Skip to main content

आशा


A Click by: Varun Bhagwat

आशा आणि सोना cafe मध्ये भेटल्या. Coffee आणि sandwich ची order place केली. सोना ला हवं ते sandwich नेमकं available नव्हतं.

“एक गोष्ट आयुष्यात हवी तशी घडत नाहीये.” सोना वैतागून म्हणाली.

“Chill कर.” आशा उत्तरली.

“काय chill करू?” बाकी सोड. मला हवं आहे ते sandwich सुद्धा मिळू नये म्हणजे अती झालं.” आणि सोनाच पुढे तोंड वेंगाडत म्हणाली, “आणि तुझं आपलं चालू असतं, आपली energy आपल्याशी बोलत असते. आपण जशी energy लावतो तसं फळ मिळतं. कुठे मिळालं फळ?”

“ह्याला बादरायण संबंध जोडणे असं म्हणतात.” आशा शांतपणे म्हणाली.

“What संबंध?” सोनाने तो शब्द ऐकून विचारलं.

“अगं म्हणजे कुठलाही संबंध कुठेही जोडणे. तुझं business struggle आणि sandwich याचा काहीच संबंध नाही.”

“बरं नसेल. पण मग माझा business मोठा का होत नाहीये?”

“प्रयत्नांना जोड हवी आपल्या सकारात्मकतेची.”

“हे असं काही नसतं.”

 “असतं.”

“Oh... come on.”

आशा सांगू लागली, “तुझा विचार याच दृष्टीने जातोय की माझा business मोठा होत नाहीये.”

“अर्थात.”

“थोडा असा विचार करून बघ की business मोठा होणारे.”

“असा आपोआप होईल का?”

“मुळीच नाही, पण जेव्हा तो grow व्हावा असा विचार सुरु होईल तेव्हाच तो grow कसा करता येईल या दृष्टीने पण विचारचक्र सुरु होईल. आपोआप तू वेगवेगळ्या ideas चा विचार करू लागशील.”

“तरी काही नाही झालं तर...”

“अशी negativity घेऊन फिरलीस तर असं पण काही चांगलं घडणार नाही.”

“अरे अनेकदा आपण प्रयत्न करतो पण परिस्थिती पण साथ देत नाही. असं घडतं यार... मग काय करायचं?”

“माणूस आशेवर जगतो.”

“प्रवचन mode मध्ये जाऊ नको.”

“सोना पण हे खरंय.”

“चल ठीके, मी प्रयत्न केले... पण ही ‘आशा’ कशी आणायची?”

“तीच आपल्याला पुढे नेते.”

“Give me one good example.”

“अगं कित्ती लहान असताना ऐकलेली story आहे. तुला childish वाटू शकते. पण माझ्यासाठी ऐक.”

“बोला.”

आशा गोष्ट सांगू लागली, “एका गावात दुष्काळ पडला होता. आता हे तुझ्याशी connect करायचा प्रयत्न कर. बघ हां.. दुष्काळ म्हणजे परिस्थिती आपल्या हातात नाही. Correct?”

“Yeah!” सोना उद्गारली.

“म्हणून मग सगळे गावकरी देवाची प्रार्थना करू लागले. आता हे प्रयत्न आहेत असं समजूया. आता पाऊस पाडणं काही तेरे मेरे बस की बात नही. म्हणजेच लगेच परिस्थिती बदलणं शक्य नाही. पण गावातला एक मुलगा सगळ्यांपेक्षा वेगळा होता. तो प्रार्थनेला आला पण छत्री घेऊन आला. ह्याला म्हणायचं आशा! त्याची positivity कित्ती matter करते बघ. पाऊस पडेल ही आशा सोबत घेऊन तो आला. म्हणून मी मगाशी म्हणलं की माणूस आशेवर जगतो. 'आज नाही तर उद्या होईल' ही आशा जीवंत असली पाहिजे.”

 “आप great हो. पण माझा धीर सुटतो.”

“असा धीर सुटून कसं चालेल?” आशा सोनाला टप्पल देत म्हणाली.

सोनाला थोडा मस्करीचा mood आला आणि ती म्हणाली, “बरं, पण मी इथे आशा करतीये की माझं sandwich मला हवंय; पण ते आहे का इथे? आता इथे काय संबंध positive- negative thoughts चा?”

“तू उगाच sandwich वर येऊ नको. इथे पण सांगते, we can always change the restaurant. पण तू इथेच अडकून पडलीये. इथे मिळत नाहीये तर उठ. दुसरीकडे जाऊ.” आशा सांगत होती.

“हा विचार केलाच नाही गं.” सोना पुन्हा विचारात गेली.

 

-वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...