Skip to main content

खुळचट सुखाचं खुसपट...

A click by : Varun Bhagwat


Beach ला लागून असलेल्या एका हॉटेल मध्ये  चहा घ्यायला बसलो होतो. तिथे एक सुविचार लिहिला होता.  - माणूस स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याचं सुख पाहून जास्त दुःखी होतो. 

पुन्हा एकदा ते  वाचलं. म्हटलं, कमाल आहे माणसाची. सुखाची concept comparative झाली तर! का ती तशीच आहे? की काही जणांनी ती तशी बिंबवली आहे. बरं, आजूबाजूला सहज नजर फिरवली तर दिसतं पण असं की हीच concept रूढ होत चाललीये.


पण असं का व्हावं? मनुष्यस्वभाव? पण पुन्हा स्वभाव म्हटलं तर प्रत्येकाचा वेगळा... मग compare तरी कसं करायचं??? 

पण इथेच तर खरी मेख आहे. आम्हाला compare च करायचंय!!! 

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असला  पण एकाच basis वर compare करायचं हे syllabus मध्ये असल्यासारखं compulsory केलंय... आपणच!


त्याच्याकडे भारी गाडी आहे, म्हणून ती मला घ्यायचीये. वास्तविक मला गाडीची गरज नसते त्या वेळी!!! पण artificial गरज निर्माण केली जाते आणि सुखाची व्याख्या ठरवली जाते. मग होतं अवघड...


त्याचं package जास्त आहे ही गोष्ट लक्षात येते. खरंतर माझा पगार मला पुरत असतो. पण मिळायला पाहिजे जास्त पैसे असं वाटू लागतं. कारण तो जास्त सुखी होईल आणि मग त्यामुळे मी दुःखी झालो म्हणजे??? 


मग मी लागतो त्या race मध्ये (सुखी होण्याच्या)! या race ला सुरुवात असते मात्र शेवट नसतो. 

मला पळावं लागणार आहे हे कळतं पण कुठपर्यंत पळणार असं विचारलं तर उत्तर असतं 'सुखी होईपर्यंत!' 


इथे लहानपणी शिकलेले रामदासांचे मनाचे श्लोक पूर्ण विसरतात.

'जगी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना, तूचि शोधून पाहे|'


पण मला विचारायचं नसतं, शोधायचं नसतं.


बरं, सुखामागे धावतोय पण सुख काय असतं हे पण शोधायचं नसतं. पण दुसऱ्याचं सुख पाहून कष्टी व्हायचं असतं.

अगदी कायम ऐकायला मिळणारं वाक्य- बरंय बुवा तुमचं!


अरेच्या... काय बरंय... कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे काही कल्पना नसते आणि ठोकून द्यायचं असलं वाक्य की बरंय तुमचं!


यातून साद्ध्य काय तर स्वतःचं दुःख वाढवायची कामं!


कारण सुख म्हणजे समोरच्याला टारुन (हरवून) त्याच्या पुढे जायचं. गेलो तर ठीक नाहीतर व्हा दुःखी.


मी bill pay करून हॉटेलातून बाहेर पडलो. ते वाचलेलं वाक्य was an 'eye opener'!!!

Beach वर काही जण selfie मग्न होते. एकीने पाहिलं की तिची group member 'more than average per minute'. selfie घेतीये. थोडक्यात खूप photos काढतीये.

तिने पटकन काहीतरी calculations केली आणि हिची social media वर जास्त updates जाणार असा तिचा विचार झाला असावा आणि तिचं सुख पाहून हिला दुःख होईल या विचाराने हिने selfie संख्या वाढवायला सुरुवात केली सुखी होण्यासाठी. 


तेवढ्यात माझं लक्ष दुसरीकडे वळलं.

एक काका आणि त्यांचा छोटा मुलगा मावळणाऱ्या सुंदर लालबुंद सूर्याकडे बघत होते. त्यांना ते पाहून छान वाटत होतं. छोटंसं सुखच की हो ते!

मी त्यांच्यापासून थोड्या अंतरावर रेतीमध्ये बसलो. 

त्यांच्या सोबतीने मी ही तो आल्हाददायक नजारा पाहू लागलो. 


इथे ते वाक्य चुकीचं ठरलं होतं.

त्या दोघा बाप-लेकांचं सुख पाहून मी खिन्न झालो नव्हतो उलट खुश होतो.

मी पण त्यांच्या सुखात माझा आनंद शोधू लागलो आणि सूर्य क्षितिजाला भिडू लागला. खुळचट सुखाचं वेडगळ खुसपट मनावरून निघून जाऊ लागलं. या बाप लेकांनी जुन्या सुखाचा नवा किनारा दाखवला. बाकी समुद्र मी शोधेन!

त्या लहानग्याने 'सुख वाटल्यानं वाढतं' हा नव्याने उगवता सुविचार मावळत्या सूर्याची साक्ष ठेवून आठवून दिला.

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...