Skip to main content

Posts

हत्ती आणि आत्मविश्वास

Photography- Varun Bhagwat भलाथोरला हत्ती पाहिला. एक नाही. अनेक होते. आपापल्या विश्वात रमले होते. निवांतपणे डुलत- डुलत फिरत होते. का नाही फिरणार... ही तर त्यांची जागा.. हे तर अभयारण्य. इथे आपण माणसं बंदी आणि ते मोकळे! बंद राहण्यावरून एक गोष्ट आठवली. एक माणूस रस्त्यावरून जात होता.   रस्ता कच्चा, विशेष वर्दळ नव्हती. त्या रस्त्याच्या कडेला बांधलेला हत्ती त्याला दिसला. आता हत्तीसारखा प्राणी म्हणजे किती अवाढव्य असतो याची आपल्याला कल्पना आहेच. पण इतक्या अवाढव्य प्राण्याला बांधून ठेवणं ही कल्पना आधी त्या माणसाला challenging वाटली. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की एवढा अजस्त्र हत्ती फक्त एका दोरखंडाने बांधला होता. ते ही एका पायाला तेवढा दोरखंड होता. त्याचं कुतूहल वाढलं. त्याने पाहिलं की कदाचित एखादा साखळदंड असेल किंवा अदृश्य पिंजरा. पण कसलं काय... काहीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. फार कोणी नव्हतं. तेवढ्यात तिथे जवळच एक माणूस गवत कापताना दिसला. त्याने त्या गवत कापणाऱ्या माणसाला विचारलं, “काय हो, हा हत्ती एका दोरखंडाने कसा काय बांधता आला. हा ते दावं तोडू शकत नाही?” ...

गोल्डन टीम वर्क

Photo Courtesy : Sushil Ladkat कॉलेजवयीन मुलांचा एक ग्रुप टेकडीवर व्यायामासाठी आला होता. व्यायाम करून आता सगळे थकले होते. थोडी विश्रांती घेत होते. विश्रांती घेऊन थोड्याच वेळात ते निघणार होते. मी ही तिथे त्यांच्या ग्रुप पासून थोड्या अंतरावर होतो, माझे शूज घालत होतो. कुठल्या तरी खेळाविषयी ते बोलत होते. त्यांच्यातला एक जण म्हणाला,     “या वेळी गोल्ड मेडल बरं का!   कोणाचंच गेलं नाही पाहिजे.”   मला साधारण अंदाज आला की हे एकाच जुनियर कॉलेज मधले असावेत आणि athletics च्या निनिराळ्या प्रकारांत यांनी भाग घेतलेला असावा. सगळ्याचं ध्येय होतं की आपल्या सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे. त्यांचं स्पिरीट पाहून छान वाटलं. तोच त्यांच्यातला अजून एक जण म्हणाला, “हो हो, सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं पाहिजे, मला सोडून!! दुसरा म्हणाला, “ए रोहित, काय रे तुला सोडून म्हणजे काय?” रोहित उत्तरला, “नाही रे, या वेळी खेळताना जरा दम लागतोय. अरे यार यश, माझं अवघड आहे....” यश म्हणाला, “तुझी तयारी आम्ही करून घेऊ. पण म्हणायचं की गोल्ड मिळणार म्हणजे मिळणार.”   इतक्या वेळात माझे शूज घा...

पहिली वाफ

कौरव आणि पांडव यांच्या मधलं युद्ध संपलं होतं.  दुर्योधन म्हणजेच धृतराष्ट्र याचा ज्येष्ठ पुत्र. भीमाने त्याचा पाडाव केला, त्याला मारलं आणि कौरवांवर विजय मिळवला. धृतराष्ट्र या बातमीने हळहळला. त्याने भीमाला भेटायची इच्छा व्यक्त केली. भीम सामोरा गेला. धृतराष्ट्र बघू शकत नसे. तो अंध होता. मात्र हे जाणून होता की भीमाने आपल्या मुलाला मारलंय. दुःख व्यक्त करण्याचा बहाणा करत त्याने भीमाला जवळ बोलावलं आणि आलिंगन दिलं. इतकी जोरात त्याने मिठी मारली आणि आपल्या मुलाला मारल्याचा राग त्याने भीमावर काढला. जवळ जवळ भीम मोडला असं त्याला जाणवलं आणि त्याने मिठी सोडली आणि आक्रोश केला की हे मी काय केलं मी तर भीमाला मारलं. त्याचे खोटे अश्रू पाहून मात्र कृष्णाने थोडी मध्यस्थी केली. कृष्णाने जाणूनबुजून भीमाला पाठवायच्या ऐवजी भीमाचा त्याच्याच आकाराचा पुतळा समोर उभा केला होता. धृतराष्ट्र बघू शकत नव्हता. त्याने पुतळ्याला घट्ट मिठी मारून त्याचा चुराडा केला होता. भीम वाचला. कृष्ण म्हणाला, घाबरु नका. आता भीमाला भेटा. तो गेला नाही.. जीवंत आहे. कृष्णाने खूप सोपी गोष्ट केली होती. रागाची भावना नष्ट होऊ देण्यासाठी तो पु...

पाटी- पेन्सिल

पाटी पेन्सिल असली की वाट्टेल ते लिहिता येतं आणि नको ते पुसताही येतं. ठरवलं तर आयुष्यातल्या नकोशा गोष्टीही (आठवणी) पुसून टाकता येतील, आणि वाट्टेल ती सुरुवात करता येईल, कोऱ्या पाटीसारखी. नाही का? -वरुण भागवत