Skip to main content

Boss सोबत कसं वागायचं?

A Click by: Varun Bhagwat


आज अविनाशने त्याच्या boss चा चांगलाच ओरडा खाल्ला होता. वैतागून तो break-out area मध्ये थोडा relax व्हायला आला. तिथे त्याच्याच department मधली संजना पण होती.

त्याला वैतागलेलं पाहून संजना म्हणाली, “अवि, are you okay?”

“No. I’m not.”

“काय झालं? Boss चिडले?”

“मग काय... संजना, मी काय म्हणतो, अशी काही permanent किंवा ठराविक पद्धत आहे का boss शी बोलण्याची?”

“ठराविक पद्धत म्हणजे?”

“म्हणजे असं केल्याने win-win situation असेल... तो ही खुश; आपण पण खुश.”

“अवघड आहे. अशी कोणतीच ठराविक पद्धत नाही. तू कसा पण वाग. कधी boss बोलेल तर कधी बाकीच्या व्यक्ती तुला बोलतील.”

“हे कसलं उत्तर झालं यार...?”

“अरे अनुभवावरून सांगतेय बाबा.”

“कोणताच boss नीट नसेल का?”

“अरे मी असं कुठे म्हणाले? हे बघ सगळे boss काही वाईट नसतात. पण मी म्हणाले, तू boss शी कसाही वाग, बोल... कधी boss सुनावेल तर कधी बाकी कोणीतरी बोलेल, त्यांचा संबंध नसला तरी...”

“प्च...”

“अरे, तुला त्या बिचाऱ्या नोकराची गोष्ट माहितीये. वो रट ले. यहां पे बहुत काम आएगी.”

“कोणती गोष्ट?”

“आपण कसे नोकरदार आहोत तसाच एक नोकर एका शेठजी कडे कामाला होता. एक दिवस शेठजीला रात्री फेरफटका मारायची लहर आली. तेव्हा दिव्याची सोय नव्हती. म्हणून नोकराला त्याने कंदील धरायला सांगितलं आणि चल म्हणाला. नोकर निमूटपणे शेठजी च्या पुढे चालू लागला, पुढचा रस्ता आणि उजेड दिसावा म्हणून... तिथून चालणारी एक व्यक्ती शेठजीचं लक्ष नाही असं पाहून नोकराला म्हणाली, “काय उद्धट वागणं आहे रे तुझं. सरळ सरळ शेठजीच्या पुढे चालतोस... नोकराने त्याची चालायची गती कमी केली आणि आता शेठजीसोबत चालू लागला. तिथून जाणारा अजून एक जण शेठजी आपल्याकडे बघत नाही ना याची खात्री करून घेत नोकराला म्हणाला, “काय तुझं वागणं, शेठजीच्या सोबत चालून त्यांच्याशी बरोबरी करू पाहतोयस?” नोकराने गती अजून कमी केली आणि शेठजीच्या मागून चालू लागला. अगदी थोडा वेळ गेला. आता बाकी कोण काही बोललं नाही. पण शेठजी म्हणाला, “असा मागून चालल्यावर मी अर्धवट प्रकाशात चालायचं का?” संजना बोलता बोलता थांबली.

“मग नोकराने काय केलं?” अविनाशने उत्सुकतेने विचारलं.

“माहित नाही.”

“अगं, अर्धवट गोष्ट काय सांगतेस?”

“मी अर्धवट गोष्ट सांगत नाहीये. गोष्ट इथे संपते.”

“म्हणजे यावर solution नाही?”

“Fix असं काही solution नाही.”

“मग काय?”

“You know, they say... you need to be flexible...”

“याला काहीच अर्थ नाही.”

“Chill... फार मनाला लावून नको घेऊस. असं आहे ना की, जो तो ज्याच्या- त्याच्या चष्म्यातून पाहतो. तू तुझा चष्मा छान carry करायला शिक. चलो, break खतम, काम शुरू.”

 

-       वरुण भागवत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Late झाला तर...

