A click by : Varun Bhagwat तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना." तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे." "काय?" "तुझी आठवण!" "अं..." "तुला नाही का गं येत माझी आठवण?" "येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!" "हो गं. पण आपली भेट?" "लवकरच." "नुसती आशा की खात्री?" "खात्री!" "एवढी खात्री कुठून येते?" "आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच." "पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास." "अरे काय कायमचा विरह थोडी आहे?" "हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो." "असू दे थोडा विरह." "प्रेम अजून वाढतं म्हणशील." "हो." "ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!" ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अज...
जे माझ्या मनात आहे तेच अनेकदा आपल्यापैकी अनेकांच्या मनात असतं. तेच शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न. कधी कोणती कथा, तर कधी कोणता किस्सा... कधी मनातली कविता तर कधी मनातली संहिता...