Skip to main content

आठवणी- हवेहवेसे त्रास

 

A click by: Varun Bhagwat



"आठवणी."

"त्यांचं काय?"

"या आठवणी आठवण्याची आणि साठवण्याची सवय लावून घेऊ नये."

"का लावून घेऊ नये?"

"त्रास देतात या आठवणी."


"अगं, याच आठवणी जगवतात.

याच आठवणी जगण्यात मजा आणतात.

याच आठवणी नव्या आठवणी तयार करण्याची प्रेरणा असतात.

आठवणीच तर असतात ज्या हलकेच सारं आठवून हसवतात."


"हो रे. खास व्यक्तींच्या बाबतीत तर हे घडतंच. काही व्यक्ती येतात आपल्या आयुष्यात. आपलं आयुष्य सुंदर आहे हे दाखवून देतात. त्या माणसांची सोबत हवीहवीशी वाटते. मग एक दिवस ती माणसं आपल्याला सोडून जातात. भांडून नाही. त्यांचा आपल्यासवे असणारा कार्यभाग संपतो इतकंच. ते पुढच्या प्रवासाला निघतात. त्यांचं काय करायचं? त्यांनाही जायचं नसतं. आपल्यालाही त्यांना सोडायचं नसतं. पण परिस्थितीच यांना एकमेकांपासून दूर लोटते."



"हो, पण परिस्थितीनेच तर त्यांना एकत्र आणलेलं असतं. वेगळं करणारी पण ती परिस्थितीच. जरी वेगळं केलं तरी त्या भेटीच्या काळात आपलं आयुष्य काही प्रमाणात समृद्ध होतं. या व्यक्ती शरीराने नेहमी सोबत नसल्या तरी आठवणींच्या रूपात आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून जातात. या व्यक्ती नि त्यांच्या या आठवणी म्हणजेच तर आपलं सुंदर जीवन."

"पण ही माणसं जाणार असतात तर येतायच कशाला?"

"ही माणसं आपल्या आयुष्यात येतात म्हणून तर यांच्या आठवणी होतात. या आठवणी म्हणजे तर जगण्याचा आधार."



"अरे पण याच आठवणींनी डोळे पाणावतात."



"कारण या आठवणी निर्माण होत असतात तेव्हा आपण ते क्षण खरे जगलेलो असतो. या आठवणी खूप काही आठवायला लावतात. ते स्पर्श, ते प्रेम, ती माया, नात्यात निर्माण झालेला तो ओलावा, तो आपलेपणा, पोट दुखेपर्यंत हसणं, पूर्ण वेळ एकमेकांसवे राहणं, एकमेकांना काय हवं नको ते पाहणं. या साऱ्याचं सार म्हणून या आठवणी कधी डोळ्यांत हलकेच पाणी आणतात. आपण ते अश्रू पुसू लागतो तोच कोणाची तरी पाठीवर थाप पडते. ती व्यक्ती विचारते काय झालं?

आपण आपल्यातच असतो, आपण पापण्यांची कड पुसत म्हणून जातो की काही नाही झालं. आपण पुन्हा आपल्यात रमतो."

"हो रे. खरंच. या आठवणी काय काय करतात?"

"अगं, या आठवणीच तर असतात ज्या सगळं सरलं तरी उरतात. सरणावर जाण्याआधी सुद्धा बाकी असतात त्या आठवणी. आणि तू म्हणतेस आठवणी त्रास देतात."



"हो देतात."

"अगं.."

"खरंच आहे हे."

"पण.."

"अरे पूर्ण ऐक तर."

"हां बोल"

"अरे आठवणी त्रास देतात.  पण काही त्रासच हवेहवेसे असतात. नाही का?"


- वरुण भागवत


Comments

  1. Hats off!👏👏👏
    I just read the whole two times and I want to read it again❤️🙏....it's amazing, beautiful,deep and connects to my heart so well!
    Really awesome varun dada!
    Keep coming🥰
    -Your little sister.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...