Skip to main content

हिशोब आणि गवतीचहा

A click by: Varun Bhagwat

ऑफिस मधून घरी पोहोचलो. फ्रेश झालो. चहा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. दार उघडलं. समोर माने काका उभे. माने म्हणजे आमचे केबल वाले काका. नेहमीप्रमाणे टिव्हीचा रिचार्ज मारायला आले होते. बरं, आले ते वैतागतच! त्यांना बसा म्हटलं.

“बसतो कसला? या ३००० रुपयाचं काय करू?"
"मी समजलो नाही." असं म्हणत मी त्यांना पाणी दिलं.
"अहो, सकाळी निघताना खिशात ११० रुपये होते मोजून!! आता ३००० कसे होतील??"
" तुम्ही केबल ची बिलं गोळा करत आलात त्याचे पैसे असतील."
"सगळे त्याचेच पैसे आहेत. पण हिशोबाने हे ३००० एक्स्ट्रा आहेत."
"ऑनलाईन नोंद होते ना बिलाची. ते चेक केलं का?"
"विचारलं अहो मी हेड ऑफिसात."
"मग?"
"३००० जास्त च आहेत."
"अहो, जास्त आहेत, कमी नाहीत ना.. तेवढं तरी बरं आहे ना?"
"अहो असं कसं? ज्याचे असतील त्याला गरजेचे असतील हो हे पैसे!"
"मान्य आहे मला. पण तुम्ही काय कोणाचे पैसे असे उचलणारे आहात का?"
"नाही हो."
"मग असू द्या ना. रात्री बिछान्यावर पडलात की आठवेल."

आत्ता कुठे माने काकांना थोडा दिलासा मिळाला आणि त्यांनी पाण्याचा पेला पिऊन संपवला.

“मी निघतो." माने काका जाऊ लागले.
आत्तापर्यंत आईला आत स्वयंपाक घरात सगळ्या गप्पा ऐकू आल्या होत्या.
ते जायला लागताच ती म्हणाली, "चहा घेऊन जा."
चहा म्हणल्यावर काका थोडे थबकले. गवतीचहाचा सुगंध पसरला होता.
काका म्हणाले, "असं म्हणताय.... द्या घोटभर."
अस्मादिकांनी त्यांना चहा दिला.

केबल चे पैसे मी कांकांना दिले. नेमके वरचे २ रुपये सुट्टे नव्हते. ते म्हणाले, "असू द्या. पुढच्या वेळी द्या."
"थांबा ५ आहेत. घ्या."
"आज पैसे (जास्तीचे) मिळण्याचा दिवस दिसतोय. अवघड आहे माझं. काय झालंय माझ्या स्मरणशक्तीला."

काकांनी असं म्हणत "फुर्रर्रर्रर्र" करत चहाचा शेवटचा घोट घेतला. ते निघणार तोच त्यांचा फोन वाजला. मेसेज होता. काका जवळजवळ ओरडलेच, "हिशोब लागला."
"छान!"
"त्या सर्व्हर प्रॉब्लेम मुळे हे घडलं."
.
.
नशीब ....

आज माणुसकी नव्याने दिसली. दिवसभर कष्ट करून सुद्धा मिळतायत म्हणून जास्तीचे पैसे काकांना नको होते. जास्तीचे पैसे आपले नाहीत त्यामुळे त्याचा हिशोब लागल्यावर काका जवळजवळ लॉटरी लागल्याच्या आनंदात होते आणि काम करून दमल्यावर जरा विसावा म्हणून बाबांनी आई साठी केलेला चहा, क्षणाचाही विलंब न करता आईने काकांना प्यायला दिला.

क्षणिक आनंद त्यांच्या हिशोबात बसणारा नव्हता.
शाश्वत आनंद शोधणारी, देऊन सुखी झालेली ही दोन पापभिरू माणसं पुन्हा आपल्या कामाला लागली.

दुरून सगळं पाहणाऱ्या बाबांनी पुन्हा आधण ठेवलं, आईच्या राहिलेल्या घोटभर चहासाठी!!

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...