Skip to main content

प्रवाही...

 

A Click By: Sushil Ladkat

"गरम स्टोव्ह च्या धगी जवळ १ मिनिट जरी हात ठेवला तरी तो तासभर ठेवल्यासारखा वाटतो. हेच जर का आवडणाऱ्या मुलीसोबत एक तास घालवला तर मात्र एका मिनिटा इतकाच वाटतो." आईनस्टाईन ची रिलेटीविटी हीच की काय? हा वाचनात आलेला किस्सा.

 

पण यातून जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं गणित खरोखरीच असं असतं. आवडत्या कामात आपण वेळेचा track पूर्णपणे विसरून जातो. ज्या दुपारी आपण आपल्या आवडीचं पुस्तक वाचतो त्या वेळी आपल्या लक्षातही येत नाही की दुपार कशी निघून गेली. हीच दुपार काही मनाजोगतं काम नसेल तर उदास, भकास, रखरखीत वाटते. म्हणजेच काय प्रवाहात वाहता आलं पाहिजे. (प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा इथे काही संबंध नाही.)

म्हणण्याचा अर्थ असा की आपल्याला आपल्या कामात झोकून देता आलं पाहिजे. फालतू गोष्टींनी आपली एकाग्रता हलता कामा नये. नाहीतर आपण कामाला सुद्धा न्याय देऊ शकत नाही नि वेळेला सुद्धा!

वेळेचा दुरुपयोग सहज होतो, काहीच न करता. पण सदुपयोग  करण्यासाठी planning लागतं. एका वेळी अनेक काम करत सगळ्या कामांचा बट्ट्याबोळ करण्या ऐवजी एका वेळी एक काम तडीस नेत ठरलेल्या वेळेत ठरवलेली आणि ऐनवेळी येणारी कामं पूर्ण करणे.

थोडक्यात काय तर आपण जे काम करतोय ते काम इतक्या तन्मयतेने व्हावं की वेळेचं भान राहू नये. (चांगल्या अर्थाने). निष्कर्षातून सिद्ध झालेली गोष्ट असंच सांगते की एका वेळी एक काम एकाग्र चित्ताने केलं तर त्याचे results जास्त उत्तम येतात. इथे आपल्याकडची फार सुंदर म्हण लागू पडते ती म्हणजे एक ना धड नि भाराभर चिंध्या!’  हे असं होता कामा नये.

वेळ वाहत असते. कधी slow तर कधी fast. slow आणि fast हा झाला आपला दृष्टीकोन. स्टोव्ह आणि आवडणारी मुलगी. कधी मिनिट तासासारखं तर कधी तास मिनिटाहून कमी. खरं पाहिलं तर वेळेची गती तीच असते. आपली गती आपण ठरवली पाहिजे.

वेळ प्रवाही आहे. आपल्याला त्यासोबत वाहता आलं पाहिजे; मात्र वाहवत जाणं बरं नाही. बऱ्याचदा तेच होतं. मला article लिहायचं असतं. मग त्या दृष्टीने research करण्यासाठी मी थोडी google ची मदत घेतो. म्हणजेच मी इंटरनेट चालू करतो. यात मग research करता करता बाकी अनेक गोष्टी मला distract करायला ready च असतात. मी तिकडे किती बघतो आणि माझ्या research वर किती एकाग्र राहतो यावर माझ्या article चं पूर्ण होणं (नुसतं पूर्ण नाही, ते प्रवाही वाटणं) अवलंबून असतं. गोष्टी प्रवाही असतील तर त्याला एक ताल, सूर आणि लय प्राप्त होते. आपल्याला स्वतःला ते करताना मजा येते.

 

पण या सगळ्या झाल्या ideal conditions. ही लय कायम मिळेलच असं नाही. वेळेचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपली स्वतःची किंवा स्वतःला हवी असणारी वेळ कोणीतरी हिरावून घेतं. याचं मुख्य कारण म्हणजे unavoidable tasks. ज्याचं आपण काहीच करू शकत नाही. ते tasks संपवून पुन्हा अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणं हे खरं मग challenge. पण इथेसुद्धा कुठे पोहोचायचं आहे हे clear असेल तर मग पुन्हा flow मध्ये शिरता येतं.

A click by: Sushil Ladkat


पाण्यासारखं प्रवाही बनता आलं पाहिजे.

नदीसुद्धा आलेले अडथळे पार करत पुन्हा मुख्य प्रवाहाला लागतेच की. तेच तर करायचं आहे. स्वतःला झोकून देऊन काम करता आलं पाहिजे म्हणजेच प्रवाहात रमता आलं पाहिजे. रमता आलं तर मग स्टोव्ह वर हात ठेवायची वेळ कमी वेळा येईल आणि मिनिट तासासारखं वाटणार नाही. प्रत्येक काम सुंदर वाटेल आवडणाऱ्या मुलीसारखं आणि कामात रममाण झालं की मग कितीही वेळ एक मिनिटाइतकाच कमी वाटेल. relativity च्या theory सारखा... अर्थात energy कायम high राहील आणि वाहत राहता येईल.

 

वरुण भागवत 

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...