Skip to main content

बापाचं लग्न


Photo Credit: Sourabh Paranjape

(मित्र चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसले होते)

रवी: अरे माझा बाप दुसरं लग्न करायचं म्हणतोय.

अमर: मग problem काय आहे?

समीर: ए, अरे अमऱ्या, तू बरायस ना?

अमर: I’m serious. काय अडचण आहे?

समीर: तुला विचित्र नाही वाटत का हे?

अमर: अजिबात नाही.

रवी: अरे लोक काय म्हणतील? आता माझं वय आहे लग्न करण्याचं.

अमर: हे बघ हे लग्नाचं वयवगैरे अंधश्रद्धा आहेत. (असं म्हणत हसू लागला.)




रवी: हे बघ, मला वाद नाही घालायचा आणि मस्करीचा तर त्याहून mood नाहीये. समाज काही इतका पुढे गेलेला नाही सगळं accept करायला.

अमर: माझ्या मते समाजाला या गोष्टीचा acceptance फार आधीपासून आहे.




समीर: what do you mean?

अमर: तुला महाभारतातल्या देवव्रताची गोष्ट माहितीये?

रवी: त्याचा इथे काय संबंध?

अमर: direct connection आहे. त्याची आई गंगा आणि वडील म्हणजे राजा शंतनू यांना काही कारणास्तव वेगळं व्हावं लागलं. शंतनूचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. पण ते separate झाले. तुझे आई बाबा सुद्धा separate झाले होते. right?

रवी: हो... अशा अनेक cases असतात.

अमर: पण तुमची फार सारखी आहे.

रवी: कशी?

अमर: अगदी आपल्याकडे court मध्ये निर्णय होतो तसंच mutual understanding त्यांच्यात होतं. देवव्रत आधी आपल्या मातेकडे आणि मोठा झाल्यावर पित्याकडे अर्थात शंतनू कडे राहू लागला. पित्याकडे राहू लागल्यावर कालांतराने त्याने बापाचं म्हणजेच राजाचं मन जाणलं. राजाच्या right hand कडून त्याला ही गोष्ट कळली की आपल्या पित्याचं एकीवर प्रेम जडलय. त्या मुलीचं नाव होतं सत्यवती. पण ही गोष्ट बाप आपल्या मुलाला सांगत नव्हता.

रवी: घ्या... कसा सांगेल? तेवढा sensible तर राजा पण होता.. पण आमचे परमपूज्य...

समीर: थांब त्याला पूर्ण करू देत.



अमर: मग हा देवव्रत स्वतः त्या मुलीच्या वडिलांकडे गेला आणि आपल्या बापासाठी त्या मुलीला मागणी घातली आणि त्यांचं लग्न लावून दिलं.

रवी: are you serious?

समीर: यार.. या देवव्रताचं नाव कधी ऐकलं नाही. तू तयार नाही ना केलीस गोष्ट?

अमर: गोष्ट खरी आहे. देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह... अर्थात भीष्माचार्य..

समीर: महाभारतातलं पहिलं character?

अमर: almost. he had courage to fight for his father and he didn’t care की समाज काय म्हणेल.

समीर: रव्या, त्यांना साथ असावी असं वाटणं स्वाभाविक आहे.

रवी: पण त्यांना आधी सुचायला हवं होतं ना?

अमर: अरे आत्ता मिळालं असेल कोणीतरी मनासारखं... ठरवून घडतात का या गोष्टी? just accept it.

रवी: एवढं सोपं नाहीये.

अमर: हो मान्य आहे. पण ज्या समाजाला दोष देतोयस की ते accept करणार नाहीत त्याचं प्रतीक तू होऊ नकोस म्हणजे झालं. तू त्यांच्या मागे उभा राहा.

(
तेवढ्यात समोर चहा आला.)

समीर: रव्या, मला पण आधी पटत नव्हतं. पण एक खरं आहे की बाप मनातलं नाही रे बोलत. तू lucky आहेस, तुला सागितलं त्यांनी.

अमर: आणि राहिला प्रश्न रव्या तुझ्या लग्नाचा... (खोडकर कटाक्ष टाकत) तुझं आणि तुझ्या बापाचं एकाच मांडवात वाजवून देऊ (हे ऐकताच समीरने घेतलेला चहा फुर्रर्र करून बाहेर काढला आणि रवी पण चहाचा घोट घेत गालात हसला.)

-
वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...