Skip to main content

Posts

आठवणींची पेटी!

  A click by : Sushil Ladkat अनयला स्वतःचाच कॅमेरा दिसला. त्याकडे बघत तो स्वतःशीच म्हणाला, "काय काय आणि किती किती टिपतो हा.  आयुष्याच्या आठवणी सगळ्या एका पेटीत किंवा कुपीत. छोटी पेटी, आठवणींची कुपी असं म्हटलं की फार काहीतरी interesting असेल असं वाटतं. पेटी असतेच मुळी interesting आठवणींची. त्यामुळे आता आठवण, आठवणीतल्या पेटीतले photos interesting असणारच.  कधीतरी उघडायची त्या पेटीतली पानं. आता पेटीला कुठे पान असतं का? पण Photo Album ला असतं की. तसं या आभासी पेटीला पण पान असतंच. १ फोटो, १ पान." असं म्हणत अनयने आभासी पेटीची अर्थात जुने सगळे photos store केलेल्या phone मधल्या folder ची पानं हळूहळू उलगडायला सुरूवात केली. सुरू झाली digitial आठवणींची सफर. अनय पुन्हा विचारात गेला. केवढ्या आठवणी, केवढे लोक, कोणी आपले, कोणी नवखे, कोणी ओळखीचे, कोणी अनोळखी... सारं काही यात टिपलं जातं. आपण पाहत राहायचं. आठवत राहायचं. रमत राहायचं. कधी हसायचं, कधी नॉस्टॅल्जिक व्हायचं. कधी कोणीतरी आठवणीतला/ आठवणीतली पुन्हा कधीच न भेटलेली ती व्यक्ती दिसते. हे म्हणत असतानाच एकदम अनयच्या डोळ्यासमोर ती flas...

पाऊस माझा सखा...

  A click by : Varun Bhagwat धबाबा कोसळणारा पाऊस. त्याला काळ्या ढगाने अजूनच लावली फूस. शांत उभी ठाकलेली वृक्षवल्ली. पावसात नाचणारी पोरं होती वल्ली. कसा कोणास ठाऊक, कोकीळ पाऊसगाणं लागला गाऊ, कोकिळेच्या प्रेमात बुडत तिच्या जवळ लागला जाऊ. चिमणा चिमणी बसले घरट्यात जसा येऊ लागला पाऊ, घरट्यामध्ये न रमणारा, उघडा पडला आळशी काऊ. मन उधाणलं. इतका पाऊस की मन बघता बघता तिच्यात केव्हाच बुडालं. ती दूर, मनी हुरहूर. पाऊसच जणू जुळवत होता आमचे चिंब सूर. मनातूनच रेखाटू लागलो तिच्या चेहऱ्यावरचा नूर. धरती वरुणमय हवी होती तिची सय मी निघालो, पावसात पोहोचलो. कोसळत होत्या संततधारा संगे होता सोसाट्याचा वारा. मन चिंब, चिंब, चिंब तळ्यातल्या पाण्यात तिचंच प्रतिबिंब. आठवायचं तरी किती? आठवणीत रमायचं तरी किती? चार्लीसारखं पावसात रडून झालं. थेंबांनी अश्रूंना पुसून टाकलं. मला वाटलं भेटेल ती तिला वाटलं भेटेन मी. पण दोघांना एकाएकी पाऊस भेटला. प्रेम आणि आठवांचा निरोप देऊन गेला. ती माझ्यात गुंतलेली, मी तिच्यात रमलेला. पावसाची धार ओसरत आलेली, मी प्रेमात आकंठ बुडालेला. पावसाचे थेंब झेलत खिडकीपाशी थांबलो. निसर्गाच्या लयीत ...

ए पोरा...

  A click by: Sushil Ladkat केतन सवयीप्रमाणे व्यायामाला एका club मध्ये जायचा. Routine ठरलं होतं. जिथे तो व्यायामाला जायचा तो एक sports club च होता. त्यामुळे club च्या member व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश नसे. आज अचानकच केतनला आतमध्ये असणाऱ्या security guard ने अडवलं. केतन member होता, पण तरी त्याला अडवलं होतं. केतनला या गोष्टीची चीड आली. नुसतं अडवण्याची नव्हे तर अडवण्याच्या पद्धतीची. Guard ने चुटकी आणि टाळी वाजवत हाताचा इशारा केला आणि म्हणाला, "कुठं चालला रे?" केतन तरीही चालत राहिला. Guard चिडला. तो वयस्कर होता तरीही केतन दुर्लक्ष करतोय हे पाहून अजून मोठ्या आवाजात मोठ्या कष्टाने थोडं जवळ येऊन म्हणाला, "विचारलेलं कळत नाही का?" केतन थांबला. झटकन म्हणून गेला, "का थांबू? इथे रोज येतो मी." "पण मी इथं नवीन आहे." "मी जुना आहे." "तुझ्या गळ्यात club चं card नाही." केतन अरेरावी करत म्हणाला, "तुम्ही आज आलाय." यावर guard चा आवाज अजून चढला आणि म्हणाला, "ए पोरा, मी काम करतोय. तू नाही मला शिकवायचं." "Card माझ्य...

साथी रे!

