Skip to main content

कृष्ण आणि problem solving

A Click by: Varun Bhagwat

महाभारतामध्ये होता जरासंध. माणूस कसला, जवळजवळ राक्षस च तो. त्याने अनेक राजांना कैद केलं होतं. त्यांना वाचवणं गरजेचं होतं. जरासंधाला संपवण्याच्या उद्देशाने अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण मगध देशी गेले. जरासंध योद्धा होता. त्याने युद्धाचं आव्हान स्वीकारलं. भीम आणि जरासंध यांच्यात लढाई जुंपली. भीम बलशाली असला तरी जरासंध सुद्धा तुल्यबळ होता. मात्र एक क्षण आला, भीमाने संधी साधली आणि पूर्ण ताकदीनिशी जरासंधाला उभा फाडला. तिथून वळून तो विजयी मुद्रेने कृष्णाकडे जाऊ लागला. तेवढ्यात जरासंधाच्या हसण्याचा त्याला आवाज आला. त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना. त्याने वळून पाहिलं. पाहतो तर काय??? दोन तुकडे झालेला जरासंध पुन्हा जोडला गेला होता.

भीम भयंकर संतापला. त्याने त्याला परत फाडलं. पुन्हा काही क्षणांत तो जोडला गेला. हे रहस्य त्याच्या जन्म कहाणी मध्ये दडलं होतं. एक प्रकारचं विचित्र वरदान त्याला प्राप्त झालं होतं.

भीम शक्ती लावत होता पण एकाच दिशेने विचार करत होता. आजकाल corporate च्या भाषेत याला functional fixedness असं म्हणतात. म्हणजेच पारंपारिक आणि एकाच पद्धतीने विचार करणे. त्यामुळे तो हा problem सोडवू शकत नव्हता.

problem कितीही विचित्र असला तरी बारकावे लक्षात घेतले तर तो सोडवता येऊ शकतो.

इथे तर कृष्ण उपस्थित होता. थकलेल्या भीमाला तो पाहत होता. भीमाने पुन्हा जरासंधाला फाडलं होतं. फाडला म्हणजे तो मेला अशीच भीमाची समजूत होत होती. त्याच्यापुढे तो काही करत नव्हता. फाडलेले दोन्ही भाग तिथेच जवळ असल्याने स्वाभाविकच ते पुन्हा जोडले जात होते. पण कुठेतरी काहीतरी त्रुटी असणारच या विचारात कृष्ण असताना जरासंध पुन्हा जोडला जात होता. त्याच वेळी कृष्णाने भीमाला आपल्याकडे बघण्यासाठी खुणावलं. त्याने बाजूला पडलेलं केळीचं पान उचललं. भीम जरासंधाला फाडत होता तसं त्याने ते मधोमध फाडलं. पण भीम जसं त्याला फाडून तिथेच थांबत होता तसं तेवढंच करून कृष्ण थांबला नाही. त्याने फाडलेल्या पानाचे तुकडे विरुद्ध दिशांना आणि ते ही लांब फेकले.


भीम समजायचं ते समजला. त्याने पुन्हा जरासंधाला फाडलं आणि तो जोडला जाण्याआधी त्याचे दोन्ही तुकडे विरुद्ध दिशांना फेकले की जेणेकरून ते जोडले जाणार नाहीत. आता खऱ्या अर्थाने भीमाला solution मिळालं होतं. कृष्णाच्या creative thinking च्या मदतीने problem solve झाला होता.

हाच विचार भीम कदाचित करू शकला असता. पण तेव्हाच जेव्हा त्याने ठरवलं असतं की सीधे हाथ से घी ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है...

problems हे solutions पेक्षा मोठे नसतात. पण तोच ठरलेला विचार कधीतरी सोडावा लागतो. जशी शक्ती सोबत युक्ती वापरावी लागते तशी पारंपारिक विचाराला अपारंपरिक, निराळ्या विचाराची जोड द्यावी लागते. अशी जोड दिली की जरासंध पुन्हा जोडला जात नाही.

-वरुण भागवत



Comments

  1. बेष्ट! अति बेष्ट!👌 कॉर्पोरेट महाभारत

    ReplyDelete
  2. अत्यंत सोप्या समजेल अशा भाषेत आणि तरीही तितकंच रसाळ आणि creative... अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Routine चा आदर!

