Skip to main content

अर्धविराम ;

 

A click by : Varun Bhagwat



किती सांगायचं, किती बोलायचं, किती काय काय करायचं राहूनच गेलं.

आपण एकमकांसोबत नव्हतो की सोबत असून सोबत मिळत  नव्हती आपली एकमेकांना?



खरंतर दोन्ही होतं, पण फार काळ नव्हतं.

अगदी थोडा अवधी आपण सोबत होतो.

पण जितका काळ सोबत होतो त्या काळात खूप छान सोबत केली आपण एकमेकांची!



एकमेकांना वेळ दिला, एकमेकांची काळजी घेतली.

तुझं दुःख माझं मानलं, माझ्या आनंदात तू तुझा आनंद शोधलास.


माझ्या हास्यात हसू शोधलंस.

तुझ्या रडण्यात मी माझे हरवून गेलेले, कोरडे होऊन गेलेले अश्रू शोधले.


माझ्या विनोदांमध्ये पोट दुखेपर्यंत हसलीस. हसता हसता पटकन रडून मोकळी झालीस.

सहज मोकळं होणं, मनातलं बोलून टाकणं तुझ्याकडून तर शिकलो.

किती काळ स्वतःतच हरवलेल्या तुला त्यातून बाहेर काढणं मात्र मलाच जमलं.


तुला चित्र काढताना पाहून वाटलं, ही कला काही आपल्याला जमली नाही गड्या! पण म्हणूनच तुला या कलेत बुडालेलं पाहून मला तुझ्यात रमायला जमलं. 


आपल्या एकत्र असण्यात जान होती.

निखळ मैत्रीची गायलेली सुंदर तान होती.


पण हे सारं फार लवकर संपलं.

खूप काही करायचं राहून गेलं.


खरंतर एकत्र असल्यावर जगाची फिकीर नव्हती.

कोणी आपल्या मध्ये येण्याची आवश्यकता नव्हती.


पण नियती मध्ये आली. तिचं नियोजन वेगळं होतं.

तुला मला एकमेकांपासून दूर करण्यात तिला मजा वाटत होती.

खूप काही बाकी ठेवून आपल्या मैत्रीला ती अर्धविराम देत होती.



मुद्दाम अर्धविराम म्हटलं. कारण माणसाने आशावादी असावं. सहज सोडून देणं सोपं असतं, पण त्यात काय मजा! सहज सोडून द्यायच्या असतात त्या गोष्टी, माणसं नाही.


भेटलो नाही तरी मनात आपली मैत्री राहिलंच. पण तरी तू अन् मी भेटूच अशी आशा आणि खात्री आहे. कारण ही दुनिया गोल आहे नि खूप छोटी आहे;

;


वरची ही गोष्ट अशा सर्वांसाठी, ज्यांच्या आयुष्यात किमान अशी एक किंवा त्याहून अधिक व्यक्ती आल्या ज्यांच्याशी त्यांची निखळ, निरागस, निष्पाप नात्याची नाळ अगदी सहज जोडली गेली. नियतीने त्या नात्याला अर्धविराम दिला. पण ही नाती जपण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला. कधी प्रत्यक्षपणे, कधी अप्रत्यक्षपणे!


ही नाती आपण मनाच्या एका नाजूक कप्प्यात अजूनही जपत असतो.

कधी कोणी दिलेल्या पुस्तकाच्या रुपात;

तर कोणी दिलेल्या अत्तराच्या दरवळात;


कोणी दिलेल्या स्वेटरच्या उबेत;

तर कोणी दिलेल्या पुनःश्च भेटीच्या आश्वासनात;


कोणी दिलेल्या हळुवार खांद्यावर;

कोणी मारलेल्या कडकडून मिठीत;


कोणी दिलेल्या प्रेरणेत;

कोणी बदललेल्या विचारांत;


कोणी साकारलेल्या चित्रात;

कोणी लिहिलेल्या कवितेत;

कोणी सांगितलेल्या गोष्टीत;

कोणी लपवलेल्या डायरीत;


कधी जुन्या गाण्यात;

कधी रस्त्यात दिसलेल्या माणसात;


कधी तप्त भास्कराच्या तापात;

कधी बरसणाऱ्या हलक्या पावसात;


कधी भल्या पहाटे;

तर कधी कातरवेळी


ही नाजूक कप्प्यातली नाती डोकावतात.

कधी सुखावतात, कधी डोळ्यात हलके अश्रू आणतात.

पण काही असो, ही नाती कमाल असतात;


पूर्णविराम देणं बरं नाही या नात्यांना; नाहीतर उगाच नाती संपली की काय असं वाटतं; अर्धविराम देणंच बरंय; कारण अर्धविरामात आशा टिकून आहे;


- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...