Skip to main content

क्षितीज

https://pixabay.com/users/yugifrias-18306189/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=5571545

तो आणि ती समुद्रकिनारी गेले. समोर पाहिलं. दूरवर दिसणारा सागर. त्याला अथांग का म्हणतात त्याचं उत्तर लगेच त्यांना मिळालं. ज्याचा थांग लागू शकत नाही तो अथांग.

खरंच ह्या सागराला अंत आहे का?

अंत असेल तर कुठे जाऊन हा संपतो?

असे प्रश्न त्याला पडले.


ती म्हणाली, "क्षितिज बघ. आपले अवघड प्रश्न सोपे करतं."

"म्हणजे?" त्याने प्रश्न केला.

ती उत्तरली, "हा समुद्र कुठे संपेल वगैरे तुझा प्रश्न. त्याचप्रमाणे आयुष्यात पुढे काय होईल असेही तुझे प्रश्न."

तो बुचकळ्यात पडत म्हणाला, "हो."

ती गोड हसत म्हणाली, "क्षितीज हे त्याचं उत्तर."

तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, "पण क्षितीज म्हणजे तरी काय?"

"जिथे आकाश आणि हे दूरवर असलेलं पाणी एकमेकांना मिळतात." तिने समर्पक उत्तर दिलं.


"पण खरंच असं घडत नाही. ही एक concept आहे. हा एक भास आहे." तो म्हणाला.

ती लगेच म्हणाली, "मान्य आहे. पण हे उत्तर आपल्या मनाचं समाधान तरी करतं."

"पण मग असं भासवत, फसवत का जगायचं?" तो निरागसपणे म्हणाला.

ती शांतपणे उत्तर देत होती, "आपण पण अनेकदा तसे जगतोच की. आपण म्हणतो लवकरच भेटू. तो 'लवकर' खूप काळाने सुद्धा येतो, मग ही फसवणूकच झाली ना. लवकर भेटू म्हणायचं पण उशीरा भेटायचं. मला पण म्हणालास की आपण लवकरच एकत्र येऊ. आपण भासवत आहोत की आपण एकत्र आहोत पण खरं पाहता आपण एकत्र नाही."


तो तोडत म्हणाला, "आहोत की एकत्र."

"पूर्णपणे एकत्र कधी येणार? लवकरच म्हणू नकोस. कारण तसं म्हणालास तर हे पण भासवत आणि फसवत जगणं होईल. नाही का?" तो ठामपणे बोलली.

तो थोडा खजील होत म्हणाला, "अगं तसं नाही. मी भासवत नाहीये. खरंच एकत्र येणार आहोत आपण. पण कधी कधी भीती वाटते. म्हणून पुढे ढकलतो मी आणि म्हणतो लवकरच येणार आपण एकत्र."

"म्हणजेच तू मला क्षितीज दाखवतोस. उत्तर खरं नसतं पण समाधान देणारं असतं."

तो सावरत म्हणू लागला, "अगं.."



तिने लगेच तोडलं, "पण मी complaint करतच नाहीये. तू दाखवत असलेलं क्षितीज मला हवंहवंसं आहेच. तू त्याला भास म्हणतोस पण माझ्यासाठी ती आशा आहे की हे घडेल. आपण आज ना उद्या पूर्णपणे एकत्र येऊ, कोणतेच किंतु परंतु न ठेवता एकमेकांचे होऊन जाऊ ही आशा त्यात असते. म्हणून मला क्षितीज भास आहे असं वाटत नाही."

तो तिच्याकडे पाहत राहिला, "आशावादी असणं तुझ्याकडून शिकावं. तुझं हे बोलणं पुन्हा मला विश्वास देतं की खऱ्या अर्थाने आपण लवकरच एकत्र येणार."


ती गोड हसत म्हणाली, "माझं कोणतंच pressure नाही. तुला खरंच माझी सोबत हवी असेल तरच हे घडू दे. नाहीतर मला क्षितीज दाखवत आकाश आणि पाणी यांनी एकत्र यायची आवश्यकता नाही. दोघे आपल्या रस्त्याने जाऊ शकतात."

तो पटकन म्हणाला, "मला हवीच आहे तुझी सोबत. पण भविष्यात कसं होईल, आपल्याला जमेल की नाही हे प्रश्न छळतात. पण तुझं हे बोलणं हे प्रश्न सोपे करतात. अशी सोबत असेल तर मी तरी का उगाच अती विचार करावा. लवकरच एकत्र येऊ असं मी नाही म्हणणार."


ती थोडी हिरमुसली.

तो हसत म्हणाला, "अगं मी म्हटलं की लवकरच एकत्र येऊ असं मी नाही म्हणणार. तर माझं म्हणणं असं आहे की आपण 'आत्ताच एकत्र येऊ'. तुझ्या समोर असणाऱ्या, त्या दूर दिसणाऱ्या क्षितीजाच्या साक्षीने एकत्र येऊ."

ती आनंदून म्हणाली, "खरंच?"

Image by <a href="https://pixabay.com/users/stocksnap-894430/?utm_source=link-attribution&amp;utm_medium=referral&amp;utm_campaign=image&amp;utm_content=2561615">StockSnap</a> from <a href="https://pixabay.com//?utm_source=link-attribution&amp;utm_medium=referral&amp;utm_campaign=image&amp;utm_content=2561615">Pixabay</a>

त्याने हसत मानेने होकार दिला.


तिने उडी मारत त्याला घट्ट मिठी मारली.


- वरुण भागवत 


Comments

  1. सरळ आणि सोप्या भाषेत खूप काही सांगून जातेय आजची गोष्ट.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...