Skip to main content

संकटाची चाहूल

A Click by: Sushil Ladkat


“संकट कसं येतं?”

“कसं येत म्हणजे?”

“सांग ना.”

“सांगता येत नाही.”

“काय सांगता येत नाही?”

“संकट कसं येईल हे सांगता येत नाही.”

“मी जगावर येणारं संकट किंवा unprecedented संकट असल्या संकटांबद्दल बोलत नाहीये.”

“मग?”

“संकट येऊ शकतं असं वाटत असेल तर किंवा काही काळंबेरं आहे असं वाटत असेल तर काय करू शकतो आपण?”

“असं होय. Then reframe your question. थोडक्यात तुला जाणून घ्यायचं आहे की संकटाची चाहूल घेणं म्हणजे काय असतं?”

“हं... kind of yes.”

“हे बघ असं काहीच वेगळं करू नाही शकत आपण. Alert राहावं लागतं कायम बाकी काही नाही.”

“Alert राहायचं म्हणजे काय?”

“म्हणजे आजूबाजूला नजर असली पाहिजे. प्रत्येक वेळी आपलाच अनुभव कामी येतो असं नाही. दुसऱ्याच्या अनुभवाने सुद्धा मनुष्य शहाणा होऊच शकतो. किंवा त्याचं निरीक्षण त्याला संकटापासून वाचवू तरी शकतं किंवा सावध तरी करू शकतं. पण हा प्रश्न अचानक का पडला रे तुला?”

“अरे दादा काय सांगू, सहज जेव्हा observe करतो तेव्हा जाणवतं आणि मला ना काही माणसांची गंमत वाटते. तोंडावर गोड असतात आणि आत वेगळंच. अशा वेळी काय करायचं, त्यांच्याशी वागायचं कसं? की तोंडाला लागायचंच नाही त्यांच्या?कळत नाही. यांना भेटणं हे सुद्धा संकट असतं कधी कधी. वागावं कसं?”

“तो निर्णय परिस्थितीजन्य असला पाहिजे.”

“म्हणजे?”

“म्हणजे असं की त्या smart कोल्ह्यासारखं वागता आलं पाहिजे.”


“कुठला कोल्हा?”

“एकदा काय झालं, एक सिंह आजारी पडला. सगळे जण मग त्याची चौकशी करायला जायचे. सिंह दुबळा झाला असं सगळ्यांना वाटलं. तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा. चौकशी करायला एकदा कोल्हा गेला. आता बघ हां, smart कोल्ह्याने आधी अंदाज घेतला. एक छोटं analysis करता आलं पाहिजे.”

“म्हणजे? काय केलं त्याने?”

“कोल्ह्याने थोडे डोळे उघडे ठेवून निरीक्षण केलं. त्याला कळत नव्हतं, सगळ्यात भयंकर शिकारी अर्थात सिंह हा दुबळा होईल का? ठीके, झाला तरी उगाच गोड बोलेल का? की म्हणूनच गोड बोलेल? गोड बोलून त्याचा फायदा काय? ही फसवणूक तर नाही ना? हे सगळे प्रश्न कोल्हयाने स्वत:ला विचारले आणि गुहेच्या बाहेरच थांबून त्याने सिंहाच्या तब्येतीची चौकशी केली. सिंह म्हणाला, “मी ठीक ठाकच आहे. पण तू मला भेटायला आत का येत नाहीस?” कोल्हा म्हणाला, “आलो असतो, पण या गुहेत आत जाणारी पावलं दिसतायत. बाहेर येणारी नाही.”

 

“Wow...”

“याला म्हणायचं संकटाची चाहूल लागणे. अंदाज घेता आला पाहिजे.”

“पण प्रत्येक वेळी अंदाज योग्यच असेल असं नाही.”

“म्हणूनच त्याला अंदाज असं म्हणतात. अंदाज चुकू शकतो, त्यातून आपण शिकू शकतो. पण analyze करता आलं पाहिजे. विचार न करता एकदम काहीतरी करणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं. कोल्ह्याला पण कुठेतरी अनुभव आला असेल म्हणून तर तो smart झाला असेल.”

“हं... थोडक्यात काय... आपले डोळे उघडे असले पाहिजेत... मग अंदाज घेता येतो धोका आहे, संकट आहे की आपल्याला हवी अशी परिस्थिती आहे.”

“Yes.”

 

-       वरुण भागवत

Comments

  1. Khup chhan.Nehmi Savadh rahayala pahije.

    ReplyDelete
  2. आयुष्यात प्रत्येकाने सतर्क असलेच पाहिजे 👍👍👍

    ReplyDelete
  3. Great. Very clever. It's need of time.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...