारायण खट्टू होत नाही. कारण त्याला त्याचं ध्येय ठाऊक आहे. हे ध्येय त्याला रोज नवी ऊर्जा देतं. म्हणूनच तर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा सारी दुनिया प्रकाशाने व्यापून टाकतो.


आपणही आपल्या मर्यादा सांभाळत, जमेल तशी त्यावर मात करत आयुष्य उजळून टाकू शकतो. आपलं स्वतःचं आणि जसं जमेल तसं आपल्या सवंगड्यांचं.


आपण स्वयंप्रकाशी तारा असतोच. पण स्वतःत डोकावून पाहत नाही. आपणच आपली प्रेरणा होत नाही. स्वतःच स्वतःची ऊर्जा होणं अवघड असतं, पण प्रयत्नांनी जमतं.


गरज असते ती आळस झटकण्याची. तो झटकला की मग तो प्रकाश झोपेहूनही सुखावह वाटू लागतो. पण तो झटकण्यासाठी पण प्रेरणा लागते, ती प्रेरणा म्हणजे ध्येय.


एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती आधी मला प्राप्त करायची आहे हे स्वतःला समजावलं आणि ती का प्राप्त करायची आहे हे एकदा स्वच्छ आणि स्पष्ट केलं की मग आळसाला वेळ आणि जागाच राहत नाही.


मन प्रकाशित झालं की सारं काही पारदर्शक होऊन जातं. सगळं दृश्य लक्ख दिसू लागतं. सृष्टीतलं नि मनातलंही.


मग थोडा प्रकाश माझ्या डोक्यात उजेड पाडू लागला.

तो सांगू लागला, "जे करशील ते स्वच्छ नि लक्ख कर."


असा प्रसन्न विचार येताच नेत्र अलगद उघडले गेले.

आभाळमाया करणारा रविराज (सूर्य) मला प्रेरणा देत होता, मनाची ज्योत तेवत ठेव असं सांगत होता.


- वरुण भागवत


Comments

  1. खरचं सुर्याचा प्रकाश आपल्याला खुप काही सांगण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या मनातलं ऐकण्यासाठी आपलं मन मात्र स्थिर व निर्मळ असावं लागतं.

    ReplyDelete
  2. खूप छान...!तुम्ही सांगितलं कि सगळं सोपं होऊन जाते समजायला...👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद!!! 😊😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...