Skip to main content

मन- मस्त!


A click by Varun Bhagwat

एक सुंदर वाक्य वाचनात आलं आणि लक्षात आलं की किती खरं आहे ते. लिहिलं होतं की काही तास एखाद्या गोष्टीवर खूप विचार करण्यापेक्षा काही मिनिटं त्याच्यावर काम करणं अथवा काही मिनिटात ते करून टाकणं हे जास्त श्रेयस्कर आहे.


असं केल्याने आपलं मन थाऱ्यावर राहतं.

नवा विचार करण्यासाठी डोकं जागेवर राहतं. कारण एखाद्या कामाचा जेव्हा नुसता विचारच केला जातो (कृतीविना), तेव्हा काहीही घडत नाही. वाया जातो तो वेळ, वाया जाते ती ऊर्जा ती सुद्धा निष्कारण! किती विचार करायचा आणि कुठे थांबवायचा हे आपलं मन ठरवतं. आता मन म्हणजे आपणच, मव आपणच ते वेळेत ठरवायचं आणि विचार करून कृती करून टाकायची. यामुळे त्याच गोष्टी आवण घोळत बसत नाही, पटकन पुढे जातो अर्थात पुढची वाटचाल सुरू करतो. 


होतं असं की याने आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहायला मदत होते. गमतीचा भाग असा, खरं तर हा भाग गमतीचा नाही पण एकूणच आपल्याकडे मानसिक आरोग्याला फार कमी लेखलं जातं, कमी महत्त्व दिलं जातं. 


शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यालाही महत्व आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यावर बोलणारे अनेक लोक आहेत पण तरीसुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तितपत सकारात्मक झालेला नाही. हे काही सर्वांच्या बाबतीत लागू नाही पण काही लोकांच्या बाबतीत मात्र निश्चितच attitude बदलण्याची गरज आहे. हळूहळू awareness वाढतो आहे जी जमेची बाजू आहे.


अगदी खरं सांगायचं तर या मानसिक आरोग्याची काळजी आपण आपलीच घेऊ शकतो. शारीरिक आजार बरे करण्यासाठी डॉक्टर असतात. अर्थात मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीसुद्धा डॉक्टर्स आहेत मात्र मानसिक आरोग्याकडे ज्याचं त्यानं कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं असतं. 


शरीर आणि मन या गोष्टी एकमेकांशी खूप जास्त संलग्न आहेत. मन जपलं की शरीर उत्तम राहतं आणि शरीर सुदृढ ठेवलं की मनाने सुद्धा आपण खूप फ्रेश राहतो. 


योग दिन किंवा मानसिक आरोग्य दिन ही निमित्त झाली. खरंतर हे प्रातिनिधिक दिवस आहेत. हे दिवस आपल्याला प्रेरणा देतात आणि सांगतात की शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींचा उत्तम balance साधून राहता आलं की जमतं. 



आपलं मनच तर नेहमी पुढची वाटचाल ठरवत असतं. समर्थ रामदासांनी तर फार पूर्वी मनाचे श्लोक लिहिले आहेत. ते तर केवढे मोठे सायकॉलॉजिस्ट होते असं म्हणता येईल.

त्यांनी मनाच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि नकळत मानसिक आरोग्याचं महत्त्व पटवून दिलं. 


मन जर का नितळ आणि स्वच्छ असेल

तर आपोआपच सगळं निखळ होऊन जातं. 


मन जाणता आलं पाहिजे, स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा!

अवघड आहे पण प्रॅक्टिसने जमू शकतं. ही कला अगदी ठरवून अवगत करता येऊ शकते. मनावर उपचार सापडला की शरीर पण बऱ्यापैकी बरं होत राहतं.

अनेकदा लक्षात येत नाही की पण घरात एकाचं मन जरी खट्टू असेल तरी त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो. म्हणून स्वतःसोबत दुसऱ्याचं मन जपता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी शक्य होत नाही, जमत नाही पण म्हणून नेहमीच जमणार नाही असं नसतं. कारण जमेल , जमणार नाही हे ही ठरवतं ते मनच!

- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...