Skip to main content

बापाचं लग्न


Photo Credit: Sourabh Paranjape

(मित्र चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसले होते)

रवी: अरे माझा बाप दुसरं लग्न करायचं म्हणतोय.

अमर: मग problem काय आहे?

समीर: ए, अरे अमऱ्या, तू बरायस ना?

अमर: I’m serious. काय अडचण आहे?

समीर: तुला विचित्र नाही वाटत का हे?

अमर: अजिबात नाही.

रवी: अरे लोक काय म्हणतील? आता माझं वय आहे लग्न करण्याचं.

अमर: हे बघ हे लग्नाचं वयवगैरे अंधश्रद्धा आहेत. (असं म्हणत हसू लागला.)




रवी: हे बघ, मला वाद नाही घालायचा आणि मस्करीचा तर त्याहून mood नाहीये. समाज काही इतका पुढे गेलेला नाही सगळं accept करायला.

अमर: माझ्या मते समाजाला या गोष्टीचा acceptance फार आधीपासून आहे.




समीर: what do you mean?

अमर: तुला महाभारतातल्या देवव्रताची गोष्ट माहितीये?

रवी: त्याचा इथे काय संबंध?

अमर: direct connection आहे. त्याची आई गंगा आणि वडील म्हणजे राजा शंतनू यांना काही कारणास्तव वेगळं व्हावं लागलं. शंतनूचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. पण ते separate झाले. तुझे आई बाबा सुद्धा separate झाले होते. right?

रवी: हो... अशा अनेक cases असतात.

अमर: पण तुमची फार सारखी आहे.

रवी: कशी?

अमर: अगदी आपल्याकडे court मध्ये निर्णय होतो तसंच mutual understanding त्यांच्यात होतं. देवव्रत आधी आपल्या मातेकडे आणि मोठा झाल्यावर पित्याकडे अर्थात शंतनू कडे राहू लागला. पित्याकडे राहू लागल्यावर कालांतराने त्याने बापाचं म्हणजेच राजाचं मन जाणलं. राजाच्या right hand कडून त्याला ही गोष्ट कळली की आपल्या पित्याचं एकीवर प्रेम जडलय. त्या मुलीचं नाव होतं सत्यवती. पण ही गोष्ट बाप आपल्या मुलाला सांगत नव्हता.

रवी: घ्या... कसा सांगेल? तेवढा sensible तर राजा पण होता.. पण आमचे परमपूज्य...

समीर: थांब त्याला पूर्ण करू देत.



अमर: मग हा देवव्रत स्वतः त्या मुलीच्या वडिलांकडे गेला आणि आपल्या बापासाठी त्या मुलीला मागणी घातली आणि त्यांचं लग्न लावून दिलं.

रवी: are you serious?

समीर: यार.. या देवव्रताचं नाव कधी ऐकलं नाही. तू तयार नाही ना केलीस गोष्ट?

अमर: गोष्ट खरी आहे. देवव्रत म्हणजेच भीष्म पितामह... अर्थात भीष्माचार्य..

समीर: महाभारतातलं पहिलं character?

अमर: almost. he had courage to fight for his father and he didn’t care की समाज काय म्हणेल.

समीर: रव्या, त्यांना साथ असावी असं वाटणं स्वाभाविक आहे.

रवी: पण त्यांना आधी सुचायला हवं होतं ना?

अमर: अरे आत्ता मिळालं असेल कोणीतरी मनासारखं... ठरवून घडतात का या गोष्टी? just accept it.

रवी: एवढं सोपं नाहीये.

अमर: हो मान्य आहे. पण ज्या समाजाला दोष देतोयस की ते accept करणार नाहीत त्याचं प्रतीक तू होऊ नकोस म्हणजे झालं. तू त्यांच्या मागे उभा राहा.

(
तेवढ्यात समोर चहा आला.)

समीर: रव्या, मला पण आधी पटत नव्हतं. पण एक खरं आहे की बाप मनातलं नाही रे बोलत. तू lucky आहेस, तुला सागितलं त्यांनी.

अमर: आणि राहिला प्रश्न रव्या तुझ्या लग्नाचा... (खोडकर कटाक्ष टाकत) तुझं आणि तुझ्या बापाचं एकाच मांडवात वाजवून देऊ (हे ऐकताच समीरने घेतलेला चहा फुर्रर्र करून बाहेर काढला आणि रवी पण चहाचा घोट घेत गालात हसला.)

-
वरुण भागवत


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...