Skip to main content

पक्षी उडाला आकाशी...


A click by Sushil Ladkat



नावेत बसलो होतो. वल्हवताना होईल तेवढाच पाण्याचा आवाज होता... बाकी निरव शांतता. पाण्यात मध्यभागी एक झाड उगवलं होतं, झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर एक सुंदर पक्षी बसला होता. मी तो पक्षी बघत होतो.


फांदीसारखी फांदी ती, एकदम हलकी. त्या फांदीसोबत हा डुलत होता. मला जाणवलं आपण हे पुस्तकात वाचलं होतं की पक्ष्याचा आपल्या पंखांवर विश्वास असतो आणि आज प्रत्यक्ष अनुभवलं. याला भीती नव्हती फांदी तुटण्याची आणि आपण पडण्याची!


आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं जाणवलं. भौतिक गोष्टींमुळे येणारी safety आणि comfort zone यात मी किती अडकतो असं वाटलं. माझं घर (कदाचित वडिलोपार्जित, कदाचित मिळवलेलं, कदाचित भविष्यातलं), माझी गाडी, माझे savings नसतील तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असाच मी समज करून घेतो.


डोक्यावर निवारा नसेल हा विचार मला घाबरवून सोडतो. मी जमवलेल्या माझ्या वस्तू जीवाहून जास्त जपतो. हे सगळं आहे तसं ठेवण्यात आणि जपण्यात मी माझा पूर्ण वेळ खर्च करतो. हे सगळं करण्याचं कारण म्हणजे मला कायम या भौतिक गोष्टींचा आधार असावा ज्याने मी सुरक्षित (?) राहीन असं मला वाटतं. मी असा विचारच करत नाही किंवा असा विचार करायला घाबरतो की हे सगळं जर कधी भविष्यात काही कारणांमुळे राहिलं नाही तर मी survive कसं करेन?



नाही, नाही! असं कुठं असतं का? असं का होईल माझ्या बाबतीत.. असं म्हणत मी तो विचार झटकतो. तेवढ्यात त्या पक्षाने त्याचे पंख झटकले. फांदी थोडीशी वाकली. पक्षी डगमगला नाही. त्याने चहूबाजूला एक नजर टाकली. फांदी थोडी अजून वाकली. त्याने फांदीचा अंत बघितला नाही. पंख पसरले आणि..

त्याने भरारी मारली, इकडे काडकन फांदी तुटली. फांदी पाण्यात पडली, तिचं अस्तित्व संपलं त्याचं कोणाला काहीच वाटलं नाही.लक्ष पक्ष्याकडे गेलं.



पक्ष्याने शाळेत पुस्तकात शिकलेल्या धड्याला प्रत्यक्षात उतरवलं. फांदी फक्त आधारासाठी.. ती कधीही तुटू शकते. तिच्यात अडकायचं नाही. एखाद्या फांदीने जास्त साथ दिली तर उत्तम पण ती सुद्धा एक दिवस तुटेल. त्यामुळे पंखांना विसरायचं नाही. आणिअशा कितीही फांद्या तुटल्या आणि पडतोय अशी वेळ आली तरी पंखांवरचा विश्वास गमवायचा नाही.

त्या पक्ष्याने माझ्या मनाला वल्हवत वेगळ्याच विचारांच्या किनाऱ्यावर आणून सोडलं. या नौकाविहारात पक्षाने फांदीचा आधार सोडला होता आणि मी जुना किनारा (सोडायच्या प्रयत्नांत होतो).



वरती पाहिलं. तो अजूनच उंच उडत होता. आता आधारासाठी अजून उंच झाड शोधात होता. पुन्हा आधार म्हणालो का मी? सवय लागलीये ना.. मग नीट पाहिलं. आधार कसला..

पंखांच्या बळावर 

उंsssssssssच

गगनभरारी घेण्यासाठी

पक्षी उडाला आकाशी......


-वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...