Skip to main content

हत्ती आणि आत्मविश्वास

Photography- Varun Bhagwat


भलाथोरला हत्ती पाहिला. एक नाही. अनेक होते. आपापल्या विश्वात रमले होते. निवांतपणे डुलत- डुलत फिरत होते. का नाही फिरणार... ही तर त्यांची जागा.. हे तर अभयारण्य. इथे आपण माणसं बंदी आणि ते मोकळे!


बंद राहण्यावरून एक गोष्ट आठवली.

एक माणूस रस्त्यावरून जात होता.  रस्ता कच्चा, विशेष वर्दळ नव्हती. त्या रस्त्याच्या कडेला बांधलेला हत्ती त्याला दिसला. आता हत्तीसारखा प्राणी म्हणजे किती अवाढव्य असतो याची आपल्याला कल्पना आहेच. पण इतक्या अवाढव्य प्राण्याला बांधून ठेवणं ही कल्पना आधी त्या माणसाला challenging वाटली. त्याने नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की एवढा अजस्त्र हत्ती फक्त एका दोरखंडाने बांधला होता. ते ही एका पायाला तेवढा दोरखंड होता. त्याचं कुतूहल वाढलं. त्याने पाहिलं की कदाचित एखादा साखळदंड असेल किंवा अदृश्य पिंजरा. पण कसलं काय... काहीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. फार कोणी नव्हतं. तेवढ्यात तिथे जवळच एक माणूस गवत कापताना दिसला. त्याने त्या गवत कापणाऱ्या माणसाला विचारलं, “काय हो, हा हत्ती एका दोरखंडाने कसा काय बांधता आला. हा ते दावं तोडू शकत नाही?”

 

यावर गवत कापणारा मनुष्य हसला. गवत कापता कापता तो म्हणाला, “हा हत्ती लहान होता तेव्हा त्याला पहिल्यांदा या दोरखंडाने बांधलं होतं. तेव्हा त्याच्यात इतकी ताकद नव्हती की तो हे तोडू शकेल. तेव्हा तर या पेक्षा सुद्धा चांगलंच अजून घट्ट पण बांधलं होतं. तेव्हा त्याने प्रयत्न केला होता स्वतःला सोडवायचा पण ते शक्य झालं नाही. त्यानंतर त्याची अशीच समजूत झाली की हा दोरखंड आपल्याला बांधून ठेवतो. हा आपण तोडू शकत नाही. त्यानंतर त्याने प्रयत्नच सोडून दिला.”

Photography- Varun Bhagwat
 

माझं लक्ष पुन्हा अभयारण्यात मुक्तपणे बागडणाऱ्या, जलक्रीडा करणाऱ्या हत्तीकडे गेलं. या हत्तीला म्हणावंसं वाटलं की तुमची भाषा तुम्हाला कळत असेल.. त्यामुळे जा आणि त्या बांधलेल्या हत्तीला सांग की तुला कोणी बांधलं नाहीये. मान्य आहे तेव्हा याला दोर तोडता आला नसेल. पण आता... आता प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 

आपल्या आयुष्यात असे अनेक दोरखंड असतात. सुरुवातीला तर ते तापदायक वाटतात. पण एक वेळ येते जेव्हा त्यांना तोडून आत्मविश्वासाने पुढे जाणं शक्य असतं. पण त्याच वेळेला कच खाल्ली जाते आणि या दोरखंडाचं महत्त्व उगीच वाढतं. लहानपणी कधी तरी एखाद्याला स्टेज वर जाण्याची भीती बसते. मोठं झाल्यावर ती भीती तशीच राहते. आपणच आपली भीती घालवू शकतो.. पण मी हे करू शकतो हा विश्वास पाहिजे. कधीकधी एकाच झटक्यात हा दोरखंड तोडून आपण मनाने बंधमुक्त होऊ शकतो. पण त्यासाठी तोडणाऱ्याची तयारी पाहिजे. हा भीतीचा दोरखंड तुटला की अभयारण्यात आत्मविश्वासाने वावरणाऱ्या हत्तीसारखे आपण मनाने मजबूत होतो.

 

बोलता बोलता अभयारण्य मागे पडलं. हत्ती त्याच्या विश्वात मोकळा होता नि मी माझ्या विश्वात! तनाने मोकळा झालोच पण मनाने सुद्धा मोकळा झालो होतो आणि आता त्या बांधलेल्या हत्तीच्या शोधात होतो.  

-       वरुण भागवत

Comments

  1. True...prtekane aple dorkhand velich todle pahije

    ReplyDelete
  2. खूप छान. असच लिहीत जा. खूप वाचन करा.

    ReplyDelete
  3. Replies
    1. आंतरिक शक्ती ओळखून काम करायला शिकल पाहिजे, आणि ती आंतरिक शक्ती वेळोवेळी पडताळून पाहिली पाहिजे. छान संदेश

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...