Skip to main content

निर्णय स्वातंत्र्य

A click by: Sushil Ladkat


- नाही नाही, मला नाही पटत आहे हे असं.
- अहो, काय पटत नाहीये तुम्हाला?
- हे जे तुम्ही सगळ्या दुनियेला involve करत आहात ते!
- आता त्यांना जर आपण याच्या लग्नाबद्दल काही नाही सांगितलं तर वाईट वाटेल ना त्यांना...
- वाटू दे.
- हे काय बोलणं झालं?
- मग मी काय बोलणं अपेक्षित आहे?
- त्यांचं मत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
- लग्न त्यांचं आहे का आपल्या पोराचं?
- अहो पण....
- मग काय? लग्न त्याचं. त्याने मुलगी पसंत केली, तिला तो पसंत आहे. आपल्यालाही ती पसंत आहे. त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारा हा हेमंत याचा लागतो तरी कोण?
- हे बघा, तुमचे मोठे भाऊ आहेत ते. घराच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
- आपण निर्णय घ्यायला सक्षम नाही म्हणून..??
- कदाचित.
- पण अजय आहे.
- .. तो लहान आहे.
- तूच म्हणतेस ना लग्नाचं वय झालंय त्याचं...
- हो..
- तर मग तो लहान नाही आणि मुळात हा जो निर्णय आहे तो त्याच्या आयुष्याचा आहे. इथे तो स्वतंत्र असला पाहिजे. आपणही मध्यस्थी करू नये.
- हे काय आता नवीन?
- तूच वाढदिवसाची भेट म्हणून दिलेलं व.पु. काळेंचं पुस्तक, त्यात लिहिलंय.
- अहो काय लिहिलंय त्यात?
- "आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबून रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."- व.पु.काळे.

यावर आई काहीच बोलली नाही. चर्चा थांबली. आई खोलीत गेली. मग बाबा बाहेर आले. अजयपाशी येऊन बसले.

- काय झालं बाबा?
- काही नाही.
- मग एकदम शांत झालात?
- माहीत नाही.
- thanks dad.
- why?
- माझ्या बाजूने उभे राहिलात.
- मी कोणाच्याच बाजूने नाहीये.
- म्हणजे?
- कारण अरे माझ्या स्वतःच्या लग्नाच्या बाबतीत माझी खूप घाई झाली होती.
- आणि...
- आणि तुला बाकी माहीतच आहे. असा एक दिवस जात नाही जेव्हा आम्ही भांडत नाही.
- निर्णय चुकला असं वाटतं तुम्हाला?
- बरोबर येईल याची guarantee अशी पण कोणी देऊ शकत नाही.
- मग?
- वाईट याचं वाटतं की  निर्णय चुकीचा किंवा बरोबर यापेक्षा दुसऱ्याने लादलेला होता. मी निर्णय घेऊन तो चुकला असता तर प्रश्न नव्हता. इतका महत्त्वाचा निर्णय घ्यायला खरोखरीच आपण स्वतंत्र असलो पाहिजे. निर्णय मनापासून असेल तर आयुष्य पण मनापासून जगतो माणूस!!

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...