Skip to main content

स्वीकार केला की सोपं होतं!

 

A click by: Varun Bhagwat 


तो थकून आडवा पडला होता. छताकडे बघितलं. त्याच्या हातात काहीच नाही अशी एक भावना निर्माण झाली. नीट पाहिलं तर अनेकदा आपल्या हातात गोष्टी नसतातच. हे प्रत्येकाच्या बाबतीत, आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यात लागू होतं. साऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि असं होऊ शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं.


ज्यांना आपलं मानलं ते जर आपापलंच पाहू लागले तर? ही भावना खरंतर त्रासदायक आहे. पण प्रत्येक जण आपापलं पाहणारच. यात गैर काही नाही. हा स्वीकार केला की सोपं होतं.


कोणी कसं वागावं हे आपण ठरवू नये. ठरवलं तरी प्रत्येक जण स्वतःला हवा तसाच वागतो. ह्याचा एकदा स्वीकार असला की मग सोपं होतं.



Routine हे कंटाळवाणं होणार याचा स्वीकार केला की सोपं होतं.



नेहमीच दुसरं कोणी आपलं मनोरंजन करेल असं नाही. किंबहुना आपलं आपल्यालाच आपला 'दोस्त' होत self entertain करावं लागतं. हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमू शकतं याचा स्वीकार केला की सोपं होतं.


आपल्या आयुष्यात निर्णय घ्यायला नेहमी कोणी मदत करेलच असं नाही. उलट आपले निर्णय आपणच घ्यावे. बरोबर किंवा चूक याची जबाबदारी आपलीच असेल याचा स्वीकार केला की सोपं होतं.


सारखंच ऊन आहे, फारच पाऊस आहे असं म्हणत त्यावर अकारण वैतागण्यात अर्थ नाही. निसर्ग त्याचं काम करतो आणि आपल्यालाही त्यानुसार flexible राहत आपली कामं करायची आहेत याचा स्वीकार केला म्हणजे सोपं होतं.


आपल्या हातून प्रत्येकच गोष्ट उत्तम घडेल अशी अपेक्षा बाळगणं म्हणजे स्वतःवर अपेक्षांचं अती ओझं टाकण्यासारखं आहे. काही गोष्टी सामान्य घडू शकतात याचा स्वीकार केला की सोपं होतं.


सातत्य ठेवायचं नाही आणि म्हणायचं यश मिळतच नाही. हे अयोग्य आहे. सातत्याला पर्याय नाही याचा स्वीकार केला की सोपं होतं.


मीच श्रेष्ठ आणि बाकीच्यांना काही येत नाही हा वेडा विचार झाला. आपण सर्वांकडून खूप काही शिकू शकतो, शिकलं पाहिजे याचा स्वीकार केला की सोपं होतं आणि शिकत राहता येतं.


याचबरोबर स्वतःला कमी लेखणं बरं नाही. आपल्याला आत्मविश्वास वाढवायची गरज आहे याचाही स्वीकार करत तसे प्रयत्न केले की सोपं होतं.


सगळंच अचूक नसेल याचा स्वीकार केला की सोपं होतं.


आपण superhuman नसून आपल्यालाही मर्यादा आहेत याचा स्वीकार केला की सोपं होतं.


प्रयत्नाने आपण आपल्या मर्यादा वाढवू शकतो याचादेखील स्वीकार केला की सोपं होतं.


प्रत्येक वेळी जिंकणंच सारं काही नसतं. आपण हरू शकतो हे स्वीकारलं की सोपं होतं. 


एकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून केलं की कोणताही project पूर्णत्वास जातो याचा स्वीकार केला की सोपं होतं. म्हणजेच मी नाही तर आपण असतो हे स्वीकारलं की सोपं होतं. 


स्पर्धा स्वतःशी आहे याचा स्वीकार केला की सोपं होतं. 


अपयश हा यशाचाच भाग असतो याचा स्वीकार केला की सोपं होतं.


टाळाटाळ टाळायची याचा स्वीकार केला की सोपं होतं.


तेवत राहणारी ज्योत केव्हातरी शांत होईल याचा स्वीकार केला की सोपं होतं.


कुठे थांबायचं हे कळलं की सोपं होतं.


- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...