Skip to main content

पहिली वाफ


कौरव आणि पांडव यांच्या मधलं युद्ध संपलं होतं. 
दुर्योधन म्हणजेच धृतराष्ट्र याचा ज्येष्ठ पुत्र. भीमाने त्याचा पाडाव केला, त्याला मारलं आणि कौरवांवर विजय मिळवला.
धृतराष्ट्र या बातमीने हळहळला. त्याने भीमाला भेटायची इच्छा व्यक्त केली. भीम सामोरा गेला.
धृतराष्ट्र बघू शकत नसे. तो अंध होता. मात्र हे जाणून होता की भीमाने आपल्या मुलाला मारलंय. दुःख व्यक्त करण्याचा बहाणा करत त्याने भीमाला जवळ बोलावलं आणि आलिंगन दिलं. इतकी जोरात त्याने मिठी मारली आणि आपल्या मुलाला मारल्याचा राग त्याने भीमावर काढला. जवळ जवळ भीम मोडला असं त्याला जाणवलं आणि त्याने मिठी सोडली आणि आक्रोश केला की हे मी काय केलं मी तर भीमाला मारलं.

त्याचे खोटे अश्रू पाहून मात्र कृष्णाने थोडी मध्यस्थी केली. कृष्णाने जाणूनबुजून भीमाला पाठवायच्या ऐवजी भीमाचा त्याच्याच आकाराचा पुतळा समोर उभा केला होता. धृतराष्ट्र बघू शकत नव्हता. त्याने पुतळ्याला घट्ट मिठी मारून त्याचा चुराडा केला होता.

भीम वाचला. कृष्ण म्हणाला, घाबरु नका. आता भीमाला भेटा. तो गेला नाही.. जीवंत आहे.


कृष्णाने खूप सोपी गोष्ट केली होती. रागाची भावना नष्ट होऊ देण्यासाठी तो पुतळा समोर नेला होता. पहिली वाफ जाऊ दिली होती. मग नंतर रागाच्या भावनेची तीव्रता कमी झाल्यावर भीमाला समोर केलं होतं.

अनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.

"ठंडा कर के खाओ।"

म्हणजे आपलंच तोंड भाजत नाही.


- वरुण भागवत
- वेळ: थंड करून खाण्याची!

Comments

  1. सहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय ���� अप्रतिम ����

    ReplyDelete
  2. सहज सोप्या शब्दांत अंतर्मुख होत विचार करायला लावणाऱ्या ओघवत्या भाषेत लिहिलंय.. अप्रतिम...

    ReplyDelete
  3. Khup Chan sir

    अनेक असे प्रसंग येतात जेव्हा समोरचा अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तिथे त्याला थांबवता येत नाही. थांबवू सुद्धा नाही आणि उलट सुद्धा बोलू नाही. फक्त बोलू द्यावं. एकदा का पहिली वाफ गेली की मग आपले मुद्दे अगदी पद्धतशीरपणे मांडता येतात... मग त्याचीही मनस्थिती आपलं ऐकून घेण्याची झालेली असते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...