Skip to main content

निरनिराळे दृष्टिकोन

मित्रासोबत बाईकवरून चाललो होतो. सिग्नलला गाडी थांबली. आमच्यासोबत अनेक गाड्या थांबल्या. सिग्नलची ती २ मिनिटं नुसतंच थांबणं हा एक कार्यक्रमच असतो. नजर इकडे तिकडे वळत राहिली. तोच एका बाईकवर एक कुटुंब दिसलं. मित्र फोटोग्राफर असल्याने मित्राचा कॅमेरा लगेच फोटो काढायला पुढे सरसावला. त्याने लगेच फोटो दाखवला सुद्धा आणि म्हणाला, जरा ही प्रतिमा (हा फोटो) निरनिराळया दृष्टिकोनातून पाहू.


A click by: Sushil Ladkat

मग विचारचक्र धावू लागलं. अनेकविध दृष्टिकोनातून ती प्रतिमा पाहू लागलो. मग निरनिराळी निरीक्षणं टिपली ती अशी:


१. म्हटलं तर एक सुखी कुटुंब


२. कदाचित एका दुचाकी वरती ३ जण म्हणजे अडचण!


३. त्या मुलामध्ये अनेक जण स्वतः चं बालपण शोधू शकतात. लहानपणी असे पुढे उभे राहणारे आपण, आपल्यासाठी ती तडजोड नव्हती तर पुढे उभं राहणं हा विजय होता.


४. त्या दोघांचे आविर्भाव असे की लगबग आणि वर्दळ असली तरी ती रोजचीच आहे.


५. ती इकडे पाहते आहे आणि तो तिकडे! आयुष्य दोघांना वेगवेगळ्या वाटांनी नेऊ पाहतं आहे. पण त्यांना जोडणारं अपत्य त्यांना थांबवत आहे.

 

६. कदाचित मुलगा आता थोडा मोठा होतोय आणि असं पुढं उभं राहणं त्याला नको वाटतंय.


७. कदाचित दोघे रोजच्या कार्यक्रमांना कंटाळून मुलाला घेऊन कुठेतरी सहलीला निघालेत.


८. कदाचित दोघे दोन बाजूला भविष्यात हवी असणारी आपापल्या आवडीची ४ चाकी शोधत आहेत.


९. कदाचित नवी बाईक घेऊनच तिघे बाहेर पडलेत. बाईक असणं हीच मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे आणि आपल्या नव्या वाहनाकडे कोणी पाहत आहे का हे पाहण्यासाठी तिघे तीन दिशांना बघत आहेत.


१०. कदाचित कोणतं तरी संकट त्यांच्या जवळच्या माणसांवर आलं आहे; हे तिघे पटकन त्यांच्या मदतीसाठी जात आहेत. 


११. कदाचित तिघे शरीराने सोबत आहेत पण मनाने दूर आहेत.


१२. कदाचित एरवी आपापला वेळ मिळत नाही म्हणून जाणूनबुजून तिघे आपापल्या विचारात गुंग आहेत. 


१३. कदाचित तिघांसाठीही हे शहर नवीन आहे, त्यामुळे तिघांना काय बघू काय नको असं झालंय. त्यामुळे तिघे तीन दिशा न्याहाळत आहेत. 


१४. दिवस मोठा कामात गेलाय. तिघे आता शांतपणे घरी परतत आहेत. 


तेवढ्यात सिग्नल सुटला. विचारांची तंद्री भंगली. या सगळ्या विचारांपेक्षा एक नवा नि अगदी साधा विचार स्पर्शून गेला की,


५. कदाचित हे सगळे जण आहे त्यात समाधानी आहेत नि हा सगळा फक्त माझ्या दृष्टिकोनाचा भाग आहे.


- वरुण भागवत 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...