Skip to main content

Posts

साथी रे!

  A click by : Varun Bhagwat तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना." तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे." "काय?" "तुझी आठवण!" "अं..." "तुला नाही का गं येत माझी आठवण?" "येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!" "हो गं. पण आपली भेट?" "लवकरच." "नुसती आशा की खात्री?" "खात्री!" "एवढी खात्री कुठून येते?" "आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच." "पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास." "अरे काय कायमचा विरह थोडी आहे?" "हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो." "असू दे थोडा विरह." "प्रेम अजून वाढतं म्हणशील." "हो." "ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!" ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अज...

करीत राहायचं!

  A Click by: Varun Bhagwat राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते. राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते. सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?" राघव इलुसं हसला. सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?" राघव त्याच्य...

आपलं विश्व!

मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही. ते रमणं महत्त्वाचं, ते रममाण होणं महत्त्वाचं! भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं! एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही. सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल...

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

  A click by Varun Bhagwat रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही.  परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात.  या सगळ्यात एक समान दु...

माणूस प्रेमाचा भुकेला असतो! - भाग २

  A click by Varun  प्रेम ही फार छान संकल्पना आहे. काहींच्या बाबतीत ती सत्यात उतरते तर काहींच्या बाबतीत ही फक्त कल्पनाच बनून राहते. अर्थात काहींना प्रेम मिळतं तर काहींना नाही. प्रेम मिळालंच नाही तर? ते सुद्धा लहान वयात? 'सिस्टिम क्रॅशर' नावाच्या सिनेमाची मूळ कल्पना हीच. त्यातल्या मध्यवर्ती पात्राला (१० वर्षाच्या मुलीला) जिव्हाळा माहीतच नाही. इतक्या लहान वयात प्रेमाला पारखं झालेली ती रागीट बनते. मनासारखं न झाल्याने वस्तूंची आदळआपट करू लागते. कधी कोणी तिचं जवळचं बनू पाहतं पण या ना त्या कारणाने तिच्यापासून दुरावतं. यामुळे ती अजूनच चिडचिडी होते. हा एक प्रकार झाला. असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ऐकायला वेगळं वाटेल पण प्रेम न मिळाल्याने माणसांचं मानसिक संतुलन बिघडू शकतं. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी दुष्टाला सुद्धा सुष्ट करेल. इतकी ताकद असते या प्रेमात! पण प्रेम नाही मिळालं तर याच्या बरोबर विरूद्ध घडतं. यामुळे, माणसाचं माणूसपण हरवू शकतं. निरागस मन बंडखोर बनू शकतं. प्रेमाची व्याख्या काही नाही. प्रेम विकत मिळत नाही. पण, प्रेम वाटता येतं, प्रेम वाढवता येतं. प्रेम सहज असतं. प्रेम गरजेचं अ...

माणूस प्रेमाचा भुकेला असतो!

A click by: Sushil Ladkat माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आयुष्यात असे काही टप्पे येतात जिथे प्रेमाची आणि प्रेम करणाऱ्या माणसांची किंमत फार जास्त जाणवते.. पण काहींच्या वाट्याला अशाच काळात आपल्याच माणसांकडून प्रेमाची परतफेड द्वेषाने मिळते. KD नावाचा सिनेमा प्रेमाचं गणित छान मांडतो. माणसं आपल्याच माणसाच्या जीवावर उठतात हे करुप्पा दुराई अर्थात KD ने ऐकलं होतं, पाहिलं होतं; पण आपली पोरं आपल्याच जीवावर उठतील याची त्याला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. वडील आता ओझं झालेत या विचाराने मुलंच आपल्या ७५ वर्षाच्या पित्याला मारायचं ठरवतात. हे कळताच करुप्पा तिथून पळ काढतो. भटकत असताना त्याला १० वर्षांचा मुलगा भेटतो ज्याचं कोणीच नसतं. प्रेम दिल्याने वाढतं हे अनुभवातून जाणणारा हा म्हातारा आणि कधीच प्रेम न मिळालेला हा कुट्टी नावाचा पोरगा यांच्यात फार जवळचं नातं निर्माण होतं. कोणीही विचार केला नसेल असा विचार कुट्टी करतो आणि करूप्पा ची bucket list बनवतो. अर्थात अशा गोष्टी ज्या करायच्या राहून गेल्या किंवा ज्या करायला फार आवडतील अशी लिस्ट. मग सुरू होतो नि बहरत जातो एक निखळ प्रवास. ज्यात असतं प्रेम, आपुलकी आणि जिव...

Bounce Back करणं एक challenge च!

A click by Sushil Ladkat Come back किंवा bounce back करणं हे फार risky , अवघड पण तितकंच challenging आहे. तसं म्हणलं तर कोणती गोष्ट अवघड नाही?? एखादी गोष्ट प्रथमच करून पाहणं किंवा एखाद्या नव्या गोष्टीत पदार्पण करणं कदाचित तुलनेनं सोपं! पण हे bouncing back प्रकरण आपला जीव काढतं. नवं सुरु करणं आणि पुन्हा नव्याने सुरु करणं यात दिसायला खूप छोटा फरक दिसतो. तो फरक म्हणजे फक्त 'पुन्हा' या शब्दाचा! दिसायला छोटा पण असायला फार मोठा आहे हा फरक! नवं सुरु करणं is like नवा संसार उभारणं, ज्याला कष्ट पडतात. स्वाभाविक आहे. नवंच आहे ना ते! पण नव्याने सुरु करणं म्हणजे मोडलेला, पडलेला संसार पुन्हा उभारणं! बघणाऱ्याला वाटतं या आधी हे त्याने केलंय , नव्याने करायला तितकेसे कष्ट नाही पडणार! पण किंबहुना थोडे जास्तच कष्ट पडतात! जसा एखाद्या चांगल्या batsman चा form हरवतो आणि तो team च्या बाहेर फेकला जातो. पुन्हा team मध्ये येण्यासाठीचा त्याचा struggle बघण्यासारखा असतो.. नवख्या माणसाने शिकण्यासारखा असतो. कारण यात emotions चा कल्लोळ असतो. लोकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःबद्दल वाढलेल्या अपेक्षा, आधीचं failu...