Skip to main content

देव आणि राक्षस

A Click by: Varun Bhagwat

 “एका गावात एक माणूस राहत होता. तो शेती करत असे. खरंतर त्याचं बरं चालू होतं. एकदा त्याच्याकडे काम करायला एक गडी रुजू झाला. या गड्याने एकदा शेतकऱ्याला शेतीसंबंधी काही उपदेश केला. त्या उपदेशामुळे पीक येण्याचं प्रमाण वाढू लागलं. आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत हा जास्त पैसे कमवू लागला. आता तो शेतकरी त्या गड्याचा प्रत्येक उपदेश मानू लागला. भरपूर पीक येत होतं. इतकं की गरजेपेक्षा खूप जास्त पैसे त्याच्याकडे येऊ लागले. मग त्या गड्याने त्याला अवैध मार्गाने पैसे  मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शेतकऱ्याला जास्त पैशाचं करायचं काय हा प्रश्न होताच. त्याने गड्याचं ऐकलं. खूप पैसे मिळू लागले. साधं घर असणाऱ्या शेतकऱ्याचा मोठ्ठा बंगला झाला. त्या बंगल्यावर त्याने सर्वांना मेजवानीचं आमंत्रण दिलं. अनेक लोक आले. त्याला वाटलं यातल्या काहींना तर आपण बोलावणं पण केलं नाही तरी ते आलेत. खरंतर निमंत्रण नसणारे कोणी सुद्धा आले नव्हते. पण कोणाला तरी कमी लेखायचंच हे जणू त्याने ठरवलंच होतं. एक रामू नावाचा गरीब शेतकरी आला होता. खरंतर त्याला आमंत्रण होतं पण हे याच्या लक्षात नव्हतं. रामू जेवणाच्या पानावर बसू लागला. तर याने रामूचा अपमान केला. बायकोच्या हातून चुकून दारूची सुरई पडली आणि त्यातून दारू सांडली तर तिलाच तो सर्वांसमोर बोल लावू लागला आणि म्हणाला की काय किंमत आहे या दारूची माहितीये ना तुला, अशी सहज वाया घालवायला लाज नाही वाटत?”

 

राक्षस देवाला सांगत होता, “माझं महत्त्व पृथ्वीतलावर कमी होता कामा नये म्हणून मी माझ्या सेवकाला त्या शेतकऱ्याची लालसा वाढवायला त्याच्याकडे पाठवलं त्याचा गडी बनून.. त्याला आमच्यासारखा बनवायला लावलं. त्याच्यातलं माणूसपण कमी करायला लावलं. बघ, तो आता आमच्यापैकीच एक आहे. हे असंय... खरंतर याला कशाची कमतरता नव्हती. पण एका गरीब शेतकऱ्याला जेवू घालणं त्याच्या जीवावर आलं. मी त्याच्यातली लालसा वाढवली. स्वत:च्याच बायकोला उलटपालट बोलायला मी भाग पाडलं. त्याच्यामध्ये माझा अंश वाढतोय हे तू नाकारू शकत नाहीस.”

देव म्हणाला, “पण तुझे फसलेले डाव सुद्धा आहेतच की.. एकदा असंच तू तुझ्या याच सेवकाला एका गावात पाठवलं होतंस.  तिथे एक बाळू नावाचा शेतकरी होता. जो रोज शेतात जायचा. तो चांगला माणूस होता. पण तुला त्याचा साधेपणा, चांगुलपणा बघवत नव्हता. तो शेतात गेला की झाडाखाली भाकरी आणि चटणी ठेवून द्यायचा. दुपारी बैलांना विश्रांती द्यायचा आणि स्वत: ती चटणी भाकरी खायचा. एका दुपारी ही चटणी भाकरी तुझ्या सेवकाने चोरली. बाळूची नियत बदलेल याची वाट तो पाहू लागला. पण बाळू स्वत:शीच म्हणाला, “चटणी भाकरी कशाला कोण चोरेल.. असो... चोरली असेल म्हणजे एखाद्याची ती गरज असेल” असं म्हणत आनंदाने पुन्हा कामाला लागला. माणूस असा पण असतो.” 

 

यावर राक्षस म्हणाला, “सगळं आठवतंय देवा. पण माझ्या विकृत स्वभावाने ते मनावर घेतलं आणि सेवकाला मी खूप बोललो की तू त्याची नियत का बदलू शकला नाहीस आणि मग गडी म्हणून याच बाळूकडे मी त्याला पाठवलं. हळूहळू त्याची नियत बदलली. त्याच्यातलं देवत्त्व संपलं. आता तर तू पाहिलंस की तो कोणाशी कसाही वागतोय.”

देव म्हणाला, “खरंय. तुझं महत्त्व वाढतंय... पण तू माझ्याकडे का आलायस?”

राक्षस म्हणाला, “काय सांगू देवा, माझं महत्त्व वाढतंय याचा मलाच त्रास होतोय. त्या बाळू शेतकऱ्याला संशय आलाय की माझा सेवक अर्थात त्याच्या गड्याने त्याच्याशी धोका केलाय. म्हणून तो माझ्या सेवकाच्या जीवावर उठलाय.. माझं वाईटपण माझ्याच अंगी येतंय.”

देव स्मित करत म्हणाला, “काट्याने काटा काढणे हे तू जाणून असशीलच.”

राक्षस म्हणाला, “मदत करा भगवंत.”

देव प्रश्नार्थक नजरेने म्हणाला, “म्हणजे काय करू?”

राक्षस काकुळतीने म्हणाला, “त्याच्यामध्ये थोडी देवत्त्वाची भर घाला.”

हताश राक्षसाकडे देव फक्त पाहत राहिला.

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...