  A click by : Varun Bhagwat तिने विचारलं, "कसला विचार चालू आहे रे? मनात ठेवू नको. सांग ना." तो सहज म्हणून गेला, "तुझाच विचार चालू आहे." "काय?" "तुझी आठवण!" "अं..." "तुला नाही का गं येत माझी आठवण?" "येते रे. खूप येते. पण मी बोलून दाखवलं तर अजूनच miss करशील मला!" "हो गं. पण आपली भेट?" "लवकरच." "नुसती आशा की खात्री?" "खात्री!" "एवढी खात्री कुठून येते?" "आपल्या प्रेमावर विश्वास आहे. त्यामुळे खात्री असतेच. कामानिमित्त आत्ता एकमेकांपासून दूर असू तरी कामं आटोपताच पुन्हा भेट होईलच." "पण या सखीचा विरह म्हणजे जीवाला फार त्रास." "अरे काय कायमचा विरह थोडी आहे?" "हो, पण थोडा विरह सुद्धा त्रास देतो." "असू दे थोडा विरह." "प्रेम अजून वाढतं म्हणशील." "हो." "ते माझं समाधान व्हावं आणि मी सारखं 'तू हवी' असं म्हणू नये म्हणून!" ती गोड हसली आणि म्हणाली, "तुझं हे असं वागणं मला अज...

करीत राहायचं!

  A Click by: Varun Bhagwat राघवच्या मनात संमिश्र भावना होत्या. नुकतीच त्याची एका tv show मधील मध्यवर्ती भूमिकेत entry झाली होती. अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत होते. Show सुरू झाला याचं छोटं celebration सुद्धा show च्या set वर झालं होतं. सगळे जण enjoy करत होते. राघव मात्र विचारात गढला होता. तो त्या गर्दीतून थोडा बाजूला येऊन set वरच्या एका पारावर येऊन बसला. राघव तिकडे आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. Rather, राघवला ते कोणाच्या लक्षात येऊच द्यायचं नव्हतं इतक्या शांतपणे तो बाजूला झाला होता. पण ज्यांच्या लक्षात यायला हवं त्यांना कळलंच. राघवला नाटक शिकवणारे राघवचे सर पण set वर उपस्थित होते. या गर्दीतून त्यांचा राघव ते शोधत होते. तो दिसला नाही. त्याला आधीपासून ओळखत असल्याने त्यांनी जाणलं आणि त्याला शोधत ते बरोबर त्याच्या शेजारी येऊन बसले. राघवच्या मनात काय चालू असेल याचा सरांना अंदाज आला. पण सर काहीच बोलले नाहीत. काही वेळ दोघे नुसतेच बसून होते. सरांनी पाठीवर हात ठेवला, म्हणाले, "काय, कसं वाटतंय?" राघव इलुसं हसला. सरांनी विचारलं, "कसला विचार चालू आहे?" राघव त्याच्य...

आपलं विश्व!

मी कसा लिहितो नि काय लिहितो याहीपेक्षा जेव्हा मी लिहितो तेव्हा स्वतःच्या विश्वात रमलेला असतो. आता इतक्यात काय झालं कुणास ठाऊक? अचानक इतके बदल झाले की मी practically, कुठल्यातरी तिसऱ्याच विश्वात सध्या आहे. त्यामुळे या लेखनविश्वात रमायला मला वेळ होत नाही. की मी वेळ काढत नाही? कसंही असलं तरी वेळ नाही असं म्हणून कसं चालेल? जिथे मन रमवायला आवडतं तिथे वेळ काढायला हवा. त्या विश्वात मी किती वेळ राहतो नि किती उत्तम लिहितो हे तितकं महत्त्वाचं नाही. ते रमणं महत्त्वाचं, ते रममाण होणं महत्त्वाचं! भान हरपून त्यात शिरणं महत्त्वाचं! एका शांत स्थळी जाऊन लिहावं ही इच्छा अनेकांची असते. फक्त लिहिणं असं नाही तर निरनिराळ्या छंदांसाठी कोणाकोणाला कुठे कुठे जायचं असतं. आता एका प्रकारे काही प्रमाणात शांत ठिकाणी आलोय, तर मन अशांत आहे की काय असं जाणवू लागलंय. मन स्थिर केलं तर परिस्थिती अस्थिर वाटते. ते ही मनाचंच आहे म्हणा. हे सगळं घडण्यात दोष कसलाच नाही, कोणाचाच नाही. सगळं जेव्हा नेहमीसारखं चालू असतं तेव्हा एका प्रकारे आपण त्या रोजच्या दिवसाशी set झालेलो असतो. पण जेव्हा बदल घडतो तेव्हा अनेक गोष्टी बदलतात. असा बदल...

कृष्ण आणि कर्माचं महत्त्व!

  A click by Varun Bhagwat रात्री बाराची वेळ, एरवी किर्रर्र शांतता असणारा क्षण, मात्र हा दिवस वेगळंच काहीतरी मनात घेऊन आला होता. बाहेर धुवाधार पाऊस, आत कारागृहात बंदिवान होते देवकी आणि वसुदेव. या कारागृहातच इलुशा देवकीनंदनचा जन्म झाला नि अवघं जग कृष्णमय झालं.  कृष्ण आणि त्याचं कार्य दुनियेला ठाऊक आहे. त्याच्या चातुर्याचे, शांत प्रवृत्तीचे, कर्माचे दाखले जगभर दिले जातात. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्याला कृष्णाने मात्र महत्त्व दिलं नाही ती म्हणजे त्याचं जन्मस्थळ. गंमत अशी की खरंतर कारागृहात याचा जन्म झाला, पण म्हणून ती जागा हे त्याचं भवितव्य ठरलं नाही. कृष्णाने त्याचं भवितव्य स्वतः घडवलं. नशिबाला दोष देत त्याने आयुष्याच्या गाडीला अडसर आणला नाही.  परिस्थिती प्रत्येकाची निराळी असते. काही व्यक्ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येतात पण म्हणून ते सर्वस्व प्राप्त करतीलच असं नाही. काही जण शून्यातून विश्व उभं करण्याची चुणूक आणि धमक दाखवतात. काही जण सर्व असूनही उतमात न करता आपलं काम करत राहतात. काही जण असलेल्या गोष्टी स्वतःच्याच कर्माने घालवतात.  या सगळ्यात एक समान दु...