Skip to main content

हा सूर्य आणि ही कमीटमेंट!!


A click by: Varun Bhagwat

कौरवांचा जावई जयद्रथ ह्याने चक्रव्यूहामध्ये फसलेल्या अभिमन्यू ला कपटाने मारलं. अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा. अर्जुनाला ही बातमी कळली. त्याला अतीव दुःख झालं. याच बरोबरीने त्याचं मन सूडाच्या भावनेने पेटून उठलं. त्याने पुढचा मागचा कसलाच विचार न करता प्रतिज्ञा घेतली की उद्याचा सूर्यास्त होण्याच्या आधी मी जयद्रथाला संपवेन. जर मी असं करू शकलो नाही तर अग्निकुंडात उडी मारून स्वतःला संपवेन.

जयद्रथ नीच तर होताच आणि घाबरट सुद्धा होता. ही प्रतिज्ञा त्याच्यापर्यंत पोचली आणि घाबरून तो लपून बसला. जयद्रथाला शोधणं गरजेचं होतं. कारण शोधलं नसतं तर प्रतिज्ञेनुसार अर्जुन स्वतःला संपवणार होता. दिवस सुरु झाला. माध्यान्ह उलटली. संध्याकाळ होण्यास अगदी थोडा वेळ बाकी होता. जयद्रथ सापडेना. एकाएकी अंधार झाला. तशी अर्जुनाने अग्निकुंडात उडी घेण्याची तयारी केली. नीच जयद्रथाला मोह आवरेना. तो अर्जुनाचा शेवट पाहण्यासाठी लपून बसलेला बाहेर आला. कारण प्रतिज्ञेप्रमाणे आता त्याला भीती नव्हती. त्याच्या दृष्टीने सूर्य मावळला होता. तो अर्जुनाला सामोरा गेला.

इतका वेळ शांत असणारा श्रीकृष्ण आता त्याची खेळी खेळणार होता. एकाएकी सूर्य दिसू लागला. कोणालाच काही कळेना. कृष्णाने काही काळासाठी सूर्यग्रहण केलं होतं. त्यामुळे अचानक अंधार पडला होता. सूर्य मावळायला अवकाश होता.

A click by: Varun Bhagwat

कृष्ण अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ... उचल तुझं धनुष्य आणि कर याचा वध.”

 

अर्जुनाने जयद्रथाला मारलं. प्रतिज्ञा पूर्ण झाली.

पण इथे कृष्णाची शिकवण महत्त्वाची आहे. आपण यातून शिकण्यासारखं असं की प्रतिज्ञा म्हणजेच commitment असं म्हणूया. Commitment देताना सारासार विचार झाला पाहिजे.

आपण काय commitment देतोय?

त्याचे दूरगामी परिणाम काय होतील? 

आपलाच जीव आपण जेव्हा पणाला लावतोय तेव्हा त्यातून जे साध्य करायचं आहे ते साधलं जाणार आहे का?

 

आपण खरे असलो तरी समोरचा खरा आहे का? अर्जुनाने विचार केला असेल की समोरासमोर युद्ध करेल जयद्रथ. कारण अर्जुन पळपुटा नव्हता. पण जयद्रथ होता. त्यामुळे शत्रूला जाणून घेतलं पाहिजे त्याला तोडण्याआधी!

Commitment विचारपूर्वक दिली पाहिजे. शत्रूनुसार नीती बदलता आली पाहिजे. जर शत्रू कपट करतोय तर त्या भेकड मनुष्यासाठी आपण आपला जीव का पणाला लावायचा? इथे लागते कृष्णनीती! 

काही जण नुसते बोलतात. ही पोकळ commitment झाली.

काही जण बोलतात ते करून दाखवतात.  याला धैर्य लागतं.

काही जण करून मोकळे होतात. बोलण्यापेक्षा करण्याला महत्त्व देतात. जसं कृष्णाने केलं आणि त्याच्या करण्यातून इतरांना शिकवलं. इथे results ना महत्त्व होतं. जे साध्य झालं होतं.

कृष्णाच्या दृष्टीने Commitment ही जयद्रथाला मारायची होती. दु:खात असताना सुद्धा शांतपणे योजना आखण्याची होती.

हे सगळं अर्जुनावर सुद्धा उलटू शकलं असतं, पण तिथे कृष्ण होता. त्याने सावरलं, युक्ती लढवली. रागातून दिलेली commitment आपल्यालाच गोत्यात आणू शकते. प्रत्येकाला कृष्ण सापडेल का? तर त्याच्या ह्या शिकवणी मधून शोधला तर सापडेल...

 

-       वरुण भागवत


Comments

  1. खुपच सुंदर लिहिले 🙏

    ReplyDelete
  2. याला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  3. याला तुम्ही कृष्णनीती असे गोड नाव दिले आहे.पण इथे कृष्ण नसताच तर सर्व महाभारत बदलले असते.... काय झाले असते.... यावर वाचायला नक्कीच आवडेल

    ReplyDelete
  4. एखादी गोष्ट कोण करतोय यालाही महत्व आहेच ना उदा. अमृत पिणे चांगलं पण तेच अमृत राहू पिला तेव्हा ते त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरलं या उलट विष पिणे वाईट पण हेच विष जेव्हा शंकराने पिलं तेव्हा ते विष त्याच्या गळ्यातील दागिना झालं, नीलकंठ. इथे अर्जुन होता व त्याची बाजू न्यायाची होती.

    ReplyDelete
  5. म्हणून तर म्हणतात ना माणूस जो काही असतो तो त्याच्या निर्णयामुळे असतो. पण योग्य मांडलय

    ReplyDelete
  6. Nice re Varun��������

    ReplyDelete
  7. Commitment देताना किती विचार केला पाहिजे, हे खूप छान गोष्टीतून सांगितले आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...