Skip to main content

शब्द (कोणता नि कसा?)




शब्द बोलला. बोलून गेला.

मग जाणवलं, चुकला. 

का बोलला? उगाच बोलला. 


खरंतर बोलण्यासाठीच असतात शब्द. पण शब्द चुकले तर मनं दुखावण्याचं काम करतात. माणूस कोणाला तरी वाट्टेल ते बोलून जातो. नंतर पश्चात्ताप करायची वेळ येते. 


शब्द शस्त्र आहे. त्यांना धार असते. 

कधी कधी ठरवून वार होतो,

कधी चुकून वार होतो.


कधी कठोर शब्द वापरावे लागतात.

कधी नकळत वापरले जातात. 


याच्याच जोडीला चांगले शब्दही आहेत, जे मनांना जोडतात. अगदी सहज एकत्र आणतात.


शब्दांची गुंफण करून प्रेम दर्शवता येतं.

हेच शब्द एकत्र करून राग व्यक्त होतो. 


शब्द नकळत घाव घालतात.

हेच शब्द घाव भरून काढतात. 


शब्द ओले, शब्द कोरडे.

शब्द शहाणे, शब्द वेडे.


शब्द जोडले तर वाक्य.

वाक्य जोडत अर्थपूर्ण संवाद.

संवाद एकतर बरा किंवा वाईट.

संवाद माणसाला जोडतो, अथवा तोडतो.


शब्दाची ताकद मोठी असते.

ती ताकद एखादी गोष्ट घडवत किंवा बिघडवत असते. 


शब्दांना बांध घालून अडवायचं काम खरंतर शब्दच करू शकतात.


अमितच्या बाबतीत असंच घडलं जेव्हा तो अशांत आणि अस्वस्थ झाला होता. त्याच्या तोंडून चुकून त्याच्याच मित्राविषयी चुकीचे शब्द निघाले. अमित त्याला खूप बोलला. त्यातले बरेच शब्द मित्राला दुखावणारे होते. त्यावेळी अमितला ते जाणवलं नाही. तावातावात तो बोलून गेला. मित्राला अकारण बरंच सुनावून गेला.


सगळं घडून गेलं,

बोलायचं ते बोलून झालं,

चुकायचं ते चुकून झालं,

रात्री जरा मन ताळ्यावर आलं.


तेव्हा अमित शांत झाला होता. पण मित्र मात्र दुखावला गेला होता . हे त्याला आत्ता जाणवत होतं. अमित पुन्हा अशांत,अस्वस्थ झाला. पण या वेळी कारण वेगळं होतं. मित्राला बोलायचं म्हणून नाही, मित्राला वाईट बोललो हे आठवून हा अस्वस्थपणा आला. 


बोललोच नसतो तर बरं झालं असतं. जिभेवर ताबा नाही. का बोललो? मात्र या जर तरच्या गोष्टीला आता अर्थ नव्हता. 


मित्राला फोन करावा की मेसेज करावा या विचारात अमित होता. अचानक त्याच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक... तो गाडी घेऊन निघाला. थेट मित्राच्या घरी जाऊन पोचला. 


बेल वाजली. मित्रानेच दार उघडलं. इतक्या वेळ शब्दामुळे घडलेल्या चकमकीत आता शब्द नव्हते. मित्र काही बोलत नव्हता. हेच अमितला जास्त त्रासदायक वाटत होतं. अमित देखील त्या क्षणी काही बोलला नाही. मात्र त्याने मित्राला कडकडून मिठी मारली. मिठीत केवळ एक शब्द उच्चारला, "सॉरी." तो ही मनापासून...


मनापासून उच्चारला असं मुद्दाम नमूद करावं लागलं कारण 'सॉरी' हा शब्द देखील अनेकदा माणसं उपकार केल्यासारखा वापरतात. 


त्या मिठीत, त्या सॉरी मध्ये नातं टिकवून ठेवण्याची क्षमता होती. इथे जाणवलं, शब्दाची गंमत आहे. तो केवळ काय बोलला हे महत्त्वाचं नाही. कसा बोलला हे ही महत्त्वाचं. शब्द केवळ वापरायचा नाही, प्रामाणिकपणे, खरा खरा न्याय देत उपयोगात आणायचा. शब्द जगायचा!


- वरुण भागवत

Comments

  1. Kiti chan lihitos Varun... Khupach bhari aa..... Khup khup shubheccha asach shabdha lihit raha .... 😍😍👌👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...