Skip to main content

माणूस प्रेमाचा भुकेला असतो! - भाग २

 

A click by Varun 

प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही.

प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात?



'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते.



हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं.


प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात!

पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं.

यामुळे,

माणसाचं माणूसपण हरवू शकतं.

निरागस मन बंडखोर बनू शकतं.


प्रेमाची व्याख्या काही नाही.

प्रेम विकत मिळत नाही.


पण,

प्रेम वाटता येतं,

प्रेम वाढवता येतं.

प्रेम सहज असतं.

प्रेम गरजेचं असतं.


प्रेम प्रेमळ असतं.

प्रेम आजकाल दुर्मिळ असतं.


प्रेम नात्यातला ओलावा वाढवतं.

प्रेम अनेक प्रश्न सोडवतं.


या जगाला प्रेमाची गरज आहे.

कारण माणूस प्रेमाचा भुकेला आहे.



म्हणूनच कधी कुठे कोणाची सिस्टिम गडबड करू लागली तर वेळीच प्रेमाचा उपाय अवलंबला पाहिजे... सिस्टीम क्रॅश होण्याआधीच!!! कारण एकदा सिस्टीम क्रॅश झाली अर्थात गोष्ट हाताबाहेर गेली की मग ती पुन्हा पूर्ववत करणं हे फार फार फार अवघड होऊन बसतं. या सिस्टीमकडे वेळोवेळी पाहणं, दखल घेणं महत्त्वाचं. आपण महत्त्वाचे आहोत असं माणसाला जाणवलं की तो सुद्धा समोरच्यावर जीवापाड प्रेम करू लागतो.  कारण तो प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम मिळाल्याने तो त्याच्यात वाढच करणार असतो. प्रेम असं दिल्याने आटत नाही, वाढतं. प्रेमाची भूक पण लगेच संपत नाही, पण वेळोवेळी प्रेम दिलं की।ती शमत राहते. प्रेम दिलं की प्रेम मिळतं सुद्धा. अनेकदा माणसं आपल्याला प्रेम मिळणारंच नाही या खात्रीने कोणावर जीवच लावायला जात नाही आणि मग खरोखरीच एकटं पडायला होतं.


त्यामुळे या सिस्टीम चा सातत्यानं विचार होणं महत्त्वाचं.  क्रॅश झाली नाही म्हणजे मिळवलं.


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...