Skip to main content

बाप लेकाचं नातं


वेद आणि सिद या २ मित्रांचा संवाद चालू होता.

“आज father’s day आहे म्हणे.”

“हां... ते days चे प्रकार वर्षभर चालूच असतात.”

“ते खरंय.”

“कशाला लागतात रे हे days?”

“कदाचित व्यक्त व्हायला.”

“बाकी जाऊ दे, पण तू वडिलांवर कितीही व्यक्त हो, त्यांना त्यांच्या लेकापेक्षा लेकीच प्रिय.”

“हे काय सगळ्यांच्या बाबतीत लागू नाहीये.”

“अरे, पण जास्त करून असंच असतं की नाही?

“हो, पण त्यात बापाची चूक नाही. तो मुलीबाबत जास्त हळवा असतो इतकंच.”

“इतका हळवा की मला अगदी हिडीस-फिडीस करावं का?”

“सिद, chill. काय भांडला आहेस का वडिलांसोबत?”

“तसं नाही यार वेद, मुलाचं वडिलांसोबत नातं सोपं नसतं नाही?”

“नाही. नसतं. हे मला मान्य आहे.

“मी तर म्हणेन ते थोडं अर्धवट असतं.”

“अर्धवट?”

“हां... बाकी काही असो... पण त्या निमित्ताने म्हण किंवा काय, मी वडिलांवर थोडसं लिहिलंय वेद..”

“तू लिहिलंयस?”

“हो.”

“मगाशी तर म्हणत होतास मला days चं काही कौतुक नाही आणि तू तर लिहिलंयस...”

“आता बोलू की नको?”

“आता काय बोलतोस?”

“अरे म्हणजे ऐकवू की नको?”

“काय ऐकवतोस?”

“माझी थट्टा करणार असशील तर नंतर बोलू.”

“तसं नाही रे... तू आणि लिहिलं आहेस हे ऐकूनच जरा हसू येतंय.”

“एखाद्याला कौतुक वाटलं असतं, तुला हसू येतंय.”

“गप रे... college सुटल्यानंतर पेन सुद्धा हातात नाही घेतलंस आणि आज काहीतरी लिहिलंयस??”

सिद काहीच बोलला नाही. आता मात्र वेद थोडा serious होत म्हणाला की ऐकव.

 

सिद थोडी background देऊ लागला, “कदाचित अनेकांच्या मनातलं असेल हे.”

वेद म्हणाला, “ते आम्ही ठरवू. मुद्द्यावर या.”

सिद बोलू लागला, “कवितेचं नाव आहे- बाप लेकाचं नातं!

त्यांना वाटावं मी काही बोलावं,

मला वाटावं त्यांनी काही बोलावं,

बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?

आमच्या या अबोल असण्याने दोघांना अधुरं अधुरं का सोडावं?

 

काही बोलायचं म्हणजे भय वाटावं!

न बोलणंच जास्त सोयीचं होऊन जावं!!

अंतराने संवादाला का मारावं?

आमचं नातं अधुरं का राहावं?

 

दुराव्याला घाबरावं,

जवळ येण्यालाही भ्यावं,

असलं कसलं नातं असावं?

बाप लेकांना ज्याने अधुरं ठेवावं!

 

बापाचं मग वय व्हावं,

त्याने अलगद ‘बाळा’ म्हणावं!

मलाही नकळत भरून यावं,

पण ते दाखवण्याचं धैर्य तेव्हाही नसावं!

बाप लेकाच्या नात्याला नेमकं काय म्हणावं?

 

आमच्या संवादाने कायम अबोल व्हावं!

घट्ट मिठीने संवादाला नवं स्वरूप द्यावं!

मी त्यांना बिलगावं,

त्यांना न दाखवता मी, नि मला न दाखवता त्यांनी, अश्रूंच्या धारेला मोकळं होऊ द्यावं!

 

मी मोकळं व्हावं,

त्यांनी मोकळं व्हावं,

अधुऱ्या नात्याला अश्रूंनी धूसर करावं,

नि त्या अधुरं असण्याला आता कदाचित पूर्णत्त्व मिळावं!!”

 

वेद काहीच बोलत नव्हता. त्याने अलगद कवितेचा कागद घेतला. त्यावर खाली सिद ने आपलं नाव लिहिलं होतं आणि तारीख होती. तारीख १ वर्षापूर्वीची होती.

वेद पटकन म्हणून गेला, “बाप-लेकाच्या नात्याचं गणित हे असं का असावं?

वर्षापूर्वी लिहिलेलं तू त्यांना आत्ता का द्यावंस?”

सिद म्हणाला, “कदाचित आमचं हे नातं असं अव्यक्तच असावं!!!”

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...