Skip to main content

सल्लागार

 

A click by Varun Bhagwat



ला फार गंमत वाटते न मागता सल्ले देणाऱ्या लोकांची.

मला नको असेल यांचा सल्ला तर म्हणतात तुझ्या भल्यासाठी आहे हे!


त्यांना म्हणावसं वाटतं की अहो तुम्ही कसं काय ठरवलं की माझं भलं कशात आहे ते! सटवाई ने ५व्या दिवशीच माझं नशीब लिहून ठेवलंय. ते तुमच्या सल्ल्याने बदलेल का? नशीबाचं जाऊ द्या. सल्ला दिला इथवर ठीक! तो ऐकलाच पाहिजे हा यांचा अट्टाहास! यांच्या मते, यांच्या सल्ल्याने काहीतरी revolutionary म्हणजेच क्रांतिकारी बदल होणार असतो आपल्या आयुष्यात.


योग्य माणसाने, योग्य ठिकाणी, योग्य टप्प्यावर, योग्य वेळी योग्य सल्ला देणं आणि आपण तो घेणं या साठी त्या योग्य level चं नातं असावं लागतं. तरच सल्ला देणाऱ्याचा मान राहतो आणि घेणाऱ्याला कदाचित सल्ल्याचा फायदा होतो.


पण यातली ही जी उगाच सल्ला देणारी माणसं असतात, त्यांना एकतर त्यांचं सगळं सांभाळून ही सोशल सर्व्हिस (?) करायला वेळ झालेला असतो किंवा स्वतःचं झाकण्यासाठी हे सल्लागार नावाचा पार्ट टाइम जॉब (बिनपगारी) करतात किंवा यांना मुळातच हौस असते दुसऱ्याचं डोकावून पाहण्याची. याचा अर्थ यांचं काही फार बरं चाललेलं असतं असा नाही. पण कोणावर तरी वरचष्मा दाखवायला मिळतो याचा आनंद (?) त्यांना मिळतो. पोट भरलेला माणूस अर्धपोटी माणसाला उत्तम सल्ले देतो पण तो काही त्या अर्धपोटी माणसाचं पोट भरत नाही आणि चुकून त्याच्यावर तशी परिस्थिती आली तर दुसऱ्याला दिलेल्या सल्ल्यानुसार तो स्वतः वागेलच असंही नाही.


बरं, अनेकदा तर सल्ला देणारा आपण दिलेला सल्ला विसरूनही जातो पण जो त्याचा सल्ला घेतो तो मात्र बिचारा त्यावर बरीच काथ्याकूट करत बसतो. अनेकदा काही निष्पन्न होतंच असं नाही.


एखाद्या गोष्टीविषयी, माणसाविषयी, परिस्थितीविषयी पूर्णपणे माहिती नसताना उगाच सल्ला देऊ नये असा मला यांना सल्ला द्यावासा वाटतो. बघा, बोलता बोलता मी पण सल्ला देण्याची भाषा केलीच! कोणीही न मागता! आपल्याकडे problem च आहे हा.. सवय लागल्यासारखं न मागता सल्ले देणं!


या सल्लागारांना म्हणावं वाटतं, अहो ऐका ना! नकोय तुमचा सल्ला..बरं चाललंय की आमचं! बघवत नाहीये की त्रास होतोय???

पण असं कसं म्हणणार?

वयाचं भान राखावं लागतं,मानापमान जपावे लागतात.. नाहीतर यांना त्याचाही राग.. बोलायची पद्धत नाही असं म्हणत आमच्या आईबापांना नावं ठेवतात आणि यातले काही काही जण तर मी कशा पद्धतीने त्यांना react झालो, ते कसं चुकलं आणि ते कसं सुधारता येईल हा सल्ला आमच्या आईबापाला देतात.


उगाचच आपल्या आईबापाला काही सल्ला देऊ नये, समाजाचा balance (?) बिघडू नये  आणि नातेसंबंधांना गालबोट लागू नये आणि ultimately त्यामुळे आपल्या मनाचा balance बिघडू नये म्हणून आपण यांचे सल्ले ऐकतो आणि या सल्लागारांना शहाण्यालाही वेडं करायची ताकद बहाल करतो. आपल्या मनाचा balance खरंतर हे बिघडवत असतात पण यांच्या मते हे एक महत्वपूर्ण सल्ला देत असतात.


-वरुण भागवत



Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...