Skip to main content

शांत, निवांत, मनातलं!

 

A click by Varun Bhagwat

एका शांत, निवांत स्थळी मी जाऊन बसलो. एकदम जाणवलं की ही शांतता किती गरजेची होती आणि कितीतरी दिवसापासून हवीशी होती. मिळालं नाही की त्या गोष्टीचं महत्त्व जास्त समजतं हा मनुष्यस्वभाव वेळोवेळी दिसतो.


आपण शांतता शोधतो, ती शोधेपर्यंत किती कल्लोळातून जावं लागतं. किती कोलाहल, दंगा, गडबड, गोंधळ चालू असतो आणि या दिव्यातून पार झालं की मग लाभते शांतता. या सगळ्यातून न जाताच शांतता मिळेलही पण मग आत्ता जितकं जाणवतंय तितकं त्या शांततेचं महत्त्व जाणवणार नाही, समजणार नाही.


माणूस एक अजब प्रकार आहे. फार शांतता झाली तरी सुन्न पडतो. काय करावं समजत नाही. सारखा समतोल हवा असतो. आयुष्यात इतका जर समतोल असता तर आयुष्याची रेषा (ECG) सरळच राहिली असती. पण असं चालणार नाही. ती रेष सरळ झाली की विषयच संपला.


चढ आहे म्हणून उताराचं महत्त्व आहे आणि उतार आहे म्हणून चढाला किंमत आहे आणि तो चढ चढून वर जायला पण फार किंमत मोजावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे.


या शांततेच्या महत्त्वाचा शोध घेताना कितीतरी गोष्टी शोधल्या जातात. आपला आपल्याला श्वासोच्छ्वास ऐकू आला की कळतं आपण आहोत. हा श्वास आपलं जिवंत असणं अधोरेखित करतोय. जसं 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या चित्रपटातला इम्रान आपल्या एका कवितेचा शेवट करताना म्हणतो, "सिर्फ मैं हूं, मेरी सांसे है और मेरी धडकने…. मुझे अपने होने पे यकीन आ गया।"


आपण आहोत, आपण म्हणजे मी एक व्यक्ती आहे. माझ्यासारखा दुसरा नाही. त्या दुसऱ्यासारखा तिसरा नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी. परमेश्वराने निर्माण केलेल्या या जगात प्रत्येकाचं स्वत:चं असं स्वतंत्र जग आहे. नसेल तर ते त्याला निर्माण करायचंय. स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करायचंय. स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.


नवनिर्मिती हा मनुष्याचा सहजभाव आहे. त्यासाठी अर्थात आपल्याला असं काही नवं आणि स्वतःचं काही सर्जनशील निर्माण करावं वाटतं. तेव्हा कळतं की यासाठी हा शांतपणा, एकटेपणा गरजेचा असतो. तेव्हाच तो खरा वेळ मिळतो जाणून घ्यायला की मला नेमकं काय हवं आहे आणि मग सुरू होतो शोध. हा शोध आणि हा प्रवास थरारक बनत जातो. आपण आपलं एक सुंदरसं जग निर्माण करू पाहतो.


हे सर्व आपण करत राहतो आणि एका क्षणी ध्यानात येतं की आपलं जग सगळ्यांच्या ध्यानात येईलच असं नाही. पण आपलं जग आपलं असतं. कोणी डोकावलंच आपल्या जगात तर ते सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतंच. बाकी कोण राहू दे, वेळ मिळाला की या निर्मिलेल्या जगात आपण आपलंच स्वतः डोकावलं तरी ते समाधान देणारं असावं.

शांत, निवांत आणि मनातलं असावं!


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...