Skip to main content

क्षण आणि आपण

  

A Click by- Varun Bhagwat

रात्रीच्या निवांत वेळी ते दोघे त्या वेळेच्या वेगाने अर्थात तितक्याच शांतपणे आणि आरामात चालत होते. कसलीच घाई नव्हती, गडबड नव्हती. रस्त्याने चालताना दोघांचं बोलणं चालू होतं.

 

ती स्वतःबाबत आणि स्वतःच्या thought process बाबत खूप confident होती. ती त्याला काय काय विचारत होती, तो बोलत होता. बोलता बोलता त्याच्या तोंडी साधारण या अर्थाचं आलं की चाळिशीपर्यंत खूप पैसे कमावून नंतर मग मी माझी hobby जपणार वगैरे!

 

असं म्हणताच तिने विचारलं की चाळिशीपर्यंत किंवा त्यानंतर तू जगणार किंवा जगशील हे तुला कसं माहितीये??? त्याला काय बोलावं सुचेना आणि हा त्या संवादातील एक realization चा point होता.

 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील हृतिक आणि कॅटरिना मधला हा संवाद.

 

त्या realization point ला ती म्हणाली, "Seize the moment" अर्थात हा क्षण भरभरून जग.  उद्याचं कोणी सांगितलं आहे.

 

मुद्दा असा की तो चाळिशीपर्यंत जगेल, १०० वर्षं जगेल हे कोणी सांगूच शकत नाही. जन्म आणि मृत्यू हा तेवढा निसर्गदत्त ठेवला गेलाय. मग आपल्या हातात काय आहे?? असं काही कोणी म्हटलं तर माणसाला भीती वाटते. जाणवतं की अरे बाप रे, खरंच हातात काय आहे?

 

तर आहे ना, आत्ताचा हा क्षण! हा कोणी हिरावून घेऊ शकतो तर ते आपणच. आपणच आपल्या आत्ताच्या चांगल्या क्षणाची माती करतो कधीकधी. त्या क्षणाला सहज वाहू दिलं पाहिजे. तो क्षण सहज जगता आला पाहिजे आणि पूर्ण जगता आला पाहिजे कारण एक नक्की, की ती moment किंवा तो क्षण, ती वेळ एकदा गेली की परत येत नाही.

 

क्षण ही किती छोटी गोष्ट आहे.

माणूस या क्षणाला कित्ती कमी लेखतो.

हे वाक्य बोलेपर्यंत हा क्षण निघून गेला सुद्धा. इतका पटकन तो निघून जातो. हा क्षण जगला किंवा जगायचा राहून गेला तरी अनेकदा त्याचं महत्त्व तो निघून गेल्यावरच कळतं.

 

हा क्षण उत्तम जगला तर मग पुढचा क्षण त्या सुंदर आठवणी आठवण्यात अजून छान जातो. नाही जगला तर भूतकाळाच्या दुःखात माणूस अडकत जातो, नि भविष्याच्या अती चिंतेत गुरफटून जातो.

 

आयुष्य म्हणजे हातात असलेल्या समुद्राच्या रेतीसारखं. आयुष्याला खूप control मध्ये ठेवायच्या प्रयत्नात आणि अती घट्ट पकडायच्या प्रयत्नात ते जास्तच पटापट निसटून जातं आणि खूप नंतर लक्षात येतं की अरे, आयुष्य पकडून ठेवायच्या नादात जगायचं तेवढं राहून गेलं.

 

मग हळहळ व्यक्त करून सुद्धा पुन्हा गेलेले क्षण येत नाहीतच. भविष्य ही एक गंमत आहे. आपण ते secure करायला जातो, केलंच पाहिजे. पण यात कधीकधी वर्तमान जगायचा राहून जातो. Take it step by step.

एक एक क्षण मस्त पिता आला पाहिजे, जगता आला पाहिजे.

तो क्षणच असा जगायचा की त्या क्षणाला आपल्याला सोडताना हळहळ व्यक्त करावी लागेल.

 

-        वरुण भागवत


Comments

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...