Skip to main content

क्षण आणि आपण

  

A Click by- Varun Bhagwat

रात्रीच्या निवांत वेळी ते दोघे त्या वेळेच्या वेगाने अर्थात तितक्याच शांतपणे आणि आरामात चालत होते. कसलीच घाई नव्हती, गडबड नव्हती. रस्त्याने चालताना दोघांचं बोलणं चालू होतं.

 

ती स्वतःबाबत आणि स्वतःच्या thought process बाबत खूप confident होती. ती त्याला काय काय विचारत होती, तो बोलत होता. बोलता बोलता त्याच्या तोंडी साधारण या अर्थाचं आलं की चाळिशीपर्यंत खूप पैसे कमावून नंतर मग मी माझी hobby जपणार वगैरे!

 

असं म्हणताच तिने विचारलं की चाळिशीपर्यंत किंवा त्यानंतर तू जगणार किंवा जगशील हे तुला कसं माहितीये??? त्याला काय बोलावं सुचेना आणि हा त्या संवादातील एक realization चा point होता.

 

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमातील हृतिक आणि कॅटरिना मधला हा संवाद.

 

त्या realization point ला ती म्हणाली, "Seize the moment" अर्थात हा क्षण भरभरून जग.  उद्याचं कोणी सांगितलं आहे.

 

मुद्दा असा की तो चाळिशीपर्यंत जगेल, १०० वर्षं जगेल हे कोणी सांगूच शकत नाही. जन्म आणि मृत्यू हा तेवढा निसर्गदत्त ठेवला गेलाय. मग आपल्या हातात काय आहे?? असं काही कोणी म्हटलं तर माणसाला भीती वाटते. जाणवतं की अरे बाप रे, खरंच हातात काय आहे?

 

तर आहे ना, आत्ताचा हा क्षण! हा कोणी हिरावून घेऊ शकतो तर ते आपणच. आपणच आपल्या आत्ताच्या चांगल्या क्षणाची माती करतो कधीकधी. त्या क्षणाला सहज वाहू दिलं पाहिजे. तो क्षण सहज जगता आला पाहिजे आणि पूर्ण जगता आला पाहिजे कारण एक नक्की, की ती moment किंवा तो क्षण, ती वेळ एकदा गेली की परत येत नाही.

 

क्षण ही किती छोटी गोष्ट आहे.

माणूस या क्षणाला कित्ती कमी लेखतो.

हे वाक्य बोलेपर्यंत हा क्षण निघून गेला सुद्धा. इतका पटकन तो निघून जातो. हा क्षण जगला किंवा जगायचा राहून गेला तरी अनेकदा त्याचं महत्त्व तो निघून गेल्यावरच कळतं.

 

हा क्षण उत्तम जगला तर मग पुढचा क्षण त्या सुंदर आठवणी आठवण्यात अजून छान जातो. नाही जगला तर भूतकाळाच्या दुःखात माणूस अडकत जातो, नि भविष्याच्या अती चिंतेत गुरफटून जातो.

 

आयुष्य म्हणजे हातात असलेल्या समुद्राच्या रेतीसारखं. आयुष्याला खूप control मध्ये ठेवायच्या प्रयत्नात आणि अती घट्ट पकडायच्या प्रयत्नात ते जास्तच पटापट निसटून जातं आणि खूप नंतर लक्षात येतं की अरे, आयुष्य पकडून ठेवायच्या नादात जगायचं तेवढं राहून गेलं.

 

मग हळहळ व्यक्त करून सुद्धा पुन्हा गेलेले क्षण येत नाहीतच. भविष्य ही एक गंमत आहे. आपण ते secure करायला जातो, केलंच पाहिजे. पण यात कधीकधी वर्तमान जगायचा राहून जातो. Take it step by step.

एक एक क्षण मस्त पिता आला पाहिजे, जगता आला पाहिजे.

तो क्षणच असा जगायचा की त्या क्षणाला आपल्याला सोडताना हळहळ व्यक्त करावी लागेल.

 

-        वरुण भागवत


Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...