“कधी कधी वाटतं की खूप लिहावं, पण वेळ होतोच असं नाही.” “वेळ मिळाला की काय करतोस?” “वेळ मिळतो. I mean, कधी वेळ असतो, तर मग लिहायचा mood असतोच असं नाही.” “कधीतरीच काहीतरी करावंसं वाटणं हा मनुष्याचा अगदी सहज स्वभाव आहे. पण तीच गोष्ट रोज ठरवून करणं किंवा ठराविक कालावधीने पुनःपुन्हा करणं हे खरं कसब.”  “तीच गोष्ट repeat करण्यात काय आलंय कसब? रोज करणं हे तर routine झालं. Routine काय अवघड असतं का?” “नाही. Routine हे अवघड नाही तर routine ही गोष्ट खरोखरच boring आहे.” “हं, तेच.” “तेच नाही, फरक आहे.” “म्हणजे?” “Routine अवघड नाही पण boring आहे. पण ते असं आहे म्हणूनच routine हे long term साठी उत्तम result देणारं आहे.”  “कसं?” “कसंय, कित्येक माणसांना results तर हवे असतात आणि त्यातल्या बहुतेकांना results ची प्रचंड घाई असते. मग हवे तसे results मिळत नाहीत, ते खट्टू होतात आणि प्रयत्न म्हणजेच routine सोडून देतात. इथेच सगळी गंमत आहे. फार प्रयत्न न करता results न मिळणं हा प्रयत्नांचा आळस आहे. बघ, MS Dhoni ला कधी interview मध्ये बोलताना पाहिलं असेल तर तो अनेकदा म्हणतो की process वर focus करा. Result ...

अबोल ती... अबोल तो...

  माणसाचं भावविश्व समजून घेण्याचा विचार केला की लक्षात येतं की किती गोष्टी त्यात दडल्या आहेत. कोणीतरी एकटं, त्याहूनही अधिक अचूक सांगायचं तर एकाकी दिसलं की मनी प्रश्न येतो आणि तो विचारावा देखील वाटतो, "काय रे / काय गं? सगळं ठीक ना?" अशीच एक सखी त्याला भेटली. त्याने तिला विचारलं, "ठीक आहेस ना गं?" ती व्यक्ती उत्तरली, "हां... अं... हो..." या उत्तरावरुन त्याला अंदाज आला की काहीतरी बिनसलंय. मग त्याने जाणून घेण्याचा यत्न केला. तेव्हा ती काहीच बोलली नाही. मग तो विषय बाजूला पडला. पण थोड्याच वेळाने ती स्वतःच म्हणाली, "हो, काहीतरी आहे असं, ज्यामुळे मी ठीक नाहीये." त्याने हलकेच विचारलं, "सांगशील?" "नाही नको. उगाच सगळा mood spoil होऊन जाईल. त्यापेक्षा मी लिहिलेल्या कविता ऐकवते. ऐकशील?" "ऐकव." गंमत अशी की तो ही लिहायचा. थोडं तिचं, थोडं त्याचं असं करत दोघे एकमेकांना गूज सांगत होते. दोघे कल्पनेची नाव वल्हवत अज्ञात किनाऱ्यावर जाऊ लागले. काही क्षण शांत गेले. शांतता. न बोलताही बरंच बोलता येईल असा किनारा त्यांना सापडला. तिथे दोघे पोहोच...

चंद्र आणि ते दोघे!

  "आता तर लक्ख उजाडलंय. तरी आज थोडा जास्तच वेळ आहे बघ तो आभाळात." "कोण गं?" "आपला चंद्र!" "असं कसं गं?" "कधी कधी राहतो तो असा जास्त वेळ. निसर्गाचं काय सांगावं?" "किंवा कधी कधी त्याला निघून जावं वाटत नसेल. तिच्यासवे थांबून राहावं असं वाटत असेल!" "ती?" "त्याची सखी!" "चंद्राची सखी?" "हो. नसू शकते?" "असेल." "आहेच. चंद्राला साक्ष ठेवून इतकं काय काय romantic बोललं जातं, लिहिलं जातं. चंद्र नसणार का मग romantic?" "हां." "हां काय? खरंच! मग थांबत असेल तो त्याच्या सखीची वाट पाहत. थांबावं वाटत असेल त्याला. आज तसाच दिवस आहे. म्हणून तो अजूनही आभाळात दिसतोय." "हो ना.. वाटत असेल थांबावं." "रमत असेल तो तिच्या आठवणीत. झुरत असेल भेटीसाठी. आणि खूप दिवसांनी भेट झाली की मग तिच्यासोबत थांबून राहत असेल. नाही का?" "हो रे. यात गंमत आहे खरी. मग ती सोडतच नसेल बघ त्याला." "तिने तरी त्याला का सोडावं? मस्तपैकी घट्ट मिठीत पकडून ...