Skip to main content

मन- मस्त!


A click by Varun Bhagwat

एक सुंदर वाक्य वाचनात आलं आणि लक्षात आलं की किती खरं आहे ते. लिहिलं होतं की काही तास एखाद्या गोष्टीवर खूप विचार करण्यापेक्षा काही मिनिटं त्याच्यावर काम करणं अथवा काही मिनिटात ते करून टाकणं हे जास्त श्रेयस्कर आहे.


असं केल्याने आपलं मन थाऱ्यावर राहतं.

नवा विचार करण्यासाठी डोकं जागेवर राहतं. कारण एखाद्या कामाचा जेव्हा नुसता विचारच केला जातो (कृतीविना), तेव्हा काहीही घडत नाही. वाया जातो तो वेळ, वाया जाते ती ऊर्जा ती सुद्धा निष्कारण! किती विचार करायचा आणि कुठे थांबवायचा हे आपलं मन ठरवतं. आता मन म्हणजे आपणच, मव आपणच ते वेळेत ठरवायचं आणि विचार करून कृती करून टाकायची. यामुळे त्याच गोष्टी आवण घोळत बसत नाही, पटकन पुढे जातो अर्थात पुढची वाटचाल सुरू करतो. 


होतं असं की याने आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहायला मदत होते. गमतीचा भाग असा, खरं तर हा भाग गमतीचा नाही पण एकूणच आपल्याकडे मानसिक आरोग्याला फार कमी लेखलं जातं, कमी महत्त्व दिलं जातं. 


शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यालाही महत्व आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यावर बोलणारे अनेक लोक आहेत पण तरीसुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तितपत सकारात्मक झालेला नाही. हे काही सर्वांच्या बाबतीत लागू नाही पण काही लोकांच्या बाबतीत मात्र निश्चितच attitude बदलण्याची गरज आहे. हळूहळू awareness वाढतो आहे जी जमेची बाजू आहे.


अगदी खरं सांगायचं तर या मानसिक आरोग्याची काळजी आपण आपलीच घेऊ शकतो. शारीरिक आजार बरे करण्यासाठी डॉक्टर असतात. अर्थात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीसुद्धा डॉक्टर्स आहेत मात्र मानसिक आरोग्याकडे ज्याचं त्यानं कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असतं. 


शरीर आणि मन या गोष्टी एकमेकांशी खूप जास्त संलग्न आहेत. मन जपलं की शरीर उत्तम राहतं आणि शरीर सुदृढ ठेवलं की मनाने सुद्धा आपण खूप फ्रेश राहतो. 


योग दिन किंवा मानसिक आरोग्य दिन ही निमित्त झाली. खरंतर हे प्रातिनिधिक दिवस आहेत. हे दिवस आपल्याला प्रेरणा देतात आणि सांगतात की शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींचा उत्तम balance साधून राहता आलं की जमतं. 



आपलं मनच तर नेहमी पुढची वाटचाल ठरवत असतं. समर्थ रामदासांनी तर फार पूर्वी मनाचे श्लोक लिहिले आहेत. ते तर केवढे मोठे सायकॉलॉजिस्ट होते असं म्हणता येईल.

त्यांनी मनाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि नकळत मानसिक आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं. 


मन जर का नितळ आणि स्वच्छ असेल

तर आपोआपच सगळं निखळ होऊन जातं. 


मन जाणता आलं पाहिजे, स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा!

अवघड आहे पण प्रॅक्टिसने जमू शकतं. ही कला अगदी ठरवून अवगत करता येऊ शकते. मनावर उपचार सापडला की शरीर पण बऱ्यापैकी बरं होत राहतं.

अनेकदा लक्षात येत नाही की पण घरात एकाचं मन जरी खट्टू असेल तरी त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. म्हणून स्वतःसोबत दुसऱ्याचं मन जपता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी शक्य होत नाही, जमत नाही पण म्हणून नेहमीच जमणार नाही असं नसतं. कारण जमेल , जमणार नाही हे ही ठरवतं ते मनच!

- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...