Skip to main content

रागाच्या भरात…

 


मनोज आज त्याच्या psychologist कडे गेला. एकूणच routine बोलणं झाल्यानंतर dr. साटम यांनी एकच प्रश्न विचारला- “राग पटकन येतो ना तुम्हाला Mr. मनोज?” आपल्या रागाचा आपल्याला फार अभिमान आहे अशा थाटात मनोज उत्तरला, “अर्थात.” खरंतर राग येणं ही काही भूषणावह गोष्ट नाही. पण मनोज मात्र आपल्या रागाचं समर्थन करत आहे आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे हे dr. साटम यांना जाणवलं. ते शांत होते. मनोज बोलत होता, “मी रागावतो , मान्य आहे. पण आता समोरचा चुकतो किंवा कधी नाही घडत गोष्टी मनाप्रमाणे. मग येतो राग.”


“यावर काही उपाय असावा किंवा करावा असं नाही वाटत का मग तुम्हाला?” dr. साटम यांनी प्रश्न केला.   

“रागावर उपाय असतो?” मनोजचा प्रतिप्रश्न.

“ठरवला आणि योजला तर असतो.” साटम उत्तरले.

“सांगून बघा मला. Try करण्याचा try करेन.” स्वत:च्याच उत्तरावर मनोज खुश झाला. 


डॉक्टरांनी काहीच react केलं नाही. त्यांनी मनोजच्या हातात फक्त एक चिट्ठी दिली. मनोज चिट्ठी घेऊन निघून गेला. त्याने ती चिट्ठी तिथे तरी उघडून बघितली नाही. घरी आला. नेमके त्याच दिवशी त्याचे त्याच्या पत्नीसोबत अगदी क्षुल्लक कारणावरून मतभेद झाले. मनोज काहीतरी तिला लागेल असं बोलला होता, हे त्याला थोडं का होईना, जाणवलं. अजूनही त्याने चिट्ठी उघडली नव्हती. पण या घटनेनंतर तो घराचं दार जोरात आपटून बाहेर मोकळ्या हवेवर गेला. त्याला चिट्ठीची आठवण झाली. त्याने खिसा चपापला. 


चिट्ठी उघडली. वाचू लागला. त्यात लिहिलं होतं- या चिट्ठीत एक गोष्ट आहे. एकदा सहज म्हणून वाचा. कदाचित कुठेतरी फायदेशीर ठरू शकते. एक होता १४ वर्षांचा मुलगा. खूप हट्टी होता. नुसता हट्टी नाही, थोडा रागीट पण होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडायचा, भांडायचा. रागाच्या भरात कोणालाही, काहीही बोलायचा. त्याच्या बाबांनी ठरवलं की यावर काहीतरी उपाय योजला पाहिजे. हा असा राग बरा नाही. 


एक दिवस  बाबा त्याला म्हणाले, “बाळा. तुला राग येतो ना?”

“हो.” मुलगा उत्तरला.

“बरं. एक काम करशील?”

“रागवायचं नाही असं सांगू नका.”

“नाही, मी असं काही म्हणालो का?”

“नाही.”

“मग?” मुलाने प्रश्न केला.

“तू बिनधास्त चीड, रागाव. तुझं तुला कळेलच की आपण चिडलो आहोत. तुला कशाचाही, कोणाचाही राग आला तर एक काम करायचं.” असं सांगत बाबा त्याला त्यांच्या अंगणात, घरातल्या बागेत घेऊन गेले. बागेच्या कुंपणाचं काम चालू होतं. बाबांनी तिथे एक लाकडी फळी आणली होती. मुलाच्या हातात हातोडी आणि खिळ्याचा बॉक्स देत ते म्हणाले, “तुला राग आला की ही हातोडी आणि यातला एक खिळा घ्यायचा आणि तो या लाकडी फळीवर ठोकायचा.” मुलाला गंमत वाटली.


तो चिडायचा, रागवायचा. मग बाबांनी सांगितल्याप्रमाणे खिळा घेऊन हातोडीने त्या लाकडी फळीवर ठोकायचा. असं अनेक दिवस चाललं. लाकडी पट्टी खिळ्यांनी भरून गेली. एक दिवस मुलगा खेळाच्या mood मध्ये होता. बाबांना ती संधी योग्य वाटली. ते म्हणाले, “आता हे ठोकलेले खिळे एक एक करून काढून टाक. मुलाने ऐकलं. बाबांनीही ते काढायला मदत केली. बाबा सांगू लागले, “आता ही लाकडाची फळी बघ. पूर्वीसारखी राहिली का रे?” मुलगा म्हणाला, “पूर्वीसारखी म्हणजे?”  

“तू खिळे मारलेल्या जागी काय झालं?” बाबांनी प्रश्न केला.

मुलगा थोडा विचार करत म्हणाला, “तिथे छिद्र पडली.”

बाबा म्हणाले, “खरंतर मारलेले खिळे तू पुन्हा काढून टाकलेस. तरी छिद्र तशीच राहिली.”

“बाबा, एकदा खिळा ठोकला म्हणजे पुन्हा तो काढला तरी तिथे फळी damage होणारच ना?”

“Exactly my point. जेव्हा आपण कोणाला तरी बोलतो, तेव्हा त्याच्या मनावर पण असाच आघात होतो. तिथे खिळा नसतो, त्यामुळे आघात  आणि त्यामुळे झालेलं damage दिसत नाही. पण त्या व्यक्तीच्या मनात आपण बोललेले वाईट शब्द राहतात. पटकन जात नाहीत.”

“Sorry बाबा.” असं म्हणत मुलगा बाबांना बिलगला.



गोष्ट वाचून पूर्ण झाली. मनोजने चिठ्ठीची घडी घातली. घरात गेला. त्याची पत्नी चहाची तयारी करत होती. तो म्हणाला, “मी करतो चहा.” ती काही न बोलता जाऊ लागली. मनोजने तिला थांबवायचा प्रयत्न केला. ती hall मध्ये जाऊन बसली. त्याने चहा केला. कप टी-पॉयवर नेऊन ठेवला. कोणी काहीच बोलत नव्हतं. तिने कप उचलला. कप उचलताच तिचा पडलेला चेहरा थोडा बदलला. कपाच्या खाली छोटी चिट्ठी होती- Sorry!

ती  मनाशीच हसली. नजरेने मनोजला शोधत होती. मनोज डॉक्टर साटमला मनातूनच thanks म्हणत तिच्यापाशी आला. आता कुठे तो तिच्या नजरेतून तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता. 


  • वरुण भागवत       

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...