Skip to main content

माणूस प्रेमाचा भुकेला असतो! - भाग २

 

A click by Varun 

प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही.

प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात?



'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते.



हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं.


प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात!

पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं.

यामुळे,

माणसाचं माणूसपण हरवू शकतं.

निरागस मन बंडखोर बनू शकतं.


प्रेमाची व्याख्या काही नाही.

प्रेम विकत मिळत नाही.


पण,

प्रेम वाटता येतं,

प्रेम वाढवता येतं.

प्रेम सहज असतं.

प्रेम गरजेचं असतं.


प्रेम प्रेमळ असतं.

प्रेम आजकाल दुर्मिळ असतं.


प्रेम नात्यातला ओलावा वाढवतं.

प्रेम अनेक प्रश्न सोडवतं.


या जगाला प्रेमाची गरज आहे.

कारण माणूस प्रेमाचा भुकेला आहे.



म्हणूनच कधी कुठे कोणाची सिस्टिम गडबड करू लागली तर वेळीच प्रेमाचा उपाय अवलंबला पाहिजे... सिस्टीम क्रॅश होण्याआधीच!!! कारण एकदा सिस्टीम क्रॅश झाली अर्थात गोष्ट हाताबाहेर गेली की मग ती पुन्हा पूर्ववत करणं हे फार फार फार अवघड होऊन बसतं. या सिस्टीमकडे वेळोवेळी पाहणं, दखल घेणं महत्त्वाचं. आपण महत्त्वाचे आहोत असं माणसाला जाणवलं की तो सुद्धा समोरच्यावर जीवापाड प्रेम करू लागतो.  कारण तो प्रेमाचा भुकेला असतो. प्रेम मिळाल्याने तो त्याच्यात वाढच करणार असतो. प्रेम असं दिल्याने आटत नाही, वाढतं. प्रेमाची भूक पण लगेच संपत नाही, पण वेळोवेळी प्रेम दिलं की।ती शमत राहते. प्रेम दिलं की प्रेम मिळतं सुद्धा. अनेकदा माणसं आपल्याला प्रेम मिळणारंच नाही या खात्रीने कोणावर जीवच लावायला जात नाही आणि मग खरोखरीच एकटं पडायला होतं.


त्यामुळे या सिस्टीम चा सातत्यानं विचार होणं महत्त्वाचं.  क्रॅश झाली नाही म्हणजे मिळवलं.


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...