Skip to main content

हा सूर्य आणि ही कमीटमेंट!!


A click by: Varun Bhagwat

कौरवांचा जावई जयद्रथ ह्याने चक्रव्यूहामध्ये फसलेल्या अभिमन्यू ला कपटाने मारलं. अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा. अर्जुनाला ही बातमी कळली. त्याला अतीव दुःख झालं. याच बरोबरीने त्याचं मन सूडाच्या भावनेने पेटून उठलं. त्याने पुढचा मागचा कसलाच विचार न करता प्रतिज्ञा घेतली की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी मी जयद्रथाला संपवेन. जर मी असं करू शकलो नाही तर अग्निकुंडात उडी मारून स्वतःला संपवेन.

जयद्रथ नीच तर होताच आणि घाबरट सुद्धा होता. ही प्रतिज्ञा त्याच्यापर्यंत पोचली आणि घाबरून तो लपून बसला. जयद्रथाला शोधणं गरजेचं होतं. कारण शोधलं नसतं तर प्रतिज्ञेनुसार अर्जुन स्वतःला संपवणार होता. दिवस सुरु झाला. माध्यान्ह उलटली. संध्याकाळ होण्यास अगदी थोडा वेळ बाकी होता. जयद्रथ सापडेना. एकाएकी अंधार झाला. तशी अर्जुनाने अग्निकुंडात उडी घेण्याची तयारी केली. नीच जयद्रथाला मोह आवरेना. तो अर्जुनाचा शेवट पाहण्यासाठी लपून बसलेला बाहेर आला. कारण प्रतिज्ञेप्रमाणे आता त्याला भीती नव्हती. त्याच्या दृष्टीने सूर्य मावळला होता. तो अर्जुनाला सामोरा गेला.

इतका वेळ शांत असणारा श्रीकृष्ण आता त्याची खेळी खेळणार होता. एकाएकी सूर्य दिसू लागला. कोणालाच काही कळेना. कृष्णाने काही काळासाठी सूर्यग्रहण केलं होतं. त्यामुळे अचानक अंधार पडला होता. सूर्य मावळायला अवकाश होता.

A click by: Varun Bhagwat

कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ... उचल तुझं धनुष्य आणि कर याचा वध.”

 

अर्जुनाने जयद्रथाला मारलं. प्रतिज्ञा पूर्ण झाली.

पण इथे कृष्णाची शिकवण महत्त्वाची आहे. आपण यातून शिकण्यासारखं असं की प्रतिज्ञा म्हणजेच commitment असं म्हणूया. Commitment देताना सारासार विचार झाला पाहिजे.

आपण काय commitment देतोय?

त्याचे दूरगामी परिणाम काय होतील? 

आपलाच जीव आपण जेव्हा पणाला लावतोय तेव्हा त्यातून जे साध्य करायचं आहे ते साधलं जाणार आहे का?

 

आपण खरे असलो तरी समोरचा खरा आहे का? अर्जुनाने विचार केला असेल की समोरासमोर युद्ध करेल जयद्रथ. कारण अर्जुन पळपुटा नव्हता. पण जयद्रथ होता. त्यामुळे शत्रूला जाणून घेतलं पाहिजे त्याला तोडण्याआधी!

Commitment विचारपूर्वक दिली पाहिजे. शत्रूनुसार नीती बदलता आली पाहिजे. जर शत्रू कपट करतोय तर त्या भेकड मनुष्यासाठी आपण आपला जीव का पणाला लावायचा? इथे लागते कृष्णनीती! 

काही जण नुसते बोलतात. ही पोकळ commitment झाली.

काही जण बोलतात ते करून दाखवतात.  याला धैर्य लागतं.

काही जण करून मोकळे होतात. बोलण्यापेक्षा करण्याला महत्त्व देतात. जसं कृष्णाने केलं आणि त्याच्या करण्यातून इतरांना शिकवलं. इथे results ना महत्त्व होतं. जे साध्य झालं होतं.

कृष्णाच्या दृष्टीने Commitment ही जयद्रथाला मारायची होती. दु:खात असताना सुद्धा शांतपणे योजना आखण्याची होती.

हे सगळं अर्जुनावर सुद्धा उलटू शकलं असतं, पण तिथे कृष्ण होता. त्याने सावरलं, युक्ती लढवली. रागातून दिलेली commitment आपल्यालाच गोत्यात आणू शकते. प्रत्येकाला कृष्ण सापडेल का? तर त्याच्या ह्या शिकवणी मधून शोधला तर सापडेल...

 

-       वरुण भागवत


Comments

  1. खुपच सुंदर लिहिले 🙏

    ReplyDelete
  2. याला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  3. याला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  4. एखादी गोष्ट कोण करतोय यालाही महत्व आहेच ना उदा. अमृत पिणे चांगलं पण तेच अमृत राहू पिला तेव्हा ते त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरलं या उलट विष पिणे वाईट पण हेच विष जेव्हा शंकराने पिलं तेव्हा ते विष त्याच्या गळ्यातील दागिना झालं, नीलकंठ. इथे अर्जुन होता व त्याची बाजू न्यायाची होती.

    ReplyDelete
  5. म्हणून तर म्हणतात ना माणूस जो काही असतो तो त्याच्या निर्णयामुळे असतो. पण योग्य मांडलय

    ReplyDelete
  6. Nice re Varun��������

    ReplyDelete
  7. Commitment देताना किती विचार केला पाहिजे, हे खूप छान गोष्टीतून सांगितले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...