Skip to main content

अवघड परिस्थिती आणि Decision Making

Photo Courtesy: Poonam Godse

सीमाचं आयुष्य दोन दगडांवर अवलंबून होतं. काळ्या आणि पांढऱ्या. उद्याचा दिवस तिच्यासाठी महत्त्वाचा होता. आज जे तिने केलं होतं ते योग्य होतं की अयोग्य याचा विचार करायला आता तिच्याकडे वेळ नव्हता. परिणामांना आणि परिस्थितीला सामोरं जाणं गरजेचं होतं.

ही गोष्ट त्या काळातली होती जेव्हा मुलीचा सौदा वगैरे हे अगदी सहज केलं जायचं. अतीशय फुटकळ कर्ज वसूल करण्यासाठी किंवा फालतू कारणाने मुलीचा सौदा कवडीमोलाने केला जायचा.

सीमाचे वडील कर्जामध्ये बुडाले होते. बुडाले म्हणण्याइतकं ते काही कर्ज मोठं नव्हतं. मात्र कर्ज देणाऱ्या सावकाराच्या मनात वेगळच होतं. त्यामुळे त्याने आकडा फुगवून सांगितला होता. सीमा आणि वडिलांकडे कसलेच records नव्हते. सावकाराने याच संधीचा फायदा घेतला. त्याने सीमाच्या वडिलांसमोर २ पर्याय ठेवले.

१.    -उद्याच्या उद्या कर्जाची रक्कम फेडली गेली पाहिजे.

२.    -नाही फेडली तर तुझी ही तरुण मुलगी माझी दासी असेल.

सीमाचे वडील गयावया करू लागले. सीमा आतल्या खोलीत होती. ती ऐकत होती. घाबरली होती.

सीमाचे वडील रडत म्हणाले, “अजून काही वेगळा पर्याय नाही का सरकार?”

सावकार दया दाखवण्याचं नाटक करत म्हणाला, “ठीके, उद्या आपण एक खेळ खेळू. एका डब्यामध्ये मी दोन दगड ठेवीन. एक काळा आणि दुसरा पांढरा. तुझ्या मुलीलाच निवड करू दे.”

सीमाचे वडील प्रश्नार्थक नजरेने म्हणाले, “कसली निवड?”

सावकार उत्तरला, “तुमच्या नशिबाची. दोन्ही दगड डब्यात घालून तो डबा आपण बंद करू. मग न बघता तिला त्या डब्यातून एक दगड उचलायचा आहे. काळा असेल तर ही माझी आणि तरीसुद्धा तुझं कर्ज मुक्त.  पांढरा असेल तर तू कर्जमुक्त होशीलच आणि ही पण मुक्त होईल. खेळ एकदम न्यायाने होईल. बघ दोन्हीकडे तुझाच फायदा आहे.”

बाप काही बोलत नव्हता. दोन्ही पर्यायांमध्ये वडीलांचं कर्ज चुकतंय हा विचार करून पटकन सीमा म्हणाली, “अट मान्य!”

सावकाराला हेच हवं होतं. तो छद्मी हसत म्हणाला, “उद्या नदीकिनारी भेटू.”  

 

सीमाने जवळजवळ स्वतःचा सौदाच केला होता. अर्थात तिने हे मुद्दाम केलं नव्हतं. तिच्यासमोर परिस्थितीच अशी मांडून ठेवली होती की त्यातल्या त्यात best option निवडून आजचा दिवस तिने ढकलला होता. सीमाचे वडील काहीच बोलत नव्हते. पूर्ण रात्र अस्वस्थ गेली.

नवा दिवस उजाडला. ठरल्या प्रमाणे सगळे नदीकिनारी जमले. सावकाराने आपली हुशारी दाखवायला आणि साक्ष म्हणून खेळ किती न्यायाने खेळला जातो आहे हे दाखवायला चार माणसं जमवली होती.

सीमाच्या वडिलांनी कष्टाने स्वतःला ओढत तिथवर आणलं होतं. सीमा मात्र तिथे बारीक निरीक्षण करत होती. सगळ्यांच्या हालचाली टिपत होती. तिने पाहिलं की सावकार दोन दगड डब्यात भरतोय. काळ्या मनाच्या सावकाराने दोन्ही काळे दगड त्या डब्यात भरले. ही गोष्ट सीमाच्या नजरेतून सुटली नाही. पण अडचण अशी की उपस्थितांपैकी बाकी कोणालाच ती गोष्ट कळली नाही. आता तिच्यासमोर जुगार नव्हता. नशिबावर काही नव्हतं. तिला खेळाचा शेवट समजला होता. तिच्यासमोर पर्याय होते की

१.    -आहे त्या परिस्थितीला शरण जाणे.

२.    -पळून जाणे जे शक्य नव्हतं. हे ती आधी सुद्धा करू शकली नसती. कारण सावकाराची माणसं सतत       नजर ठेवून होती. तेव्हाही आणि आत्ता सुद्धा.

३.    -सावकाराचं पितळ उघडं पाडणे. पण अशाने सावकाराला एक संधी मिळेल हा खेळ पुन्हा घेण्याची.

४.    -हातात येईल तो दगड उचलून सावकाराच्याच डोक्यात घालणे.

A click by: Varun Bhagwat

सीमाला पूर्ण खेळ कळला. पायाखालची जमीन सरकून धरणीने पोटात घ्यावं असं तिला क्षणभर वाटलं. पण क्षणभरच, कारण नंतर ती एकदमच confident झाली. सावकाराने तिच्यासमोर डबा ठेवला. तिने ठरल्याप्रमाणे न बघता एक दगड उचलला. तिला माहीत होतं की हातातला दगड काळाच आहे. तिने उचललताना तो अशा प्रकारे मुठीत बंद केला की तो बाकी कोणाला दिसणार नाही आणि अतीशय वेगाने तो खाली टाकला. अशाप्रकारे की नदीकिनारी असणाऱ्या दगडांमध्ये तो मिसळून गेला.

सीमा पटकन मोठ्याने सर्वांना उद्देशून म्हणाली, “अरेरे... किती वेंधळी आहे आहे मी. आता पडलेला दगड शोधणं अशक्य आहे आणि खेळाच्या नियमानुसार डब्यात एक दगड काळा आणि एक पांढरा आहे. आता डब्यात जो दगड शिल्लक आहे त्याच्या विरुद्ध दगडाची निवड मी केली असेल. बरोबर ना शेठजी?”

अर्थातच डब्यात काळा दगड शिल्लक होता.

सीमा म्हणाली, “बघा, म्हणजे पडलेला दगड पांढरा असलाच पाहिजे. याचाच अर्थ खेळाच्या नियमाप्रमाणे आम्ही सर्व गोष्टीतून मुक्त झालो आहोत.”

शेठजीचा खेळ स्वतःवरच उलटला होता. तो मान्य करूच शकत नव्हता की त्याने डब्यात दोन्ही काळे दगड ठेवले होते. असं केलं असतं तर त्याचीच नाचक्की झाली असती.

सीमाने अडचणीचं रुपांतर संधीमध्ये केलं होतं. अनेक पर्यायांमधून तिने smart decision घेतला होता.

A click by: Varun Bhagwat

    - वरुण भागवत

- 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...