Skip to main content

माणूस प्रेमाचा भुकेला असतो!

A click by: Sushil Ladkat



माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे प्रेमाची आणि प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत फार जास्त जाणवते.. पण काहींच्या वाट्याला अशाच काळात आपल्याच माणसांकडून प्रेमाची परतफेड द्वेषाने मिळते.


KD नावाचा सिनेमा प्रेमाचं गणित छान मांडतो.


माणसं आपल्याच माणसाच्या जीवावर उठतात हे करुप्पा दुराई अर्थात KD ने ऐकलं होतं, पाहिलं होतं; पण आपली पोरं आपल्याच जीवावर उठतील याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. वडील आता ओझं झालेत या विचाराने मुलंच आपल्या ७५ वर्षाच्या पित्याला मारायचं ठरवतात. हे कळताच करुप्पा तिथून पळ काढतो. भटकत असताना त्याला १० वर्षांचा मुलगा भेटतो ज्याचं कोणीच नसतं.


प्रेम दिल्याने वाढतं हे अनुभवातून जाणणारा हा म्हातारा आणि कधीच प्रेम न मिळालेला हा कुट्टी नावाचा पोरगा यांच्यात फार जवळचं नातं निर्माण होतं.

कोणीही विचार केला नसेल असा विचार कुट्टी करतो आणि करूप्पा ची bucket list बनवतो. अर्थात अशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या किंवा ज्या करायला फार आवडतील अशी लिस्ट. मग सुरू होतो नि बहरत जातो एक निखळ प्रवास. ज्यात असतं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा!


प्रेमाचं असंच आहे. रक्ताचं नातंच जर सर्वश्रेष्ठ असतं तर मैत्री नावाची संकल्पना बहरलीच नसती. आपलीच माणसं कशी वागतील हे माहीत नसून पण आपण अक्षरशः जीव ओवाळून टाकतो त्यांच्यावर पण अनेकदा त्यांना किंमत कळत नाही. पण एखादं कोणीतरी भेटतं जे प्रेमाचं भुकेलं असतं आणि थोडंसं जरी आपण प्रेम दिलं तरी आपल्यावर दुपटीने वर्षाव होतो प्रेमाचा!!


प्रेम ओरबडणारे खूप आहेत. प्रेम लावणारा पाहिजे.

जीव घेणारे पण आहेत; आपल्याला जीवाला जीव देणारा पाहिजे.

पापी खूप आहेत.. निरागसता शोधणारा पाहिजे.

आयुष्य संपवणारे खूप आहेत. खुलवणारा पाहिजे.

आपल्यावर हसणारे खूप आहेत. हसवणारा पाहिजे.

तोडणारे अनेक आहेत. जोडणारा पाहिजे.


अशा जोडणाऱ्या व्यक्तीला सोडायचं नाही. तेच आपलं माणूस!


या जगाला प्रेमाची खूप गरज आहे. प्रेम लावणारा पाहिजे.

कारण माणूस प्रेमाचा भुकेला असतो.


- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...