Skip to main content

कृष्ण आणि problem solving

A Click by: Varun Bhagwat

महाभारतामध्ये होता जरासंध. माणूस कसला, जवळजवळ राक्षस च तो. त्याने अनेक राजांना कैद केलं होतं. त्यांना वाचवणं गरजेचं होतं. जरासंधाला संपवण्याच्या उद्देशाने अर्जुन, भीम आणि श्रीकृष्ण मगध देशी गेले. जरासंध योद्धा होता. त्याने युद्धाचं आव्हान स्वीकारलं. भीम आणि जरासंध यांच्यात लढाई जुंपली. भीम बलशाली असला तरी जरासंध सुद्धा तुल्यबळ होता. मात्र एक क्षण आला, भीमाने संधी साधली आणि पूर्ण ताकदीनिशी जरासंधाला उभा फाडला. तिथून वळून तो विजयी मुद्रेने कृष्णाकडे जाऊ लागला. तेवढ्यात जरासंधाच्या हसण्याचा त्याला आवाज आला. त्याचा त्याच्या कानांवर विश्वास बसेना. त्याने वळून पाहिलं. पाहतो तर काय??? दोन तुकडे झालेला जरासंध पुन्हा जोडला गेला होता.

भीम भयंकर संतापला. त्याने त्याला परत फाडलं. पुन्हा काही क्षणांत तो जोडला गेला. हे रहस्य त्याच्या जन्म कहाणी मध्ये दडलं होतं. एक प्रकारचं विचित्र वरदान त्याला प्राप्त झालं होतं.

भीम शक्ती लावत होता पण एकाच दिशेने विचार करत होता. आजकाल corporate च्या भाषेत याला functional fixedness असं म्हणतात. म्हणजेच पारंपारिक आणि एकाच पद्धतीने विचार करणे. त्यामुळे तो हा problem सोडवू शकत नव्हता.

problem कितीही विचित्र असला तरी बारकावे लक्षात घेतले तर तो सोडवता येऊ शकतो.

इथे तर कृष्ण उपस्थित होता. थकलेल्या भीमाला तो पाहत होता. भीमाने पुन्हा जरासंधाला फाडलं होतं. फाडला म्हणजे तो मेला अशीच भीमाची समजूत होत होती. त्याच्यापुढे तो काही करत नव्हता. फाडलेले दोन्ही भाग तिथेच जवळ असल्याने स्वाभाविकच ते पुन्हा जोडले जात होते. पण कुठेतरी काहीतरी त्रुटी असणारच या विचारात कृष्ण असताना जरासंध पुन्हा जोडला जात होता. त्याच वेळी कृष्णाने भीमाला आपल्याकडे बघण्यासाठी खुणावलं. त्याने बाजूला पडलेलं केळीचं पान उचललं. भीम जरासंधाला फाडत होता तसं त्याने ते मधोमध फाडलं. पण भीम जसं त्याला फाडून तिथेच थांबत होता तसं तेवढंच करून कृष्ण थांबला नाही. त्याने फाडलेल्या पानाचे तुकडे विरुद्ध दिशांना आणि ते ही लांब फेकले.


भीम समजायचं ते समजला. त्याने पुन्हा जरासंधाला फाडलं आणि तो जोडला जाण्याआधी त्याचे दोन्ही तुकडे विरुद्ध दिशांना फेकले की जेणेकरून ते जोडले जाणार नाहीत. आता खऱ्या अर्थाने भीमाला solution मिळालं होतं. कृष्णाच्या creative thinking च्या मदतीने problem solve झाला होता.

हाच विचार भीम कदाचित करू शकला असता. पण तेव्हाच जेव्हा त्याने ठरवलं असतं की सीधे हाथ से घी ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है...

problems हे solutions पेक्षा मोठे नसतात. पण तोच ठरलेला विचार कधीतरी सोडावा लागतो. जशी शक्ती सोबत युक्ती वापरावी लागते तशी पारंपारिक विचाराला अपारंपरिक, निराळ्या विचाराची जोड द्यावी लागते. अशी जोड दिली की जरासंध पुन्हा जोडला जात नाही.

-वरुण भागवत



Comments

  1. बेष्ट! अति बेष्ट!👌 कॉर्पोरेट महाभारत

    ReplyDelete
  2. अत्यंत सोप्या समजेल अशा भाषेत आणि तरीही तितकंच रसाळ आणि creative... अप्रतिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...