Skip to main content

कर्माचं Circle

A Click by- Sushil Ladkat

एक होता उंदीर आणि एक होता बेडूक. यांची झाली मैत्री. थोडं odd होतं हे combination. उंदीर बिचारा भोळा आणि बेडूक थोडा लबाड.

हा बेडूक उंदराशी वाट्टेल तसं विचित्र वागायचा आणि त्याचं त्या बेडकाला कधीच काही वाटायचं नाही. त्याला तो कायम कमी लेखायचा. उंदीर त्याचं काहीच वाकडं करू शकणार नाही याची त्याला खात्री होती आणि हे बऱ्यापैकी खरं सुद्धा होतं. उंदीर कधीच काही बोलायचा नाही. असली मैत्री तरी का असावी असा एक प्रश्न कोणालाही पडला असता. पण ज्याला पडायला पाहिजे त्या उंदराला तो पडत नव्हता. पर्याय नसल्यासारखं, जगातले इतर मित्र संपल्यासारखा तो घाबरून का होईना त्याच्यासोबत राहत होता. त्यामुळे बेडकाचं असं बेदरकार वागणं वाढू लागलं.

एक दिवस तर बेडकाने कहर केला.
त्याला उंदराची अतीशय नीच दर्जाची मस्करी करायची लहर आली. त्याने उंदराचा पाय स्वतःच्या पायाला बांधला आणि उड्या मारत फेरफटका मारायला निघाला. उंदीर फरफटत त्याच्या सोबत ओढला जाऊ लागला. डबकं तर बेडकाची अतीशय लाडकी जागा. त्याने उंदराचा आणि बाकी कसलाच पुढचा मागचा विचार न करता डबक्यात उडी टाकली. स्वतः मस्तपैकी पाण्यात खेळू लागला. पण उंदराच्या मात्र नाकातोंडात पाणी जाऊ लागलं. इतकं की तो गटांगळ्या खाऊ लागला आणि काही क्षणांत मरण पावला. बेडकाला त्याचं काही नव्हतं.

जगात चांगली माणसं आहेत पण सोबत नीच माणसं सुद्धा असतात. स्वतःच्या फायद्यासाठी, गमतीसाठी एखाद्या साध्या माणसाला चेष्टेचा विषय बनवतात. स्वतः डबक्यात राहतात आणि दुसऱ्याला पण त्याच त्या डबक्यात ओढतात. मग त्यात त्या दुसऱ्याचं काय होतंय या कडे ते पाहत नाहीत. अनेक जण भीतीने अशा लोकांच्या मागे जातात. काय म्हणतील ते सहन करतात. अनेकदा कळत पण नाही.

अन्याय करणं चूक तसं सहन करणं सुद्धा चूक!

पण अन्याय करणं तर कधी कधी गुन्हा करण्याइतकं गंभीर असतं जे बेडकाने केलं होतं.
उंदीर पाण्यात मेला.त्यामुळे त्याचं प्रेत फुगून पाण्यावर तरंगू लागलं. आकाशामध्ये एक घार घिरट्या घालत होती. घारीची नजर तीक्ष्ण असते. तिला वरूनच दिसलं की एक उंदीर मेला आहे आणि पाण्यात तरंगतो आहे. घार वेगाने खाली आली आणि तिने उंदीर पकडला. उंदराचा पाय अजूनही बेडकाला बांधला असल्याने घारीने उंदीर पकडल्यावर त्याच्या सोबत आपोआपच गाफील असलेला बेडूक सुद्धा तिच्या तावडीत सापडला. घारीला आयती शिकार चालून आली होती. तिने समोर आलेल्या मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

Karma (अर्थात कर्म) ही अशी गोष्ट आहे जी फिरून आपल्याकडेच येते.

चांगल्या कर्माचं फलित उत्तम मिळतं. वेळ लागू शकतो. मान्य.. पण वाईट कामाचं फळ सुद्धा वाईटच. कधीकधी त्याचं फळ तर अजून लवकर मिळतं जसं या गोष्टीत घडलं.

हे कर्म म्हणजे अनेकदा हिशोबासारखं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधीच चांगलं होत नाही.
Equation अर्थात समीकरण कधी ना कधी जुळून येतच. Circle पूर्ण होतो. बाकी शून्य राहतेच..


या गोष्टीतल्या वाईट कर्माची जशी बाकी शून्य राहिली. कारण कर्म हे boomerang नावाच्या अस्त्रासारखं आहे. वळून पुन्हा आपल्याकडेच. आपण करू तसं. आपण जे देऊ ते फिरून येतं. चांगलं केलं तर चांगलं नाहीतर....

- वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...