Skip to main content

माणूस प्रेमाचा भुकेला असतो!

A click by: Sushil Ladkat



माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे प्रेमाची आणि प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत फार जास्त जाणवते.. पण काहींच्या वाट्याला अशाच काळात आपल्याच माणसांकडून प्रेमाची परतफेड द्वेषाने मिळते.


KD नावाचा सिनेमा प्रेमाचं गणित छान मांडतो.


माणसं आपल्याच माणसाच्या जीवावर उठतात हे करुप्पा दुराई अर्थात KD ने ऐकलं होतं, पाहिलं होतं; पण आपली पोरं आपल्याच जीवावर उठतील याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. वडील आता ओझं झालेत या विचाराने मुलंच आपल्या ७५ वर्षाच्या पित्याला मारायचं ठरवतात. हे कळताच करुप्पा तिथून पळ काढतो. भटकत असताना त्याला १० वर्षांचा मुलगा भेटतो ज्याचं कोणीच नसतं.


प्रेम दिल्याने वाढतं हे अनुभवातून जाणणारा हा म्हातारा आणि कधीच प्रेम न मिळालेला हा कुट्टी नावाचा पोरगा यांच्यात फार जवळचं नातं निर्माण होतं.

कोणीही विचार केला नसेल असा विचार कुट्टी करतो आणि करूप्पा ची bucket list बनवतो. अर्थात अशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या किंवा ज्या करायला फार आवडतील अशी लिस्ट. मग सुरू होतो नि बहरत जातो एक निखळ प्रवास. ज्यात असतं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा!


प्रेमाचं असंच आहे. रक्ताचं नातंच जर सर्वश्रेष्ठ असतं तर मैत्री नावाची संकल्पना बहरलीच नसती. आपलीच माणसं कशी वागतील हे माहीत नसून पण आपण अक्षरशः जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावर पण अनेकदा त्यांना किंमत कळत नाही. पण एखादं कोणीतरी भेटतं जे प्रेमाचं भुकेलं असतं आणि थोडंसं जरी आपण प्रेम दिलं तरी आपल्यावर दुपटीने वर्षाव होतो प्रेमाचा!!


प्रेम ओरबडणारे खूप आहेत. प्रेम लावणारा पाहिजे.

जीव घेणारे पण आहेत; आपल्याला जीवाला जीव देणारा पाहिजे.

पापी खूप आहेत.. निरागसता शोधणारा पाहिजे.

आयुष्य संपवणारे खूप आहेत. खुलवणारा पाहिजे.

आपल्यावर हसणारे खूप आहेत. हसवणारा पाहिजे.

तोडणारे अनेक आहेत. जोडणारा पाहिजे.


अशा जोडणाऱ्या व्यक्तीला सोडायचं नाही. तेच आपलं माणूस!


या जगाला प्रेमाची खूप गरज आहे. प्रेम लावणारा पाहिजे.

कारण माणूस प्रेमाचा भुकेला असतो.


- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...