Skip to main content

तू चल... मी आहेच!

 



मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल? तेवढ्यात त्या अंधारात कोणीतरी अलगद हात पकडतं. कानावर हलकेच आवाज येतो, "चालत राहा. प्रकाशापर्यंत नेणारी वाट हीच आहे बाळा!"


मी विचार करू लागतो की हा कोण आहे? त्याच्या शब्दांमधील भाव विश्वासार्ह असतो. मला वाटून जातं की कोणी संत माणूसच असणार!
मी त्या साधूच्या / संताच्या शब्दांवर विश्र्वास ठेवतो. चालू लागतो. थोडा वेळ काहीच नाही. अंधार संपायचं नावं नाही. मी  हरणार असं जाणवताच, "अजून थोडंच चाल. तू इप्सित स्थळी पोहोचशील." असा मृदू आवाज कानी येतो. त्या आवाजावर आणि विश्वासावर मी चालू लागतो.

मला कळलेलं नसतं की मी जे करतोय ते काय आणि का करतोय. त्या आवाजावर, त्या बोलण्यावर विश्वास का ठेवतोय? त्या शब्दांत, त्या बोलण्यात, त्या आवाजात अशी काय जादू आहे जी मला पुढे चालायला भाग पाडतीये?

एक गोष्ट निश्चित की आधीच आपण अंधारात आहोत. या संत माणसाचं ऐकलं नाही नि तिथेच थांबलो तर अंधारातच राहू हे निश्चित! ऐकलं तर मात्र प्रकाशापर्यंत पोहोचण्याची शक्यता तरी आहे. नाहीच दिसला प्रकाश तर काय होईल? फार काही होणार नाही. अंधारात होतोच, अंधारातच राहीन.

अंधारातून अजून किती अंधारात जाणार?

मग म्हटलं विश्वास ठेवूया. विश्वास ठेवण्याची पण एक गंमत असते. आपण विश्वास ठेवताना किती विचार करतो? अर्थात आयुष्यात येणारे अनुभव माणसाला तसं वागायला भाग पाडत असतात.
'विश्वास' या गोष्टीवरचा विश्वासच अनेकदा उडालेला असतो. आयुष्याने दिलेल्या धड्यांमुळे पटकन कोणावर विश्वास ठेवला जात नाही.

पण अशा काही व्यक्ती, असे काही शब्द, त्या शब्दांमागील भाव खरोखर विश्वास देतात. 'विश्वास' या गोष्टीवर आपण पुन्हा विश्वास ठेवू लागतो. किमान असा विश्वास ठेवू शकतो याचा विश्वास येऊ लागतो.

हा विश्वास देणारा कोणी मार्गदर्शक, कोणी संत माणूस कुठेतरी भेटतो. आधी तर आपलं आयुष्य कल्पनेनेच प्रकाशमान करतो. म्हणजेच अत्यंत सकारात्मक भाव निर्माण करतो. त्याचं अलौकिक तेज प्रसन्नता देतं. आयुष्य केवळ अंध:कारमय नाही हा विश्वास मिळतो. तिमिरातून तेजाकडे जाण्याची वाट तो दाखवतो. "मी सवे आहे, तू चल पुढे!" हे नकळत सांगतो.

असं सांगणारं, असा विश्वास देणारं, असा विश्वास ठेवणारं, असा संतमाणूस, अशी संतसंगत आपल्याला तारून नेते.

प्रत्येक वेळी आपण स्वतःचं डोकं चालवत असतोच; कधीकधी दुसऱ्याने चालवलेल्या डोक्यानुसार आपण मार्गक्रमण करायचं. जमतं. कधीकधी नेहमीपेक्षा जास्त चांगलं पण जमतं.

पण अखेरीस मानवी मन ते! डोकं चालवायचं नाही असं कितीही ठरवलं तरी अंधारलेल्या वाटा प्रकाशमान कधी होणार हा प्रश्न भेडसावत राहतोच! आपण पुन्हा विचारात जातोच. पण पाहता पाहता बरंच अंतर कापून पुढे जातो. काही अंतर चालल्यावर अंदाज येतो की आपण एका बोगद्यात आहोत आणि म्हणून तो अंधार अधिकच जाणवत आहे. लहानपणी वाचलेलं असतं की कुठेतरी बोगद्याचा अंत होतो, अंताला प्रकाश सापडतो वगैरे! मग मी अथक चालत राहतो.

जसं जसं मी बोगद्याच्या टोकाला पोहोचतो, परिसर प्रकाशमान होऊन जातो. एक आवाज माझ्या कानी पडतो, "जमलं बाळा तुला."

मी कृतज्ञता व्यक्त करायला वळतो. तो संत/ तो साधू/ तो वाटाड्या/ तो मार्गदर्शक तो सखा नसतोच. पण तरीही त्याचं अस्तित्त्व त्याने निर्माण केलेल्या सकारात्मक लहरींमधून जाणवत राहतं. ती ऊर्जा मी भरून घेतो पुढच्या प्रकाशमान वाटेवर चालण्यासाठी!

२ पावलं चालल्यावर दिसतं की अजून एक वाट आहे जिथे अंधार आहे. कोणीतरी त्या वाटेवर चाचपडत आहे. त्याच्याही आजूबाजूने अंधार आहे. मला स्वत:ची धडपड आठवते.
"मिट्ट काळोख. समोर पूर्ण अंधार. चालायला तर हवं. पण कसं? सोबत कोण करेल?" असा प्रश्न यालाही भेडसावत असेल असं मला वाटून जातं.

माझंच प्रतिबिंब मला त्याच्यात दिसतं. पावलं नकळत त्या दिशेने पडू लागतात.



- वरुण भागवत

Comments

  1. अंतरमनावर विश्वास ठेवल्यावर दिसत नसलेल्या व्यक्तीचंही अस्तित्व जाणवत.👌🙏

    ReplyDelete
  2. Gajanan sutar Sangli mo 9021294710

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...