Skip to main content

आठवणींची पेटी!

 

A click by : Sushil Ladkat

अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा.  आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत.
छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच.  कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान."

असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर.

अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flash झाली. अनयचं भरभर पानं सरकवत जाणं थांबलं. तिच्या आठवणी एकदम डोळ्यासमोरून सरकू लागल्या. इथे अनयच्या मनाचा कॅमेरा फ्लॅशबॅक मध्ये गेला. त्याला जाणवलं हा मनाचा कॅमेरा काय काय टिपतो आणि तयार करतो अगणित आठवणींची पेटी. या पेटीत आपल्याला हवं ते दिसतं. पण तरीही त्या आठवणींवर आपला ताबा नसतो. कोणती आठवण, कोणाची आठवण किती काळ छळेल, कधी आनंद देईल याला काही मर्यादा नसते.

ही आठवण जितका आनंद देते तितकाच छळ मांडते. तशीच अनयची अवस्था झाली होती. त्याला ती दिसली, पण digitally. त्या तशा असण्याला अर्थ होता पण आणि नव्हता पण. तिच्यात आणि त्याच्यात आता खरं काहीच उरलं नव्हतं. पण तरी ती होती, मनाच्या कप्प्यात, कॅमेऱ्याच्या पेटीत बंद.

अनय पुढे सरकला. Move on झाला. तिच्यापासून झाला की नाही हे त्यालाही सांगता येत नव्हतं पण हां, त्या photo पासून move on झाला.

पुन्हा एक photo आला, त्यामध्ये होते त्याचे आई वडील. अनयचे ओघळणारे अश्रू ओघळून आईच्या photo मधल्या पापण्यांवर अलगद विसावले. Screen वरचे अश्रू पुसण्याच्या नादात touch screen असल्याने पुढचा photo open झाला.

आता फोटोत होता निर्झर. खळखळ वाहणारा. अनयचं मन वाहतं झालं. त्याला नवंचैतन्य देऊन गेलं.

एक photo, एक आठवण असं करता करता कितीतरी आठवणींची माळ गुंफली गेली. अनय क्षणभर थांबला. Digital सफरीतून बाहेर पडला. विचारमग्न झाला. स्वतः लाच म्हणाला की या आठवणीत रमता रमता तिथेच नुसतं रमून जायला नको. या आठवणी सुद्धा काय अशाच बनत नाहीत. नवे अनुभव, नवी माणसं, नवी आव्हानं यांना पार करत पुढे जायचं. मग क्षणभर विश्रांती घेत मागे वळून पाहायचं. आठवणींचा सिनेमा डोळ्यासमोरून जातो. यातले काही क्षण त्या कॅमेऱ्यात टिपले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव पुन्हा त्या आठवणींच्या पेटीत डोकावून जगता येतात. हा कॅमेरा हे टिपतो, पण या आठवणीतले बारकावे लक्षात ठेवतो तो मनाचा आणि डोळ्यांचा कॅमेरा.
म्हणूनच या खऱ्या आणि डोळ्यांच्या कॅमेऱ्यात काही ना काही टिपलं पाहिजे. त्यासाठी explore केलं पाहिजे. मग बनतात आठवणी. मग थोडं थांबावं वाटलं की त्या आठवणींचं अंथरूण बनवून निवांत पडायचं. मग पुन्हा पुढे निघायचं.

हा विचार करता करता अनयचं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं. तो कॅमेऱ्याकडे पाहू लागला. क्षणभर हसला. कॅमेरा उचलून बाहेर जाऊ लागला. कॅमेरा गळ्यात घालताना कॅमेऱ्याला उद्देशून म्हणाला, "चला, नवीन आठवणी बनवायला जाऊया."

- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...