Skip to main content

मनातल्या एकलव्याची भरारी...

 

A click by : Varun Bhagwat 


"हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..."

"पण ती निघून जाते. असंच ना?"

"हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली."

"हं..."

"मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?"

"तू मर्जीतील माणूस नव्हतास."

"काय?"

"खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे."

"पण म्हणजे काय?"

"खूप explain करावं लागेल.

"मग कर."

"वेळ आहे?"

"नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो."


"बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला?


जिथून त्या कुत्र्याचा आवाज येत होता त्या दिशेने नकळत साऱ्यांची पावलं पडू लागली. पाहतात तर तो कुत्रा शांत थांबला होता. त्याच्या मुखात मात्र कोणीतरी बाण मारून अशी रचना केली होती की त्याला कोणतीच इजा झाली नव्हती परंतु आत्ता तरी तो भुंकू शकत नव्हता. शोध घेताच द्रोणाचार्यांच्या शिष्यांपैकी एकाला तिथेच जवळ एक धनुर्धारी दिसला. विचारताच कळलं की तो एकलव्य होता.


एकलव्य पुढे आला. द्रोणाचार्यांकडे पाहत म्हणाला, "गुरूंचं दर्शन घडलं. धन्य झालो."

द्रोणाचार्य उद्गारले, "गुरू?"

एकलव्याने द्रोणाचार्यांना तयार केलेला त्यांचा मृत्तिकेचा पुतळा दाखवला. पुढे आनंदाने म्हणाला, "तुम्हीच माझे गुरू आहात. मी तुमच्याकडे शिकण्याच्या आशेने आलो होतो. तुम्ही नकार दिलात. पण मी मात्र माझा गुरू बदलला नाही. या पुतळ्याच्या रूपात तो मला दिशा दर्शवतो."

द्रोण खुश झाले. त्यांनी त्याची पाठ थोपटली. हे पाहणारा अर्जुन मात्र खट्टू झाला.


गुरू द्रोणाचार्यांना बाजूला घेत अर्जुन म्हणाला, "सर्वश्रेष्ठ धनुर्धर मीच होणार असं वचन तुम्ही मला दिलंय. पण हा तर माझ्यापेक्षा उत्तम कामगिरी करताना दिसतोय. काहीतरी करा गुरूवर्य."


द्रोण थोडा विचार करत एकलव्यापाशी आले. त्यांनी त्याला सुचवलं, "मला गुरू मानतोस तर मग मला गुरुदक्षिणा काय देशील?"

"आपण सांगा."

"गुरूदक्षिणा म्हणून तुझा उजव्या हाताचा अंगठा मला दे."


एकलव्याला धक्का बसला. पण लगेच सावरत तो म्हणाला, "म्हणजे शिष्य म्हणून आपण मला स्वीकारलं तर? मग तर हा जीव तुमच्या चरणी अर्पण!"


क्षणाचाही विलंब न करता त्याने मागितलेली गुरुदक्षिणा दिली. आता तो यापुढे कधीही धनुष्य चालवू शकणार नव्हता. आणि त्याच वेळी पुढे अर्जुन मोठा धनुर्धर झाला हे तू जाणतोसच."


"या साऱ्याचं मला नोकरीवरून काढण्याशी काय connection?"

"अरे, आपल्या office मध्ये असंच काहीसं घडलं."

"कसं?"

"तू लवकरच तुझ्या talent वर manager होणार होतास;

पण manager होण्याच्या race मध्ये कोणीतरी आधीपासून होतं. खरं पाहायला गेलं तर ती race नव्हतीच. तो 'कोणीतरी' जो होता, तोच manager होणार हे ठरलं होतं असंच म्हण."

"विजय?"

"हो."

"तो talented आहेच की."

"अर्जुन talented होताच की. तसा तू पण talented आहेस एकलव्यासारखा. विजय चे Godfather म्हणजेच Mr. शर्मा हे company च्या board of directors मध्ये आहेत."

"मग?"

"विजय हा त्यांच्या मर्जीतील माणूस, ज्याला त्यांनी promise पण केलं होतं की या वर्षी तूच manager होशील."

"Oh!"


"या साऱ्यात तुझा हकनाक बळी गेला इतकंच. तू कोणाचा कोणी नाहीस. म्हणजेच तुझे हितसंबंध नाहीत. तू कोणाच्या मर्जीतला नाहीस. त्यामुळे तुझा एकलव्य झाला.

"हं.."


"पण तू धनुष्याला बाण लावू शकतोस. इथल्या महाभारतात Mr. शर्मा तुझे मानलेले गुरू पण नाहीत. So, तुला अंगठा द्यायची गरज नाही. महाभारतातील बिचारा एकलव्य मात्र त्यात अडकला. तू अडकू नकोस."

"पण मी आता काय करू?"

"पंख पसरून भरारी घे. खऱ्या talent ला मरण नाही. लक्षात घे. असे विचार जिथे आहेत, जिथे talent पेक्षा हितसंबंध महत्त्वाचे आहेत, तिथे growth ही तशीच होईल. I mean खऱ्या अर्थाने growth होणारच नाही. तू मोकळा राहा. तुझे पंख कोणी छाटू शकत नाही. तू खुल्या आसमंतात भरारी घे."


- वरुण भागवत


Comments

  1. खूप खुप छान .... किती छान motivate करता तुम्ही

    ReplyDelete
  2. एखाद्या खचलेल्या मनाला उभारी मिळेल.इतकं छान आणि खऱ्या आयुष्यात होणारी गोष्ट लिहली तुम्ही.

    ReplyDelete
  3. खुप छान वरुण
    यावरून चार ओळी आठवल्या
    "हौसले पंखोमे भरलो उंची उडाने पार करलो, पंखोमे बल है ये पहले समजो उंची उडाने पार करलो..."

    ReplyDelete
  4. भारी लिहिलाय 👏🏻

    ReplyDelete
  5. तुम्ही साकारत असलेली भूमिका मनात घर करून आहेच माऊली...विचार सुधा इतका संपन्न पाहून जाणीव होते की खरंच माऊलींचा आशीर्वाद आहे तुमच्या सोबत.🌸🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...