Skip to main content

अडचणी, संयम आणि सचिन तेंडुलकर

A click by: Varun Bhagwat


आपल्याला कामात अडचणी येतात. त्या कायमच येत राहणार आहेत. पण आपण प्रयत्न सोडून द्यायचे नाहीत. काहीतरी उपाय काढत राहायचे. शोधायचं. गरज शोधाची जननी असते ही गोष्ट अगदी खरी आहे. पटकन आपण संतापतो, वैतागून जातो.. नेहमीची रड सुरू होते की माझ्याच बाबतीत का?? पण खरं तर असे अनेक 'मी' असतात ज्यांच्या बाबतीत असं काही ना काही होत असतं. अडचण येत राहते. आपण ते हाताळतो कसं हे आपलं कसब! यावर त्याचं यशापयश, परिणाम वगैरे ठरतात. 


सचिन तेंडुलकर सारखा माणूस, वर्ल्ड बेस्ट क्रिकेटर सुद्धा या अडचणींच्या सत्रातून सुटला नाही. एकदा भारताची ऑस्ट्रेलिया सोबत एक सीरिज चालू होती. त्या काळात सचिन ऑफ साईड चे शॉट्स खेळताना बऱ्याचदा आउट झाला होता. सचिन अर्थातच या अडचणीवर उपाय शोधत होता. त्याने जो रामबाण उपाय शोधला, त्याने ऑस्ट्रेलिया चे खेळाडू चक्रावून गेले.


ती टेस्ट मॅच होती. वेळ हाताशी होता. वेगळं काहीतरी करून बघणं शक्य होतं. ऑफ साईड चे शॉट्स खेळताना आपण आउट होतोय हे तो जाणून होता. त्या इंनिंग्ज मध्ये त्याने ठरवून ऑफ च्या खूप बाहेरचे बॉल संयमाने सोडून दिले. बाकी सगळे बॉल्स तो लेग साईड ला खेळला. ऑफ साईड चे सुद्धा काही चेंडू त्याने लेग साईडला वळवले. 


किती संयम लागला असेल? पण डट के खडे रहना है इतकंच त्याला माहित... म्हणून तो संयमाने अडचणींना तोंड देत थांबला. सचिनने त्या इंनींग्जमध्ये नाबाद २४१ धावा केल्या. 

संयम बाळगला तर अशक्य असं काहीच नसतं हे सांगणारं उत्तम उदाहरण म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर!!

संयम विकसित करण्यासाठी संयमाचीच गरज असते. संयमाने संयम वाढतो.

संयमाने वागलं तर फार अवघड गोष्टी साध्य करता येऊ शकतात. 


'डट के खडे रहना है' असं एकदा ठरवलं की मग जमतं! 


- वरुण भागवत

Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...