समीर नी चिडचिड करतच गाडीला किक मारली. पहिल्या किकला स्टार्ट होणारी गाडी आज चार किका मारून सुद्धा स्टार्ट होत नव्हती. अखेर पाचव्या किकला गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर त्याचा राग त्याने Accelerator वर पिळ देत काढला. Accelerator खूप जास्त प्रमाणात पिळत त्याने गाडी idle च ठेवली. त्यानी गाडी इतकी raise केली की शेजारच्या पाटील काकू काचेची खिडकी उघडून डोकावून पाहू लागल्या. त्या बघताच तो थोडासा embarrassed झाला. समीर त्यांच्याकडे बघून कसंनुसं हसला. गाडीचा कधीच इतका मोठा आवाज न करणारा समीर आज थोडं वेगळंच वागताना पाहून समोरच्या शेलार काकूंना आश्चर्य वाटलं होतं. मिस्टर शेलार सुद्धा पूजा करत करत खिडकीतून डोकावून पाहू लागले. आता मात्र समीरने पटकन नजर चोरत gear टाकत तिथून पळ काढला. वर्षा मावशींची गडबड चालू होती. त्यांना काहीही करून त्यांची बस गाठायची होती. कारखान्यात वेळेवर पोहोचणं भाग होतं. पतीच्या निधनानंतर गेली दहा वर्ष, घरापासून ८ किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कारखान्यात त्या कामाला होत्या. त्यांनी हे काम करून मुलालाही मोठ्या कष्टाने वाढवलं होतं. आता मुलगा कॉलेजमध्ये होता आणि  कॉलेजच्याच ...

Parking आणि त्या तिघी!

  ईशा किराणामालाच्या दुकानातून दोन जड पिशव्या तिच्या नाजूक हातात घेऊन आपल्या two wheeler पाशी पोहोचली. तिथे गेल्या गेल्या तिला दिसलं की तिच्या गाडीच्या दोन्ही बाजूंना चिकटून दोन गाड्या लावल्या आहेत. आणि या तीनही गाड्या side stand वर आहेत. बाकीच्यांनी गाड्या side stand वर लावण्याचं कारण म्हणजे mostly आळस किंवा parking मध्ये दुसऱ्याची गाडी काढायला लावायला अवघड जाईल यांचं भान नसणे. ईशाने side stand वर लावण्याचं कारण आळस नव्हतं, तिला भान होतं; पण तिच्या नाजूक बांध्याला गाडी double stand वर लावणं म्हणजे कमरेची वाट लावून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ती गाडी side stand वर लावायची. त्यामुळे गाडी काढताना अडचण होणं हा आजचा problem नव्हता. पण नेहमी कोणी ना कोणी सहाय्यास येई. आज मात्र गाडी main road पासून आत साधारण ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या गल्लीत, उजवीकडे वळून अजून पुढे १०० मीटरवर असणाऱ्या किराणा दुकानासमोर होती. दुपारचा १ वाजला होता. Grocery shop मध्ये सकाळच्या सत्रातली ईशाच शेवटची customer होती. तिने सामान भरताच Shutter down करून ईशा गाडीजवळ येईपर्यंत भरत भाई निघून गेला. गल्ली, दुपारी १ ची व...

मनातल्या एकलव्याची भरारी...

  A click by : Varun Bhagwat  "हातात घेतलेली रेती किती सहज सुटते. आपण पकडून ठेवलीय असं वाटतं. आपला त्यावर ताबा आहे असं वाटतं पण..." "पण ती निघून जाते. असंच ना?" "हो, जशी माझी नोकरी गेली तशीच. शाश्वतीच नाही राहिली कसली." "हं..." "मी किती कष्ट घेतले. रोज नवीन काहीतरी शोधू पाहत होतो, शिकत होतो. पण असा तडकाफडकी निर्णय घेऊन मला काढून टाकलं. कुठे चुकलं माझं?" "तू मर्जीतील माणूस नव्हतास." "काय?" "खूप स्पष्ट बोलतोय मी. पण हेच सत्य आहे." "पण म्हणजे काय?" "खूप explain करावं लागेल. "मग कर." "वेळ आहे?" "नोकरी गेल्यावर वेळच वेळ असतो." "बरं. मग ऐक. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरू. अर्जुन तर त्यांचा लाडका शिष्य. त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन त्यांनी त्याला दिलं होतं. एकदा गुरू द्रोणाचार्य त्यांच्या साऱ्या शिष्यांसवे अरण्यात गेले होते. एक कुत्रा खूप वेळ भुंकत होता. मात्र काही काळाने तो शांत झाला. कोणाला कळेना की हा अचानक कसा काय इतका शांत झाला? जिथून त्या ...