Skip to main content

भरारी घेऊन बघ...

A Click by: Varun Bhagwat


शेखर आज नेहमीपेक्षा जास्त शांत बसला होता. त्याच्या मोठ्या बहिणीला- शलाकाला कळेना, पण तिला इतकं जाणवलं की आज काहीतरी बिनसलंय. शलाका काही न बोलता त्याच्या जवळ जाऊन बसली. थोडा वेळ पूर्ण शांतता होती.


मग शेखरच बोलला, “वर्गातली सगळी मुलं पुढच्या courses ची तयारी करताहेत.”

“तुझीही चालू आहे की तयारी.”

“पण मला तितकं जमत नाही. मी त्यांच्याशी compete करू शकत नाही.”

“तुला कोण म्हणतंय की त्यांच्याशी compete कर?”

“मग काय करू? Please don’t tell me की माझी competition माझ्याशी आहे वगैरे.”

“आहेच. पण, इथे थोडी वेगळी गंमत आहे. इथे मुळात, तुझं aim हे तुझं पाहिजे.”

“मी समजलो नाही ताई.”

“म्हणजे, अं, तू गर्दी बनू नकोस.”

“गर्दी?”

“हे बघ, ज्याचं- त्याचं aim हे ज्याचं त्याचं असलं पाहिजे. आपण आपलं वेगळेपण ओळखलं पाहिजे.”

“पण वेगळेपण काय ताई?”



“हे बघ, ते तू शोध. Specifics तुला माहिती आहेत. पण मुळात मला इतकं नक्की कळतं की जे सगळ्यांना आवडतं आहे ते तुला आवडत नाहीये पण सगळे ते करतायत म्हणून तू ते करतोयस. ते सगळे मित्र एक ठराविक course निवडत आहेत म्हणून तू तो course निवडतोयस. तुला तुझं वेगळेपण माहित नसेल कदाचित आत्ता, पण शोधायला वेळ आहे, तू तो शोध घे. गरुडाच्या पिल्लाने तो घेतला नव्हता, पण तू तसं करू नकोस.”

“गरुडाचं पिल्लू?”



“एका माणसाला एक अंड सापडलं. त्याला ते कशाचं आहे हे कळलं नाही, त्याने ते उचललं आणि कोंबड्यांच्या खुराड्यात ठेवलं. त्या अंड्यामधून पिल्लाचा जन्म झाला. ते पिल्लू गरुडाचं होतं. पण ते कोंबड्यांसोबत मोठं होऊ लागलं. त्या जशा वागतात तसं वागू लागलं. त्यांच्यासारखंच जमिनीवरून अगदी थोडंच वर उडू लागलं, दाणे टिपू लागलं. अशीच थोडी वर्षं गेली. एक दिवस या पिल्लाचं, जे आता थोडं मोठं झालं होतं, त्याचं आभाळाकडे लक्ष गेलं. त्या मोकळ्या गगनामध्ये ढगांच्याही वरून एक गरुड उडत होता. पिल्लाने त्याच्या मित्राला अर्थात कोंबड्याला विचारलं, “हा कोणता पक्षी आहे?” कोंबडा म्हणाला, “माहित नाही, पण हा कायम फार वरती उडत असतो, उंच आकाशात! आपली तेवढी झेप नाही, चल, दाणे टिपू. छोट्या गरुडाला ते पटलं. अगदी काही काळ अंगात आलेली चेतना पुन्हा निघून गेली आणि पिल्लू पुन्हा दाणे टिपू लागलं.”



“गोष्ट संपली?”

“म्हटलं तर संपली, म्हटलं तर माझ्या छोट्या गरुडासाठी सुरू झाली.”

“अं?”

“तू ठरव, इतर सगळ्यांसारखं तुझं aim ठेवणार आहेस की तू तुझं स्वत:चं शोधणार आहेस?”

“मित्रांचं aim काय वाईट आहे का?”

“मुळीच नाही, aim कोणाचच वाईट नसतं. ते वेगवेगळं असतं. खरंतर त्यांच्यातल्या पण अनेकांमध्ये खूप काही त्यांचं वेगळेपण जपण्याची क्षमता आहे, गरज आहे गरुडाची गोष्ट माहित होण्याची. आज ना उद्या, या ना त्या प्रकारे ती त्यांना कळेल.”

“तू सांग ना त्यांना ही गोष्ट?”



“सांगायला हरकत नाही, पण अनेकांना गोष्ट कळली तरी वळत नाही. अनेकांना फुकटचे सल्ले नको असतात. काही जणांचं खरोखर तो course हे aim असेल. आपण पटकन कोणाला judge करून वाईट ठरवायला नको.”

“म्हणजे कोंबड्या असणं वाईट नाही तर.”



“मुळीच नाही. कुठल्याच प्रकारचा course वाईट नाही पण त्या त्या course चे आपण गरुड झालो पाहिजे. आपल्यात गरुडझेप घेण्याची क्षमता आहे हे ओळखलं पाहिजे. गर्दीत fit-in होऊ नये. मला माझ्या भावाची क्षमता माहित आहे आणि ती त्याने दुर्लक्षित करू नये. बाकी तू सुज्ञ आहेस. तुझ्याकडे बराच वेळ आहे. त्या गरुडाच्या पिल्लाकडे पण होता. त्याने नाही घेतली पण तू भरारी घेऊन बघ.”

 

-    वरुण भागवत             


Comments

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...