Skip to main content

मान्य आहे!

 


"कोरा कागद घेऊन बसलो आणि ठरवलं की आता काहीतरी लिहावं."
"मग?"
"सुचत नाहीये."
"असं का?"
"माहीत नाही. खरंतर सगळ्या गोष्टी जागेवर आहेत. पेन, पेपर, टेबल, शांत जागा."
"इतकं पुरतं की अजून काही लागतं?"
"लागतं."
"काय?"
"लिहिण्याची भूक आणि कागदावर काहीतरी छान उमटवण्याची मनापासून इच्छा!"
"मग ती नाहीये का तुझी?"
"ती पण आहे?"
"मग आज कागदावर काही उमटत नाही असं सुरुवातीलाच का म्हणालास?"
"कारण खरंच उमटत नाहीये."
"म्हणजे भूक आणि इच्छा कमी पडली का?"
"काहीतरी पडतं कमी. पण ते कमी पडतं हे पण मान्य करता यायला हवं"
"म्हणजे?"

"म्हणजे भूक आणि इच्छा याही पलीकडे मला आज लिहिता येत नाहीये, सुचत नाहीये हे मी सांगतोय."
"तुला येत नाहीये हे कशाला सांगतोय?"
"म्हणजे?"
"तू ते लपवू शकतो. लिहायला वेळ नाही असं सांगू शकतोस
येत नाही, सुचत नाही हे सांगायचं कशाला?"
"वेळ आहे, जागा आहे. पण आत्ता सुचत नाही. मला वाटलं ते सांगायला हवं, न लाजता. तेच मी केलं. म्हणून म्हणालो की कागदावर काही उमटत नाहीये."

"चांगलंय."
"काय?"
"मी म्हणलं चांगलंय."
"आं?"
"येत नाहीये लिहायला असं म्हणालास हे चांगलं आहे."
"कसं?"
"अरे हे मान्य करणं चांगलं आहे."
"म्हणजे?"
"अरे आज तुला लिहायला जमत नाही हे सांगता सांगता तू काय केलंस कळलं का तुला?"
"काय?"
"तुला लिहिता येत नाहीये हाच विषय पकडून तू अनेक शब्द गुंफत हा संवाद तयार केलास."
"अरे, हे तर लक्षातच आलं नाही."

"आणि मी अर्थात तुझी ही डायरी तुझं ऐकते म्हणून तिच्यावर तो उतरवून पण काढलास."
"नकळत."
"हो, पण नकळत केलेली ही गोष्ट ४ जणांना कदाचित प्रेरणा देईल."
"कशी?"

"एखादी गोष्ट उत्तम करण्यासाठी basic तयारी आणि ते करावं वाटणं महत्त्वाचं असतं. पण त्याहीपलीकडे जाऊन तू स्वीकार सांगितलास. आपण परिपूर्ण कधीच नसतो याचा स्वीकार. अर्थात आपल्यापाशी लिहिण्याची भूक आणि इच्छा असूनही कधी सुचत नाही, जमत नाही, येत नाही हे बिनधास्तपणे मान्य करणं. केवळ तुझं लिखाण असं नाही. कोणतीही गोष्ट, जी नेहमीची आहे, एखादा त्यात कदाचित तज्ञ असतो. पण कधीतरी ती गोष्ट फार उत्तम किंवा बिलकुल जमत नाही हे सांगणं हा झाला स्वीकार."

"एका बाजूने पाहिलं तर हा पराभव आहे की जमत नाही."
"पण त्याकडे तसं न पाहता अगदी सहज सांगणं की हो, येत नाहीये आत्ता. It's completely okay and should be acceptable.
"हां."
"असं केलं म्हणजे प्रयत्न सोडले असं नसतं. आत्ता या क्षणी जमत नाहीये हे मान्य करायला पण धैर्य लागतं."
"बाप रे. छोटीशी गोष्ट मान्य करणं याबद्दल बरंच काही सांगितलंस तू. मला वाटायचं मान्य करणं, स्वीकार फार सोपा आहे."

"हो स्वीकार सोपाच आहे पण सगळे मान्य नाही करत!"

- वरुण भागवत

Comments

  1. Very nice Varun Da..||☺️||

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे
    पण स्विकार करणाऱ्याला सुद्धा समोरच्या व्यक्तीने स्विकारले पाहीजे.......

    ReplyDelete
  3. मनातली गोष्ट वाचल्यासारखी वाटली. खूप छान लिहिले आहे तुम्ही..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...